शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांना आशेचा किरण : राज्यात २१ लाख शेतकऱ्यांना होणार १,३५६ कोटी वाटप
2
आजचे राशीभविष्य, १८ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश मिळेल, वरिष्ठ खूश होतील! मान व प्रतिष्ठा वाढेल
3
"ओबीसींना आडवे येणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा, विजय वडेट्टीवार भूमिका स्पष्ट करा"; भुजबळ यांचे ओबीसी एल्गार सभेत आवाहन
4
२,३८५ कोटींची क्रिप्टोकरन्सी ईडीकडून जप्त, पाँझी स्किम उद्ध्वस्त; मास्टरमाइंडला अटक
5
‘सरसकट सीबीआय चौकशीचे आदेश देऊ नका’; सर्वोच्च न्यायालयाचा अन्य न्यायालयांना आदेश 
6
अभिमानास्पद! लढाऊ ‘स्वदेशी तेजस’ची गगनभेदी भरारी; संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते देशार्पण
7
गुजरातमध्ये नव्या मंत्रिमंडळात आता २६ मंत्री; १९ नवे चेहरे; नव्या मंत्र्यांचा शपथविधी; आठ मंत्री पटेल समाजाचे
8
Manoj Jarange: "ही ओबीसीची सभा नसून..." बीडमधील महाएल्गार सभेवर मनोज जरांगेंची टीका
9
Goa Cylinder Blast: दक्षिण गोव्यातील विजय मरीनमध्ये सिलेंडरचा स्फोट; २ ठार, ५ जखमी
10
एकजुटीचा प्रकाश... मनसेच्या 'दीपोत्सवा'त उद्धव ठाकरेंचं ५५ शब्दांचं भाषण, काय संदेश दिला?
11
Rivaba Jadeja Minister: रिवाबा जडेजा यांना कोणतं खातं मिळालं, गुजरातचे नवे गृहमंत्री कोण? खातेवाटप जाहीर
12
चीनमध्ये राजकीय धमाका! जिनपिंग यांचे 'उत्तराधिकारी' वेइडोंगना अचानक पदावरून हटवले, कारण...
13
खरं उद्धट कोण? बिग बींसमोर बसलेला १० वर्षांचा मुलगा, की... क्रिकेटरची विचार करायला भाग पाडणारी पोस्ट
14
'उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेलाय आणि उरले फक्त खान'; भाजपने राज ठाकरेंचा व्हिडीओच दाखवला
15
Politics: "क्षण आनंदाचा, सण नात्यांचा" ठाकरे कुटुंबाकडून दिवाळीच्या खास शुभेच्छा! फोटो व्हायरल
16
Naxal-free: 'आम्ही नक्षलवादी नाही' गडचिरोलीतील चारभट्टी गाव नक्षलमुक्त होताच गावकऱ्यांना अश्रू अनावर
17
दिसायला देवकन्या, पण काम न शोभणारं; अनेक तरुणांना प्रेमाची मिठी देणारी काजल पकडली
18
७५ बसस्थानकांवर मोफत 'वाचन कट्टा'; PM मोदींच्या 'पंचाहत्तरी'निमित्त एसटीचा अनोखा उपक्रम!
19
माझं तुझ्यावर प्रेम नाहीये..; तरूणीने दिला नकार; संतापलेल्या तरूणाने मग भररस्त्यातच...
20
महाराष्ट्र सरकारने गौमातेला दिलेला राज्य मातेचा दर्जा कागदावरच, स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची टीका 

पाच दिवसात धानाची उचल करा, अन्यथा तीव्र आंदोलन ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:31 IST

गोंदिया : रब्बी हंगामातील धान बाजारपेठेत येऊन महिनाभराचा कालावधी लोटला तरी अद्यापही धान खरेदीचा तिढा पूर्णपणे सुटलेला नाही. खरीप ...

गोंदिया : रब्बी हंगामातील धान बाजारपेठेत येऊन महिनाभराचा कालावधी लोटला तरी अद्यापही धान खरेदीचा तिढा पूर्णपणे सुटलेला नाही. खरीप हंगामातील धानाची उचल झाली नाही तर ज्या संस्थांना धान खरेदी करण्याचे आदेश दिले आहे, त्यांचे गुदाम केवळ कागदावर आहे. एकंदरीत महाविकास आघाडी सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांना धानाची विक्री करावी लागत आहे. येत्या पाच दिवसात धानाची उचल करून धान खरेदीला सुरुवात न केल्यास या विरोधात भाजप तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.२६) येथे दिला.

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे बुधवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धान खरेदी तसेच कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, गोंदिया जिल्ह्यात यंदा रब्बीत ३२ लाख क्विंटल धान खरेदी होण्याची शक्यता आहे. धान खरेदी केंद्र सुरू झाल्याचे सांगितले जात असले तरी आतापर्यंत एकही क्विंटल धान खरेदी झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला. रब्बी धान खरेदी करण्यासाठी सहकारी संस्थांना आदेश देण्यात आले आहे. त्यांनी गुदाम उपलब्ध असल्याचे केवळ कागदावरच दाखविले असून, प्रत्यक्षात गुदामच उपलब्ध नाही. खरीप हंगामात खरेदी केलेला ३० लाख क्विंटलहून अधिक धानाची अद्यापही उचल झाली नाही. अशातच खरीप हंगाम तोंडावर असून, अवकाळी पावसाचे संकटदेखील कायम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना गरजेपोटी शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री न करता खासगी व्यापाऱ्यांना धानाची विक्री करावी लागत आहे. हे सर्व महाविकास आघाडी सरकारच्या चुकीच्या धोरणाचे फलित असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. शेतकऱ्यांची अडचण समजून घेत जिल्हाधिकाऱ्यांना येत्या पाच दिवसात संपूर्ण धानाची उचल करून रब्बीतील धान खरेदीला सुरुवात करण्यास सांगितले आहे. अन्यथा भाजपच्या वतीने कोरोनाचे नियम पाळून धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारादेखील देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिला. यावेळी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार सुनील मेंढे, माजी मंत्री राजकुमार बडोले,आमदार विजय रहांगडाले, आमदार परिणय फुके, माजी आमदार पालदास अग्रवाल, जिल्हाध्यक्ष केशव मानकर, माजी आमदार रमेश कुथे, संजय पुराम, संजय टेंभरे, वीरेंद्र अंजनकर उपस्थित होते.

..........

त्या धान खरेदी केंद्राची सीबीआयकडून चौकशी करणार

मागील वर्षी खरीप हंगामातील धान खरेदीत काही सहकारी संस्थांनी मोठ्या प्रमाणात घोळ केला होता. त्या संस्थांचा धान खरेदीचा परवाना रद्द करण्यात आला होता. मात्र महाविकास आघाडी सरकारने त्यांना पुन्हा धान खरेदीचा परवाना बहाल करीत भ्रष्टाचाराला वाव देण्याचा प्रयत्न केला आहे. हा संपूर्ण प्रकार चुकीचा असून, याची सीबीआयच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी यासाठी सीबीआयकडे तक्रार करून चौकशीची मागणी करणार असल्याचे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.