शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
5
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
6
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
7
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
8
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
9
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
10
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
11
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
12
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
13
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
14
भाच्याच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
15
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
16
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
17
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
18
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
19
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
20
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'

ओवारा कालव्याची दयनीय अवस्था

By admin | Updated: May 31, 2017 01:18 IST

ओवारा प्रकल्प तयार होऊन जवळपास १५ वर्षांचा काळ लोटला. मात्र या प्रकल्पाच्या पाण्यापासून शेतकरी वंचित आहेत.

शेतकऱ्यांना शिक्षा : प्रकल्प असूनही सिंचनापासून दूर लोकमत न्यूज नेटवर्क आमगाव : ओवारा प्रकल्प तयार होऊन जवळपास १५ वर्षांचा काळ लोटला. मात्र या प्रकल्पाच्या पाण्यापासून शेतकरी वंचित आहेत. प्रकल्पाचे काम सुरू असताना कालवे तयार करण्यात आले; मात्र अनेकदा कालवे पावसाळ्यात फुटल्याने शेतकऱ्यांना शेतीच्या सिंचनासाठी पाणी मिळत नाही. ओवारा कालव्याची एवढी खस्ता हालत असताना शिक्षा शेतकऱ्यांना भोगावी लागत आहे. यावर्षी रबीकरिता कारूटोला, सलंगटोला, हेटी, सातगाव, रुंगाटोला, साखरीटोला येथील शेतीला पाणी देण्यात आले. मात्र धरणात जे पाणी रबी निघाल्यानंतर शिल्लक आहे, ते पाणी कालव्यास पिण्याकरिता सोडण्यात यावे, अशी यावर्षी जि.प. सदस्य जियालाल पंधरे यांनी लेखी निवेदन देऊन मागणी केली. मात्र जलाशयात पाणीसाठा नाही, असे सांगून अधिकारी मोकळे होत आहेत. तर शिल्लक पाणी जिल्हाधिकारी गोंदिया यांच्या आदेशानंतर सोडला जाईल, अशी उडवाउडवीचे उत्तर शेतकऱ्यांना व लोकप्रतिनिधींना ओवारा प्रकल्पाचे अधिकारी देत आहेत. जवळपास अनेक वर्षांपासून तयार झालेले कालवे फुटत आहेत. त्यांच्यावर चालढकल काम करून शेतकऱ्यांची सांत्वना केली जाते. मात्र वस्तुस्थिती एवढी गंभीर आहे की कालवे नादुरूस्त असल्याने पाणी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊ शकत नाही. हा प्रकार तब्बल दोन-तीन वर्षांपासून सुरू आहे. कालव्याच्या कामाकरिता बजेटमध्ये निधी नाही. निधी आल्यानंतर काम सुरू होईल, अशी उडवाउडवीचे उत्तरे अधिकारी देत आहेत. आता पावसाळा लागण्याच्या काळ जवळ आला आहे. निधी आल्यानंतर काम केव्हा होईल, याबाबद शंका असून पावसाळ्यात कालव्याची कामे होणार नाहीत व शेतकऱ्यांना खरीप पिकाकरिता पाणी मिळणार नाही, अशी येथील अधिकाऱ्यांची कार्यपध्दती आहे. देवरी येथील जुन्या प्रकल्प अधिकारी कार्यालयामागे ओवारा प्रकल्पाचे कार्यालय आहे. मात्र येथील उपविभागीय अधिकारी पालेवार यांचे दर्शन होत नाही. कार्यरत चपराशी कार्यालयात मिळत नाही. शाखा अभियंता यांचे वेळापत्रक निश्चित माहीत नाही. ओवारा प्रकल्पाच्या कालव्या संदर्भात खंत जि.प. सदस्य जियालाल पंधरे यांनी व्यक्त केली आहे.