शहरं
Join us  
Trending Stories
1
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
2
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
3
१२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
5
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
6
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
7
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
8
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
9
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
10
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
11
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
12
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
13
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
14
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
15
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
16
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
18
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
19
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
20
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?

ओवारा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांची हुकुमशाही

By admin | Updated: March 3, 2017 01:17 IST

ओवारा प्रकल्पाचे पाणी तालुक्यातील कवडी, सोनेखारी, वळद, येरमडा व इतर गावांना सिंचनासाठी मिळते.

शेतकरी समस्याग्रस्त : शेती पाण्याअभावी धोक्यातआमगाव : ओवारा प्रकल्पाचे पाणी तालुक्यातील कवडी, सोनेखारी, वळद, येरमडा व इतर गावांना सिंचनासाठी मिळते. मात्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांच्या हुकुमशाहीमुळे अनेक वेळा शेतकऱ्यांना फटका बसत असतो. येरमडा येथील शेतकऱ्यांना रबीकरिता पाणी देण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी रबीची लागवड केली, मात्र आता परिस्थिती गंभीर असून शेतकऱ्यांचे रबीतील पीक पाण्याअभावी वाळत आहे. त्या शेतकऱ्यांना तत्काळ पाणी देण्याची मागणी जि.प.सदस्य जियालाल पंधरे यांनी केली आहे. ओवारा प्रकल्पाचे पाणी परिसरातील शेतकऱ्यांना वेळोवेळी धान उत्पादनासाठी मिळत नाही. अनेकदा मागणी करून अधिकारी निमित्त करून पाणी देण्यासाठी टाळाटाळ करतात. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. परिणामी रबी असो की खरीप असो, शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही. ठिकठिकाणी कालवे फुटलेले आहेत, भेगा पडल्या आहे. मात्र अधिकारी आपल्या मनमर्जीने पाणी सोडतात. काळव्याचे काम जेव्हा अधिकाऱ्यांनी वेळ मिळतो तेव्हा करतात. मात्र शेतकऱ्यांची समस्या कशा प्रकारे सोडविली जाऊ शकते, याचे नियोजन अधिकाऱ्यांना नाही. अनेकदा समस्यांचे निवेदन देऊन समाधान काढत नाही. अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन समस्या सोडविण्याची मागणी पंधरे यांनी केली असुन कार्यालयावर मोर्चा काढण्याची तयारी त्यांनी केली आहे.(तालुका प्रतिनिधी)