शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

धान खरेदी केंद्रावर लूट

By admin | Updated: May 22, 2015 01:56 IST

एकीकडे आधीच धानाला भाव नसल्याने शेतकरी त्रस्त असताना आधारभूत हमीभाव धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची लूट सुरू आहे.

अर्जुनी मोरगाव : एकीकडे आधीच धानाला भाव नसल्याने शेतकरी त्रस्त असताना आधारभूत हमीभाव धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. उन्हाळी धानपिक विक्रीसाठी जिल्हा मार्केटिंग कार्यालयाने ठरवून दिलेल्या धान खरेदी केंद्रावरच शेतकऱ्यांना धान विक्रीचे पहिल्यांदाच बंधन घालण्यात आले असल्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे.प्राप्त माहितीनुसार तालुक्यात खरेदी विक्री समिती, विजय कापगते यांचे राईस मिल, लक्ष्मी सहकारी धान गिरणी, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, नवेगावबांध, महागाव, वडेगाव व धाबेटेकडी या आठ ठिकाणी आधारभूत हमीभाव धान खरेदी केंद्र सुरू आहेत. धान खरेदी केंद्रांना इलेक्ट्रानिक वजनकाटे पुरविण्यात आले. मागील खरीप हंगाम धानखरेदीपर्यंत या वजनकाट्यांचा वापर करण्यात आला. मात्र सध्या सुरू असलेल्या धान खरेदीसाठी साध्या वजनकाट्यावरच मोजमाप केलेले परवडते. इलेक्ट्रानिक्स वजनकाट्यावर अधिकचे धान लुटण्याची सुविधा नसते. यासाठी चार्र्जींगची समस्या सांगून धान खरेदी करणाऱ्या संस्था हेतू पुरस्सर इलेक्ट्रानिक्स वजनकाट्याचा वापर टाळतात. अर्जुनी मोरगाव येथील धान खरेदी केंद्रावर मार्केटिंग अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या डोळ्यादेखत ४० किलो ऐवजी ४१ किलो वजन ठेवून मोजमाप केले जात आहे. याशिवाय बारदानाच्या मोबदल्यात बारदानाऐवजी पोते मांडून वजनकाटा केला जात असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. बारदान्याचे वजन ६०० ग्रॅम असते तर पोत्याचे वजन एक किलोवर असते. यात सुद्धा ४०० ग्रॅमपेक्षाही अधिक वजन दर ४० किलोमागे घेतले जाते, अशी ओरड आहे. या व्यतिरिक्त वजन करत असताना झुकते माप घेतले जात असल्याची तक्रार आहे. दररोज संध्याकाळी धान खरेदी बंद झाल्यानंतर प्रत्येक पोत्यांचे वास्तविक वजना करुन उर्वरित धान काढले जातात. हा अतिरिक्त लाभ असल्याचे समजते. दैनंदिन या प्रक्रियेत संस्थांना मोठा आर्थिक लाभ होत असल्याच्या चर्चा आहेत.धान विक्रीसाठी तालुक्यातील सर्वच गावांची आठ धान खरेदी केंद्रात समावेश असलेली गावनिहाय यादी जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयाकडून तयार करण्यात आली आहे. यापूर्वी कोणत्याही गावच्या शेतकऱ्याला आपल्या सोईनुसार नजीकच्या धान खरेदी केंद्रावर धान विक्रीची मुभा होती. मात्र आता ठराविक केंद्रावरच विक्री करावयाची असल्याने शेतकऱ्यांची अडचण होत आहे. दर एकरी १० क्विंटल धान खरेदी केंद्रामार्फत सातबाराच्या उताऱ्यावर घेतले जातात. परंतु १५ ते २० क्विंटल प्रमाणे धान खरेदी केले पाहिजे असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कामाच्या मोबदल्यात मजूरवर्ग हा शेतकऱ्यांकडून धान घेत नाही. त्ळााल रोखट मजुरी द्यावी लागते. तरी सुद्धा शासन दर एकरी १० क्विंटलच शेतकऱ्यांकडून धान खरेदी करतो. त्यामुळे अधिकच्या उत्पादित धानाला व्यापाऱ्यांकडे कवडीमोल भावात विक्री करावे लागत आहे. (तालुका प्रतिनिधी)