शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
4
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
5
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
6
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
7
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
8
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
9
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
10
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
11
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
12
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
13
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
14
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
15
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
16
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
17
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
18
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
19
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
20
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...

नागतलाव मार्गावर पडला खड्डा

By admin | Updated: May 18, 2017 00:06 IST

खातीया-बटाना-आंभोरा नागतलाव मार्गावर पडलेल्या खड्यामुळे केव्हा अपघात होण्यात शक्यता नाकारता येत नाही.

लोकप्रतिनिधी उदासीन : सहा महिन्यांपासून संबंधित विभागाचे दुर्लक्ष लोकमत न्यूज नेटवर्क खातीया : खातीया-बटाना-आंभोरा नागतलाव मार्गावर पडलेल्या खड्यामुळे केव्हा अपघात होण्यात शक्यता नाकारता येत नाही. गेल्या पाच ते सहा महिन्यापासून पडलेल्या या खड्याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष आहे. संबंधित विभाग व लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन खड्डा बुजविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. शहरात येण्यासाठी खातीया, बिरसी, परसवाडा, झिलमिली, पांजरा, छिपीया, कामठा या गावाचे अनेक नागरिक, मजूर वर्ग याच रस्त्याने ये-जा करतात. हा मार्ग शहरात येण्यासाठी सरळ आहे. याच मार्गाने सर्व लोक आवागमन करीत असतात. रात्रीच्या वेळे आपले काम आटोपून याच रस्त्याने ते परतात. मात्र या खड्यामुळे कधीही अपघात घडू शकतो. अनेक वेळा अपघातही घडले आहेत. सुदैवाने आतापर्यंत कोणतीही जिवित हाणी झाली नाही. या खड्यामुळे मोठा अपघात होण्याची वाट तर संबंधित विभाग पाहत नाही ना अशी शंका नागरिकांना येत आहे. मागील पाच ते सहा महिन्यापासून हा खड्डा पडला आहे. काही दिवसात पावसाळा सुरू होणार आहे. पावसामुळे हा खड्डा धोकादायक होऊ शकतो. परिसरातील काही शेतकरी याच रस्त्याने आपल्या शेतात बैलगाडी घेवून जातात. या खड्यामुळे कधीही बैलबंडी उलटण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर खड्डा दुरुस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.