शहरं
Join us  
Trending Stories
1
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
2
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
3
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
5
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
6
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
7
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
8
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
9
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
10
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
11
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
12
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
13
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
14
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
15
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
16
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
17
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
18
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
19
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
20
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश

वन महोत्सवात १४ लाख रोपट्यांची लागवड

By admin | Updated: July 13, 2016 02:27 IST

शासनाने १ जुलै रोजी राज्यभरात दोन कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यात गोंदिया जिल्ह्याला १० लाख...

वन विभागाची उद्दिष्टपूर्ती : वृक्षारोपणासाठी खोदले १० लाख ५४ हजार ६१६ खड्डे गोंदिया : शासनाने १ जुलै रोजी राज्यभरात दोन कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यात गोंदिया जिल्ह्याला १० लाख ५४ हजार ६१६ वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. जिल्ह्यात त्या उद्दीष्टापेक्षा जास्त रोपट्यांची लागवड झाली. यासोबतच १ ते ७ जुलैदरम्यान साजऱ्या झालेल्या वनमहोत्सवादरम्यान विविध ठिकाणी वृक्ष लागवडीत भर पडून ही संख्या १४ लाखांच्या घरात पोहोचल्याची माहिती उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर यांनी दिली. पर्यावरणाचे संतुलन कायम राखण्याच्या उद्देशाने शासनाने राज्यभर वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविला. यात जिल्ह्यातील सर्वच यंत्रणांनी सहभाग घेतला. वन विभाग गोंदियाला सात लाख ४८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. वन विभागाने आपल्या ७४ साईट्समध्ये सात लाख ४८ हजार रोपट्यांची लागवड करून सदर उद्दिष्टाची पूर्तता केली. वन विभागाशी निगडीत इतर विभागांनाही वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यात सामाजिक वनीकरण विभागाला २९ हजार, वन विकास महामंडळाला ३१ हजार ८००, नवेगाव-नागझिरा वन्यजीव विभागाला १९ हजार ४६६ वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट मिळाले होते. या विभागांनी तेवढ्याच रोपट्यांची लागवड करून आपली उद्दिष्टपूर्ती केली. याशिवाय जिल्हाभरातील इतर २० यंत्रणांना दोन लाख २६ हजार ३५० वृक्षांच्या लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र दोन लाख २३ हजार ५३६ रोपट्यांचीच लागवड त्यांनी केली. सदर २० यंत्रणांकडून तब्बल दोन हजार ८१६ रोपट्यांची लागवड करण्यात आली नाही. अशाप्रकारे जिल्ह्यात एकूण १० लाख ५१ हजार ८०२ रोपट्यांची लागवड करण्यात आली. वृक्षारोपणाचे कार्य तर आटोपले. परंतु आता प्रमुख समस्या म्हणजे त्यांचे संरक्षण व संवर्धनाची आहे. ही जबाबदारी वन व्यवस्थापन समित्यांना देण्यात आली आहे. त्यांच्या संवर्धनासाठी नागरिकांमध्ये शासनाच्या वतीने आणखी जागृती आणणे गरजेचे आहे. अन्यथा लागवड केलेल्या रोपट्यांपैकी किती जिवंत राहतील व किती नष्ट होतील, भविष्यात हा एक शोधाचा विषय ठरणार आहे. (प्रतिनिधी)