शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पाच दिवसात धानाची उचल करा, अन्यथा तीव्र आंदोलन ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:31 IST

गोंदिया : रब्बी हंगामातील धान बाजारपेठेत येऊन महिनाभराचा कालावधी लोटला तरी अद्यापही धान खरेदीचा तिढा पूर्णपणे सुटलेला नाही. खरीप ...

गोंदिया : रब्बी हंगामातील धान बाजारपेठेत येऊन महिनाभराचा कालावधी लोटला तरी अद्यापही धान खरेदीचा तिढा पूर्णपणे सुटलेला नाही. खरीप हंगामातील धानाची उचल झाली नाही तर ज्या संस्थांना धान खरेदी करण्याचे आदेश दिले आहे, त्यांचे गुदाम केवळ कागदावर आहे. एकंदरीत महाविकास आघाडी सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांना धानाची विक्री करावी लागत आहे. येत्या पाच दिवसात धानाची उचल करून धान खरेदीला सुरुवात न केल्यास या विरोधात भाजप तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.२६) येथे दिला.

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे बुधवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धान खरेदी तसेच कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, गोंदिया जिल्ह्यात यंदा रब्बीत ३२ लाख क्विंटल धान खरेदी होण्याची शक्यता आहे. धान खरेदी केंद्र सुरू झाल्याचे सांगितले जात असले तरी आतापर्यंत एकही क्विंटल धान खरेदी झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला. रब्बी धान खरेदी करण्यासाठी सहकारी संस्थांना आदेश देण्यात आले आहे. त्यांनी गुदाम उपलब्ध असल्याचे केवळ कागदावरच दाखविले असून, प्रत्यक्षात गुदामच उपलब्ध नाही. खरीप हंगामात खरेदी केलेला ३० लाख क्विंटलहून अधिक धानाची अद्यापही उचल झाली नाही. अशातच खरीप हंगाम तोंडावर असून, अवकाळी पावसाचे संकटदेखील कायम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना गरजेपोटी शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री न करता खासगी व्यापाऱ्यांना धानाची विक्री करावी लागत आहे. हे सर्व महाविकास आघाडी सरकारच्या चुकीच्या धोरणाचे फलित असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. शेतकऱ्यांची अडचण समजून घेत जिल्हाधिकाऱ्यांना येत्या पाच दिवसात संपूर्ण धानाची उचल करून रब्बीतील धान खरेदीला सुरुवात करण्यास सांगितले आहे. अन्यथा भाजपच्या वतीने कोरोनाचे नियम पाळून धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारादेखील देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिला. यावेळी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार सुनील मेंढे, माजी मंत्री राजकुमार बडोले,आमदार विजय रहांगडाले, आमदार परिणय फुके, माजी आमदार पालदास अग्रवाल, जिल्हाध्यक्ष केशव मानकर, माजी आमदार रमेश कुथे, संजय पुराम, संजय टेंभरे, वीरेंद्र अंजनकर उपस्थित होते.

..........

त्या धान खरेदी केंद्राची सीबीआयकडून चौकशी करणार

मागील वर्षी खरीप हंगामातील धान खरेदीत काही सहकारी संस्थांनी मोठ्या प्रमाणात घोळ केला होता. त्या संस्थांचा धान खरेदीचा परवाना रद्द करण्यात आला होता. मात्र महाविकास आघाडी सरकारने त्यांना पुन्हा धान खरेदीचा परवाना बहाल करीत भ्रष्टाचाराला वाव देण्याचा प्रयत्न केला आहे. हा संपूर्ण प्रकार चुकीचा असून, याची सीबीआयच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी यासाठी सीबीआयकडे तक्रार करून चौकशीची मागणी करणार असल्याचे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.