शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

वन महोत्सवात १४ लाख रोपट्यांची लागवड

By admin | Updated: July 13, 2016 02:27 IST

शासनाने १ जुलै रोजी राज्यभरात दोन कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यात गोंदिया जिल्ह्याला १० लाख...

वन विभागाची उद्दिष्टपूर्ती : वृक्षारोपणासाठी खोदले १० लाख ५४ हजार ६१६ खड्डे गोंदिया : शासनाने १ जुलै रोजी राज्यभरात दोन कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यात गोंदिया जिल्ह्याला १० लाख ५४ हजार ६१६ वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. जिल्ह्यात त्या उद्दीष्टापेक्षा जास्त रोपट्यांची लागवड झाली. यासोबतच १ ते ७ जुलैदरम्यान साजऱ्या झालेल्या वनमहोत्सवादरम्यान विविध ठिकाणी वृक्ष लागवडीत भर पडून ही संख्या १४ लाखांच्या घरात पोहोचल्याची माहिती उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर यांनी दिली. पर्यावरणाचे संतुलन कायम राखण्याच्या उद्देशाने शासनाने राज्यभर वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविला. यात जिल्ह्यातील सर्वच यंत्रणांनी सहभाग घेतला. वन विभाग गोंदियाला सात लाख ४८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. वन विभागाने आपल्या ७४ साईट्समध्ये सात लाख ४८ हजार रोपट्यांची लागवड करून सदर उद्दिष्टाची पूर्तता केली. वन विभागाशी निगडीत इतर विभागांनाही वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यात सामाजिक वनीकरण विभागाला २९ हजार, वन विकास महामंडळाला ३१ हजार ८००, नवेगाव-नागझिरा वन्यजीव विभागाला १९ हजार ४६६ वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट मिळाले होते. या विभागांनी तेवढ्याच रोपट्यांची लागवड करून आपली उद्दिष्टपूर्ती केली. याशिवाय जिल्हाभरातील इतर २० यंत्रणांना दोन लाख २६ हजार ३५० वृक्षांच्या लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र दोन लाख २३ हजार ५३६ रोपट्यांचीच लागवड त्यांनी केली. सदर २० यंत्रणांकडून तब्बल दोन हजार ८१६ रोपट्यांची लागवड करण्यात आली नाही. अशाप्रकारे जिल्ह्यात एकूण १० लाख ५१ हजार ८०२ रोपट्यांची लागवड करण्यात आली. वृक्षारोपणाचे कार्य तर आटोपले. परंतु आता प्रमुख समस्या म्हणजे त्यांचे संरक्षण व संवर्धनाची आहे. ही जबाबदारी वन व्यवस्थापन समित्यांना देण्यात आली आहे. त्यांच्या संवर्धनासाठी नागरिकांमध्ये शासनाच्या वतीने आणखी जागृती आणणे गरजेचे आहे. अन्यथा लागवड केलेल्या रोपट्यांपैकी किती जिवंत राहतील व किती नष्ट होतील, भविष्यात हा एक शोधाचा विषय ठरणार आहे. (प्रतिनिधी)