शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

पोलीस पाटील भरतीत घोळ

By admin | Updated: November 21, 2015 02:18 IST

पोलीस पाटील पदासाठी घेण्यात आलेल्या परिक्षेत पहिल्या क्रमांवर असलेल्या उमेदवाराला वगळून तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या उमेदवाराला नियुक्ती देण्यात आली.

हलबीटोलातील प्रकार : उपविभागीय अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणीपांढरी : पोलीस पाटील पदासाठी घेण्यात आलेल्या परिक्षेत पहिल्या क्रमांवर असलेल्या उमेदवाराला वगळून तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या उमेदवाराला नियुक्ती देण्यात आली. परिसरातील ग्राम हलबीटोला येथे हा प्रकार घडला असून यातून पोलीस पाटील भरतीत घोळ झाल्याचा आरोप गावकऱ्यांकडून केला जात आहे. यात सदर भरती प्रक्रियेला जबाबदार उपविभागीय अधिकारी सुनील सूर्यवंशी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी गोपाल राऊत व इतर काही लोकांनी केली आहे. देवरी, आमगाव, सालेकसा व सडक-अर्जुनी तालु्क्यातील पोलीस पाटलांच्या रिक्त पदांसाठी खासगी एजंसीमार्फत परीक्षा घेण्यात आली. यात गोपाल इंदल राऊत (३३, रा. हलबीटोला) यांना लेखी परीक्षेत सर्वाधिक गुण मिळाले. तसेच तोंडी परीक्षेत सर्व प्रश्नांचे अचूक उत्तर दिले. यामुळे यादीत त्यांचे नाव क्रमांक १ वर असतानाही क्रमांक तीनच्या उमेदवाराला नियुक्त करण्यात आले. त्यामुळे सदर पोलीस पाटील भरती प्रक्रियेमध्ये घोळ झाल्याची शंका आहे.हलबीटोला (पांढरी) या गावामध्ये ९० टक्के जनता आदिवासी समाजाची आहे. तरीपण सदर गावाच्या पोलीस पाटील पदी सर्वसाधारण प्रवर्गाच्या उमेदवाराची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे गावांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे या भरतीमध्ये अंतिम सूचीत नाव येण्यासाठी काही दलाल नेमून ‘जो देईल तो पोलीस पाटील होईल’ या म्हणीप्रमाणे आधार घेत पोलीस पाटलांची नियुक्ती करण्यात आल्याची उमेदवारांमध्ये चर्चा आहे. याचे मुख्य कारण म्हणजे जास्त शिक्षण असल्यापेक्षा कमी शिक्षण असलेल्याचा क्रमांक लागला. शिक्षणासोबत अन्य कार्यात व स्पर्धेत भाग घेतल्याचे व क्रमांक पटकावल्याचे प्रशस्तीपत्रक जोडलेल्या गुणांचा उल्लेख कुठेही नाही. तसेच परीक्षा हॉलमध्ये सीसीटीव्ही कॅमरे नसतानासुद्धा परीक्षा घेणे, अशा अनेक बाबीत चुका आढळून आल्या आहेत. या सर्व बाबींचा विचार करता पोलीस पाटील पदासाठी घेण्यात आलेली भरती रद्द करुन उपविभागीय अधिकारी सूर्यवंशी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पालकमंत्री बडोले, आ.संजय पुराम यांच्यासह मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून करण्यात आली. (वार्ताहर)