शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

पीक पद्धतीत बदल गरजेचा

By admin | Updated: January 2, 2016 08:35 IST

धानाला भाव नाही, धान पिकविताना शेतकरी त्रस्त आहे. यावर्षी किडीने पिकांचे नुकसान केले असून दुष्काळ सदृश

आमगाव : धानाला भाव नाही, धान पिकविताना शेतकरी त्रस्त आहे. यावर्षी किडीने पिकांचे नुकसान केले असून दुष्काळ सदृश स्थिती निर्माण झाली आहे. अशात शेतकऱ्यांनी पिक पद्धतीत बदल करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी अथर्मंत्री महादेवराव शिवणकर यांनी केले. तालुक्यातील ग्राम धावडीटोला येथे बुधवारी आयोजित ‘जागो किसान’ कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या कार्यक्रमाला सेवानिवृत्त जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मनोहर चंद्रीकापुरे, माजी आमदार भेरसिंह नागपुरे, लखनसिंह कटरे, देवचंद तरोने, विद्या खेडीकर, तुकाराम बोहरे, नरेश माहेश्वरी, सिद्ध भट्टी प्रामुख्याने उपस्थित होते. पुढे बोलताना शिवणकर यांनी, पिक पद्धतीत बदल करताना वेळेचे सुद्धा नियोजन करने गरजेचे आहे. त्यामुळे पिकाला योग्य भाव मिळेल. अदरक, मिर्ची, शिमला मिर्ची, केळी, भाजीपाला, वांगे, टमाटर, कारले, गाजर, मुळा पिकामुळे नक्कीच आर्थिक स्थिती सुधारु शकते. ऊसाचे भाव दोन वर्षांपासून मिळाले नसून साखर कारखाने लुटत आहेत. त्याबरोबर शेतीत रासायनिक किटकनाशके व खतांऐवजी सेंद्रीय खतांचा वापर केल्यास रोगापासून नक्की सुटका होऊन उत्पादन खर्च कमी करता येतो. तसेच १०-१० शेतकऱ्यांचे गट करुन उत्पादीत माल थेट बाजारपेठेत गेल्यास उत्पादनाला योग्य भाव मिळेल असे मत मांडले. सिद्धभट्टी यांनी सांगितले की, आर्थिक बाजू पूर्ण करण्याकरिता जैन इरिगेशनच्या सकल बँकेकडून १२ टक्के व्याजाने कर्ज घेऊन शेती सुधारना करता येत असल्याचे सांगत, जैन ड्रिप इरिनेशन पीक पद्धती, कार्य उपलब्धता या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तर चंद्रीकापुरे यांनी, जिल्ह्याचे वातावरण व तापमान योग्य असल्यामुळे ३२ प्रकारची पिके घेता येऊ शकत असल्याचे सांगीतले. याप्रसंगी ग्राहक ते शेतकरी शेतातील माल शेतकऱ्यांचे क्लब स्थापन करुन शहरापर्यंत पोहोचविण्याचे, शिबिरे भरवून शेतकऱ्यांना जागृत करण्याचे ठरले. या कार्यक्रमाला सुमारे २०० शेतकरी सहभागी झाले होते. प्रास्तावीक शेतकरी धनराज हुकरे यांनी मांडले. संचालन सी.जी. पाऊलझगडे यांनी केले. आभार मुन्ना कटरे यांनी मानले. कार्यक्रमासाठी संतोष गायधने, सुनील बोळने, ऋषी चुटे यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)