शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

धान खरेदीत शेतकऱ्यांची लूट

By admin | Updated: May 22, 2016 01:36 IST

गैरप्रकार थांबवा : शेतकऱ्यांची जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांकडे तक्रार

नवेगावबांध : अर्जुनी मोरगाव तालुक्यात खरेदी विक्री संस्थेकडून चालविण्यात येणाऱ्या हमी भाव धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे. मात्र जनप्रतिनिधी व संचालक तोंडाला पट्टी बांधून बसलेले आहेत. सविस्तर वृत्त असे की, अर्जुनी मोरगाव तालुक्यात खरेदी विक्री संस्थेमार्फत विविध ठिकाणी धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यामध्ये नवेगावबांध कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमी भाव धान खरेदी केंद्र सुरू आहे. सदर केंद्रावर शासनाचे नियम धाब्यावर देवून मनमानीपणे व्यापाऱ्यांशी संगणमत करुन खुलेआम शेतकऱ्यांची लूट होत आहे. शासनाच्या नियमानुसार धान खरेदी केंद्रावर वजन काटे हे इलेक्ट्रॉनिक्स असायला पाहिजे, पण नवेगावबांध या धान खरेदी केंद्रावर साध्या काट्यानेच धान खरेदी सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून हमाल प्रतिकट्टा दीड ते दोन किलोने काटा मारतात. कट्टा हा ४० किलोचा मोजायला पाहिजे पण तो ४२ ते ४३ किलो मोजल्या जाते व काट्या मागे शेतकऱ्यांची २ ते ३ किलोने लूटमार होते. शेतकऱ्यांनी धान आणल्यानंतर त्याला धान ठेवण्याची व्यवस्था, पोच पावती देणे, टोकण देणे, शासनाचे धान खरेदी केंद्राचे नियम पटवून देणे या गोष्टी केल्या जात नाही व शेतकऱ्यांची दिशाभूल करुन व्यापाऱ्यांचे धान वाम मार्गाने रेडीमेट काट्यांमध्ये मोजून आणून गोडावूनमध्ये ठेपल्या जातात.यावर्षी शेतकऱ्याला उन्हाळी धानाचे उत्पन्न एकरी २० ते २२ क्विंटल झाले, परंतु धान खरेदी केंद्रावर एकरी पंधराच क्विंटल धान खरेदी केल्या जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उर्वरित धान विकायचा कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. धान खरेदी केंद्रावर प्राथमिक सुविधा देणे आवश्यक असतात. परंतु साधे थंड पिण्याचे पाणीही केंद्रावर उपलब्ध नाही. शेतकऱ्यांचे धान अस्ताव्यस्त पडलेले आहेत. अशा परिस्थितीत अवकाळी पाऊस आलाच तर होणाऱ्या नुकसानीला जबाबदार कोण? असाही प्रश्न निर्माण होत आहे.नवेगावबांध हे राजकीय वारसा लाभलेले गाव आहे. पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या क्षेत्रातील आहे. तसेच माजी आ. दयाराम कापगते हे याच गावचे आहेत. जि.प. सदस्य किशोर तरोणे, खरेदी विक्रीचे उपाध्यक्ष केवळराम पुस्तोडे, संचालक रघुनाथ लांजेवार, पं.स. सदस्य कोरेटी अशा अनेक नेत्यांची फौज नवेगावबांधसारख्या ठिकाणी असताना ही गैरव्यवस्था कशी? असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी हा गैरप्रकार थांबवावा व शेतकऱ्यांची होणारी लूट बंद करावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)