शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
4
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
5
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
6
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
7
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
8
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
9
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
10
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
11
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
12
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
13
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
14
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
15
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
16
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
17
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
18
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
19
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
20
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?

पाच दिवसात धानाची उचल करा, अन्यथा तीव्र आंदोलन ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:31 IST

गोंदिया : रब्बी हंगामातील धान बाजारपेठेत येऊन महिनाभराचा कालावधी लोटला तरी अद्यापही धान खरेदीचा तिढा पूर्णपणे सुटलेला नाही. खरीप ...

गोंदिया : रब्बी हंगामातील धान बाजारपेठेत येऊन महिनाभराचा कालावधी लोटला तरी अद्यापही धान खरेदीचा तिढा पूर्णपणे सुटलेला नाही. खरीप हंगामातील धानाची उचल झाली नाही तर ज्या संस्थांना धान खरेदी करण्याचे आदेश दिले आहे, त्यांचे गुदाम केवळ कागदावर आहे. एकंदरीत महाविकास आघाडी सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांना धानाची विक्री करावी लागत आहे. येत्या पाच दिवसात धानाची उचल करून धान खरेदीला सुरुवात न केल्यास या विरोधात भाजप तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.२६) येथे दिला.

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे बुधवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धान खरेदी तसेच कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, गोंदिया जिल्ह्यात यंदा रब्बीत ३२ लाख क्विंटल धान खरेदी होण्याची शक्यता आहे. धान खरेदी केंद्र सुरू झाल्याचे सांगितले जात असले तरी आतापर्यंत एकही क्विंटल धान खरेदी झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला. रब्बी धान खरेदी करण्यासाठी सहकारी संस्थांना आदेश देण्यात आले आहे. त्यांनी गुदाम उपलब्ध असल्याचे केवळ कागदावरच दाखविले असून, प्रत्यक्षात गुदामच उपलब्ध नाही. खरीप हंगामात खरेदी केलेला ३० लाख क्विंटलहून अधिक धानाची अद्यापही उचल झाली नाही. अशातच खरीप हंगाम तोंडावर असून, अवकाळी पावसाचे संकटदेखील कायम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना गरजेपोटी शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री न करता खासगी व्यापाऱ्यांना धानाची विक्री करावी लागत आहे. हे सर्व महाविकास आघाडी सरकारच्या चुकीच्या धोरणाचे फलित असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. शेतकऱ्यांची अडचण समजून घेत जिल्हाधिकाऱ्यांना येत्या पाच दिवसात संपूर्ण धानाची उचल करून रब्बीतील धान खरेदीला सुरुवात करण्यास सांगितले आहे. अन्यथा भाजपच्या वतीने कोरोनाचे नियम पाळून धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारादेखील देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिला. यावेळी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार सुनील मेंढे, माजी मंत्री राजकुमार बडोले,आमदार विजय रहांगडाले, आमदार परिणय फुके, माजी आमदार पालदास अग्रवाल, जिल्हाध्यक्ष केशव मानकर, माजी आमदार रमेश कुथे, संजय पुराम, संजय टेंभरे, वीरेंद्र अंजनकर उपस्थित होते.

..........

त्या धान खरेदी केंद्राची सीबीआयकडून चौकशी करणार

मागील वर्षी खरीप हंगामातील धान खरेदीत काही सहकारी संस्थांनी मोठ्या प्रमाणात घोळ केला होता. त्या संस्थांचा धान खरेदीचा परवाना रद्द करण्यात आला होता. मात्र महाविकास आघाडी सरकारने त्यांना पुन्हा धान खरेदीचा परवाना बहाल करीत भ्रष्टाचाराला वाव देण्याचा प्रयत्न केला आहे. हा संपूर्ण प्रकार चुकीचा असून, याची सीबीआयच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी यासाठी सीबीआयकडे तक्रार करून चौकशीची मागणी करणार असल्याचे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.