शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

धान खरेदीत शेतकऱ्यांची लूट

By admin | Updated: May 22, 2016 01:36 IST

गैरप्रकार थांबवा : शेतकऱ्यांची जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांकडे तक्रार

नवेगावबांध : अर्जुनी मोरगाव तालुक्यात खरेदी विक्री संस्थेकडून चालविण्यात येणाऱ्या हमी भाव धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे. मात्र जनप्रतिनिधी व संचालक तोंडाला पट्टी बांधून बसलेले आहेत. सविस्तर वृत्त असे की, अर्जुनी मोरगाव तालुक्यात खरेदी विक्री संस्थेमार्फत विविध ठिकाणी धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यामध्ये नवेगावबांध कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमी भाव धान खरेदी केंद्र सुरू आहे. सदर केंद्रावर शासनाचे नियम धाब्यावर देवून मनमानीपणे व्यापाऱ्यांशी संगणमत करुन खुलेआम शेतकऱ्यांची लूट होत आहे. शासनाच्या नियमानुसार धान खरेदी केंद्रावर वजन काटे हे इलेक्ट्रॉनिक्स असायला पाहिजे, पण नवेगावबांध या धान खरेदी केंद्रावर साध्या काट्यानेच धान खरेदी सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून हमाल प्रतिकट्टा दीड ते दोन किलोने काटा मारतात. कट्टा हा ४० किलोचा मोजायला पाहिजे पण तो ४२ ते ४३ किलो मोजल्या जाते व काट्या मागे शेतकऱ्यांची २ ते ३ किलोने लूटमार होते. शेतकऱ्यांनी धान आणल्यानंतर त्याला धान ठेवण्याची व्यवस्था, पोच पावती देणे, टोकण देणे, शासनाचे धान खरेदी केंद्राचे नियम पटवून देणे या गोष्टी केल्या जात नाही व शेतकऱ्यांची दिशाभूल करुन व्यापाऱ्यांचे धान वाम मार्गाने रेडीमेट काट्यांमध्ये मोजून आणून गोडावूनमध्ये ठेपल्या जातात.यावर्षी शेतकऱ्याला उन्हाळी धानाचे उत्पन्न एकरी २० ते २२ क्विंटल झाले, परंतु धान खरेदी केंद्रावर एकरी पंधराच क्विंटल धान खरेदी केल्या जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उर्वरित धान विकायचा कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. धान खरेदी केंद्रावर प्राथमिक सुविधा देणे आवश्यक असतात. परंतु साधे थंड पिण्याचे पाणीही केंद्रावर उपलब्ध नाही. शेतकऱ्यांचे धान अस्ताव्यस्त पडलेले आहेत. अशा परिस्थितीत अवकाळी पाऊस आलाच तर होणाऱ्या नुकसानीला जबाबदार कोण? असाही प्रश्न निर्माण होत आहे.नवेगावबांध हे राजकीय वारसा लाभलेले गाव आहे. पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या क्षेत्रातील आहे. तसेच माजी आ. दयाराम कापगते हे याच गावचे आहेत. जि.प. सदस्य किशोर तरोणे, खरेदी विक्रीचे उपाध्यक्ष केवळराम पुस्तोडे, संचालक रघुनाथ लांजेवार, पं.स. सदस्य कोरेटी अशा अनेक नेत्यांची फौज नवेगावबांधसारख्या ठिकाणी असताना ही गैरव्यवस्था कशी? असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी हा गैरप्रकार थांबवावा व शेतकऱ्यांची होणारी लूट बंद करावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)