शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बिरसी येथील आंदोलनाची प्रधानमंत्री कार्यालयाकडून दखल ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:29 IST

गोंदिया : मागील दीड महिन्यांपासून सुरू असलेल्या तालुक्यातील ग्राम बिरसी येथील सुरक्षा रक्षकांच्या आंदोलनाची दखल अखेर प्रधानमंत्री कार्यालयाकडून ...

गोंदिया : मागील दीड महिन्यांपासून सुरू असलेल्या तालुक्यातील ग्राम बिरसी येथील सुरक्षा रक्षकांच्या आंदोलनाची दखल अखेर प्रधानमंत्री कार्यालयाकडून घेण्यात आली आहे. प्रधानमंत्री कार्यालयाकडून संघटनेला पत्र पाठविण्यात आले आहे. तसेच या सुरक्षा रक्षकांच्या मागण्या तातडीने सोडविण्यासाठी विमानतळ अधिकाऱ्यांना या पत्रातून निर्देश देण्यात आले आहेत.

१३ वर्षे काम करूनही बिरसी येथील नागरिकांना विमानतळ प्रशासनाने कामावरून कमी केले आहे. आपल्याला पुन्हा कामावर घेण्यात यावे या मागणीसाठी येथील सुरक्षा रक्षक मागील दीड महिन्यांपासून विमानतळ गेट समोर आपल्या संपूर्ण कुटुंबासमवेत आंदोलनाला बसलेले आहेत. या आंदोलनाची अद्यापही दखल जिल्हा व विमानतळ प्रशासनाने घेतली नाही. एवढेच नव्हे तर या आंदोलनाला आतापर्यंत जिल्ह्यातील आमदार, खासदार तसेच अनेक संघटनांच्यावतीने भेटी देऊन समर्थन देण्यात आले. परंतु अद्यापही सुरक्षा रक्षकांच्या मागण्यांसंदर्भात तोडगा काढण्यात आला नाही. हा प्रश्न तातडीने मार्गी लावून त्याची सोडवणूक करावी व सुरक्षा रक्षकांवर झालेला अन्याय दूर करावा अशी मागणी सुरक्षा रक्षकांनी पंतप्रधान कार्यालयाकडे केली होती. तसेच जिल्हा व विमानतळ प्रशासन सुरक्षा रक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी अपयशी ठरत असल्यामुळे त्यांनी राष्ट्रपतींकडे इच्छा मृत्यूची मागणी सुद्धा केली होती हे विशेष. अखेर दीड महिन्यांनंतर प्रधानमंत्री कार्यालयाने या सुरक्षा रक्षकांच्या मागण्यांची दखल घेत त्यांना ताबडतोब न्याय देण्यात यावा व या प्रश्नांची त्वरित सोडवणूक करावी असे निर्देश विमानतळ अधिकाऱ्यांना दिले आहेत. देशाच्या प्रमुख कार्यालयाने दिलेल्या आदेशानंतर विमानतळ व जिल्हा प्रशासनातील अधिकारी हे किती दिवसांत सुरक्षा रक्षकांना न्याय मिळवून देतात की प्रधानमंत्री कार्यालयाच्या पत्रालाही केराची टोपली दाखवितात याकडे लक्ष लागले आहे.

......