शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा मंत्री अध्यक्ष, भारतीय संघ आशिया कपमध्ये खेळणार नाही; नाव माघारी घेतले... 
2
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या मुंबईकरांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
3
हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त
4
Rain Update : रत्नागिरीत सकाळपासूनच जोरदार, मुंबईत तुरळक पाऊस; राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट
5
Joe Biden : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सर! हाडांपर्यंत पोहोचला आजार
6
राज्यातील तब्बल आठ हजारांहून अधिक गावांत शाळाच नाही; केंद्राने शैक्षणिक परिस्थिती सुधारण्याचे दिले निर्देश
7
एलओसीवर मोठ्या हालचाली! पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी अन् लष्कर ए तोयबाची जमवाजमव; कारस्थान रचण्यास सुरुवात
8
ज्योती मल्होत्रा ​​आणि अरमान यांचा पाकिस्तानशी किती खोल संबंध? हरियाणा पोलिसांचा खुलासा
9
ऑपरेशन सिंदूरबद्दल वादग्रस्त वक्तव्य, प्राध्यापकाला अटक
10
मुख्य सचिव, पोलिसप्रमुख स्वागताला न आल्याने सरन्यायाधीश गवई नाराज; करून दिली प्रोटोकॉल, अनुच्छेद १४२ची आठवण
11
भीक मागितली, रस्त्यावर झोपला अन्..; अभिनेत्याची अवस्था पाहून चाहत्यांना धक्का, काय घडलं नेमकं?
12
‘आग’वार, २५ ठार... ! टॉवेल निर्मिती कारखान्यात होरपळून आठ जणांचा मृत्यू, तर ‘चारमिनार’लगतच्या इमारतीत १७ जणं गुदमरून ठार 
13
‘लष्कर’ कमांडर सैफुल्लाह याचा पाकिस्तानमध्ये ‘गेम’; नागपूरच्या संघ मुख्यालय हल्ल्याचा मास्टरमाइंड ठार
14
पाकिस्तानी गुप्तहेर नोमान इलाहीचे धक्कादायक खुलासे, टोळीत अनेकांचा समावेश
15
आर्थिक अडचणींमुळे अभिनय क्षेत्र सोडून झाला जादूगार? लोकप्रिय अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल, म्हणाला-
16
मदतीसाठी ‘आयएमएफ’च्या पाकिस्तानवर ११ नवीन अटी, भारतासोबत तणाव वाढल्यास उद्दिष्टपूर्ततेत धोके वाढण्याचा इशारा
17
पाक हेर ज्योती व ओडिशाच्या यूट्यूबरच्या संबंधाची चौकशी
18
"१० दिवसांपूर्वी पाकिस्तानला जाऊन आली,आता काश्मीरकडे..."; ज्योतीच्या हालचालींबद्दल आधीच आलेला संशय!
19
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
20
पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोनापेक्षाही गंभीर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरला मोठा फटका

पीक पद्धतीत बदल गरजेचा

By admin | Updated: January 2, 2016 08:35 IST

धानाला भाव नाही, धान पिकविताना शेतकरी त्रस्त आहे. यावर्षी किडीने पिकांचे नुकसान केले असून दुष्काळ सदृश

आमगाव : धानाला भाव नाही, धान पिकविताना शेतकरी त्रस्त आहे. यावर्षी किडीने पिकांचे नुकसान केले असून दुष्काळ सदृश स्थिती निर्माण झाली आहे. अशात शेतकऱ्यांनी पिक पद्धतीत बदल करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी अथर्मंत्री महादेवराव शिवणकर यांनी केले. तालुक्यातील ग्राम धावडीटोला येथे बुधवारी आयोजित ‘जागो किसान’ कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या कार्यक्रमाला सेवानिवृत्त जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मनोहर चंद्रीकापुरे, माजी आमदार भेरसिंह नागपुरे, लखनसिंह कटरे, देवचंद तरोने, विद्या खेडीकर, तुकाराम बोहरे, नरेश माहेश्वरी, सिद्ध भट्टी प्रामुख्याने उपस्थित होते. पुढे बोलताना शिवणकर यांनी, पिक पद्धतीत बदल करताना वेळेचे सुद्धा नियोजन करने गरजेचे आहे. त्यामुळे पिकाला योग्य भाव मिळेल. अदरक, मिर्ची, शिमला मिर्ची, केळी, भाजीपाला, वांगे, टमाटर, कारले, गाजर, मुळा पिकामुळे नक्कीच आर्थिक स्थिती सुधारु शकते. ऊसाचे भाव दोन वर्षांपासून मिळाले नसून साखर कारखाने लुटत आहेत. त्याबरोबर शेतीत रासायनिक किटकनाशके व खतांऐवजी सेंद्रीय खतांचा वापर केल्यास रोगापासून नक्की सुटका होऊन उत्पादन खर्च कमी करता येतो. तसेच १०-१० शेतकऱ्यांचे गट करुन उत्पादीत माल थेट बाजारपेठेत गेल्यास उत्पादनाला योग्य भाव मिळेल असे मत मांडले. सिद्धभट्टी यांनी सांगितले की, आर्थिक बाजू पूर्ण करण्याकरिता जैन इरिगेशनच्या सकल बँकेकडून १२ टक्के व्याजाने कर्ज घेऊन शेती सुधारना करता येत असल्याचे सांगत, जैन ड्रिप इरिनेशन पीक पद्धती, कार्य उपलब्धता या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तर चंद्रीकापुरे यांनी, जिल्ह्याचे वातावरण व तापमान योग्य असल्यामुळे ३२ प्रकारची पिके घेता येऊ शकत असल्याचे सांगीतले. याप्रसंगी ग्राहक ते शेतकरी शेतातील माल शेतकऱ्यांचे क्लब स्थापन करुन शहरापर्यंत पोहोचविण्याचे, शिबिरे भरवून शेतकऱ्यांना जागृत करण्याचे ठरले. या कार्यक्रमाला सुमारे २०० शेतकरी सहभागी झाले होते. प्रास्तावीक शेतकरी धनराज हुकरे यांनी मांडले. संचालन सी.जी. पाऊलझगडे यांनी केले. आभार मुन्ना कटरे यांनी मानले. कार्यक्रमासाठी संतोष गायधने, सुनील बोळने, ऋषी चुटे यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)