शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

विद्यार्थ्यांच्या पळवापळवीसाठी पासवर्ड युद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:36 IST

संतोष बुकावन अर्जुनी मोरगाव : विद्यार्थ्यांच्या पळवापळवीसाठी आता शाळाशाळांत द्वंद्वयुद्ध पेटले आहे. आता काही शाळांच्या स्टुडंट पोर्टलच्या पासवर्डशी छेडछाड ...

संतोष बुकावन

अर्जुनी मोरगाव : विद्यार्थ्यांच्या पळवापळवीसाठी आता शाळाशाळांत द्वंद्वयुद्ध पेटले आहे. आता काही शाळांच्या स्टुडंट पोर्टलच्या पासवर्डशी छेडछाड होत असल्याचा गंभीर प्रकार घडत असल्याच्या चर्चेला ऊत आला आहे. पोर्टलच्या पासवर्डशी नेमका कोण छेडछाड करतो हा संशोधनाचा विषय आहे.

तालुक्यात बोगस विद्यार्थ्यांचा सद्या सुळसुळाट आहे. अनेक शाळांत एकच विद्यार्थी दोन शाळांत असल्याचे प्रकार आहेत. दरवर्षी ३० सप्टेंबरला विद्यार्थी पटनिर्धारण होत असते. या आधारावरच संच व शिक्षक मान्यता पदे ठरत असतात. पटसंख्या कायम राखण्यासाठी आता शाळांचा आटापिटा सुरू आहे. बोगस विद्यार्थी भरतीचा पर्दाफाश झाल्यानंतर अधिकच गंभीर प्रकार व्हायला सुरुवात झाली आहे. शासनाच्या शिक्षण विभागाने ३० सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अपडेट करण्याचे फर्मान सोडले आहे. यामुळे बोगस विद्यार्थ्यांचे बिंग फुटत आहे. आधारकार्ड अपडेट करताना अनेक विद्यार्थी आणखी कुठल्यातरी दुसऱ्या शाळेत शिकत असल्याचे पोर्टलवर संदेश येत आहेत. एखाद्या शाळेतील विद्यार्थी दुसऱ्या शाळेत प्रविष्ठ असल्यास रिक्वेस्ट पाठवावी लागते. ही रिक्वेस्ट दुसऱ्या शाळेने कन्फर्म करायची असते. त्याशिवाय शाळा बदल झाल्याचे पोर्टलवर दिसत नाही. ज्या शाळेत बोगस विद्यार्थी आहेत त्या शाळा आता संकटात सापडल्या आहेत. त्यामुळे पासवर्डशी छेडछाड करण्याचा अदभूत प्रकार आता होऊ घातला आहे. ज्या शाळेत आपल्या शाळेतील एखादा विद्यार्थी आहे. त्या शाळेचा पासवर्ड हस्तगत करायचा. आपल्या शाळेतील पासवर्ड आपल्याला माहिती असतोच. दोन्ही शाळेचे पासवर्ड असल्याने पोर्टल उघडून आपणच रिक्वेस्ट पाठवायची व दुसरा पोर्टल उघडून रिक्वेस्ट कन्फर्म करायची असे षडयंत्र सद्या सुरू आहेत. बुधवारी काही शाळांनी आपल्या शाळेचे पोर्टल उघडले तेव्हा पासवर्डशी छेडछाड झाल्याचा प्रकार लक्षात आला. दोन-तीनदा पासवर्ड रिसेट करूनही असाच प्रकार होत असल्याचे एका शिक्षकाने नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर सांगितले. परिसरातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक मिळून या गंभीर प्रकाराची गटशिक्षणाधिकारी यांचेकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

.............

अधिकाऱ्याचे मौन

तालुक्यात बोगस विद्यार्थ्यांचा सुळसुळाट सुरू असताना अधिकाऱ्यांचे मौन हा चर्चेचा विषय आहे. अजूनपर्यंत साधी चौकशी करण्याचे धाडस अधिकाऱ्यांनी दाखवू नये याचे आश्चर्य वाटते. अधिकारी नुसते सभा घेण्यातच खूश आहेत. विद्यार्थी पळवापळवीसाठी हे असले गंभीर प्रकार करण्यास एकप्रकारे अधिकारीच सवड देत असल्याचे दिसून येते.