शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

ग्रामसभेत वृक्ष लागवड आराखड्याचे नियोजन

By admin | Updated: June 26, 2016 01:39 IST

ग्रामपंचायत सावरी येथे विशेष ग्रामसभा घेण्यात आली. या ग्रामसभेला जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार आवर्जुन उपस्थित होते.

सीईओंची उपस्थिती : शाळेकरिता दिले १० हजार ५०० वृक्षगोंदिया : ग्रामपंचायत सावरी येथे विशेष ग्रामसभा घेण्यात आली. या ग्रामसभेला जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार आवर्जुन उपस्थित होते. यावेळी वृक्ष लागवडीच्या कृतिबद्ध आराखड्याचे नियोजन करण्यात आले.याप्रसंगी पुलकुंडवार यांनी ग्रामसभेचे महत्त्व पटवून दिले. मानवाला प्राणवायूची गरज असते, तो वृक्षांपासून मिळतो. सन २०१९ पर्यंत आपल्याला ५० कोटी वृक्ष लावायचे आहेत. मराठवाड्यात पाणी नाही म्हणून मुलगी देत नाही. अशी वेळ गोंदियावासीयांवर येवू नये, असे त्यांची सांगितले. आपल्या मार्गदर्शनात पं.स. चे विस्तार अधिकारी रवींद्र पराते म्हणाले, झुडपी जंगले असून त्या ठिकाणी झाडे नाहीत. त्यामुळे पाणी जिरत नाही. त्यासाठी झाडे लावणे गरजेचे असल्याचे सांगितले. तर गटशिक्षणाधिकाऱ्यांनी, एक विद्यार्थी एक झाड लावावे. शाळेकरिता मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी १० हजार ५०० झाडे दिल्याचे सांगितले. ग्रामसभेला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पुलकुंडवार यांच्यासह गटविकास अधिकारी एस.के. वालकर, सहायक गटविकास अधिकारी नरेंद्र भांडारकर, सरपंच डुलेश्वरी पटले, उपसरपंच नरेंद्र चिखलोंडे, सदस्य प्रेमचंद बिसेन, पप्पू पटले, माजी सदस्य गजभिये आदी उपस्थित होते. या ग्रामसभेला जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी उपस्थित लावल्यामुळे गावकऱ्यांनी त्यांच्याकडे काही व्यथाही मांडल्या. सभेचे संचालन के.एस. शेंदूरकर यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. ५० टक्के महिला आरक्षणाचा आधार घेवून महिलांना बोलण्याची संधी दिली. त्यामुळे आम्हाला बोलायची संधी मिळाली नाही, असे सांगून काही पुरूषांनी यावेळी नाराजी व्यक्त केली. (जिल्हा प्रतिनिधी)