शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

पटेल हे दुसऱ्यांसाठी जगणारे व्यक्तिमत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2016 02:09 IST

मनोहरभाई पटेलांनी शिक्षणाची सोय करून देऊन जी सामाजिक भावना ठेवली, त्याच भावनेतून त्यांचे सुपुत्र प्रफुल्ल पटेल हे मार्गक्रमण करीत आहेत.

मान्यवरांच्या भावना : गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील १४ गुणवंतांचा सुवर्णपदकांनी सन्मानगोंदिया : मनोहरभाई पटेलांनी शिक्षणाची सोय करून देऊन जी सामाजिक भावना ठेवली, त्याच भावनेतून त्यांचे सुपुत्र प्रफुल्ल पटेल हे मार्गक्रमण करीत आहेत. ते दिल्लीत असले तरी नेहमी गोंदिया-भंडाऱ्याबद्दल बोलत असतात. आज येथे आल्यानंतर त्यांच्या कामांची झलक पहायला मिळाली. आपल्या भागाच्या विकासासाठी त्यांची तळमळ पाहून दंग झालो. पटेल हे दुसऱ्यांसाठी जगणारे व्यक्तिमत्त्व आहे, असे प्रशंसोद्गार इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातील प्रसिद्ध पत्रकार, मुलाखतकार रजत शर्मा तसेच माध्यम गुरू म्हणून प्रसिद्ध असणारे सुहेल सेठ यांनी काढले.येथील मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विशाल प्रांगणात शिक्षणमहर्षी मनोहरभाई पटेल यांच्या ११० व्या जयंती समारंभात मंगळवारी (दि.९) ते बोलत होते. प्रसिद्ध सिने अभिनेता आणि युवा दिलांची धडकन सलमान खान याच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा.प्रफुल्ल पटेल होते. यावेळी गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील १४ विद्यार्थ्यांना मनोहरभाई पटेल स्मृती सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले.यावेळी बोलताना माध्यम गुरू सुहेल सेठ म्हणाले, गोंदिया भारताची शान आहे. शिक्षणाच्या बाबतीत मनोहरभाईंनी जे स्वप्न पाहीले होते त्यामुळे १९८४ मध्येच गोंदियात ‘मेक इन इंडिया’ची सुरूवात त्यांनी केल्याचे दिसून येते. मी गेल्या २०-३० वर्षांपासून प्रफुल्ल पटेलांना ओळखतो. पण आज गोंदियात येऊन त्यांची खरी ओळख झाली, असे ते म्हणाले. रजत शर्मा यांनी बोलताना आज जर मी खा.पटेल यांच्या बोलवण्यावरून गोंदियात आलो नसतो तर मोठी गोष्ट ‘मिस’ केली असती असे सांगून मी गेल्या ३५-४० वर्षात अनेक गोष्टी बदलताना पाहील्या. पण प्रफुल्ल पटेलांना बदलताना पाहीले नाही, असे ते म्हणाले.प्रास्ताविक भाषणात खा.पटेल म्हणाले, नागपूर ते जबलपूरपर्यंतच्या पट्ट्यात कोणतेही कॉलेज नसताना आणि केवळ एक हायस्कूल असताना मनोहरभाईंनी गोंदिया शिक्षण संस्थेची स्थापना करून गोंदिया-भंडारा जिल्ह्यात शिक्षणाची दारे उघडली. आज प्रत्येक शाखेच्या अभ्यासक्रमासोबत १ लाख २० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत याचा मला अभिमान आहे. येथून शिकून गेलेले विद्यार्थी आज देश-विदेशात विविध क्षेत्रात सेवा देत आहेत. एके काळी या भागाला केवळ जंगल, आदिवासी प्रदेश आणि नक्षलवाद एवढीच ओळख होती. आज १८ हजार कोटींचा अदानी प्रकल्पांसह सिंचनाच्या सोयी वाढल्या आहेत. त्यामुळे पिकांमध्ये नवनवीन प्रयोग होत आहेत. या जिल्ह्याला विकासाच्या वाटेवर नेऊन विकसित जिल्हा अशी ओळख द्यायची आहे असे खा.पटेल म्हणाले. या कार्यक्रमाचे संचालन आ.राजेंद्र जैन यांनी केले.यावेळी मंचावर माजी मंत्री अनिल देशमुख, आ.गोपालदास अग्रवाल, माजी आ.दिलीप बन्सोड, बंडू सावरबांधे, विलास श्रृंगारपवार, नाना पंचबुद्धे, सेवक वाघाये, मधुकर कुकडे, अनिल बावनकर, वर्षाताई पटेल, हरिहरभाई पटेल आदी प्रामुख्याने उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)