शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्पन्न वाढवण्याचा 'मोदी मंत्र'! पंतप्रधानांचा शेतकऱ्यांना सल्ला; ३५,४४० कोटी रुपयांच्या दोन मोठ्या योजना सुरू
2
भारतावर टीका करणाऱ्यांवर डोनाल्ड ट्रम्प खुश; पाकिस्तानच्या जनरलचं पुन्हा कौतुक केलं
3
आजचे राशीभविष्य- १४ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ होतील, कुटुंबात आनंदी वातावरण राहील!
4
कामगारांसाठी आनंदवार्ता! आता पीएफमधून १००% रक्कम काढता येणार, 'ईपीएफओ'चा निर्णय
5
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
6
अखेर युद्ध थांबले; हमास-इस्रायल शांतता प्रस्ताव अमलात; २० इस्रायली ओलिसांची सुटका; २ हजार पॅलेस्टाइन बंदिवानही सोडले
7
खड्यांमुळे मृत्यू, तर कुटुंबाला ६ लाख भरपाई; रस्त्यांवरील खड्यांना अधिकारी, कंत्राटदार जबाबदार : उच्च न्यायालय
8
संपूर्ण मुंबईतील वाहतूककोंडी अखेर फुटणार; तब्बल ७० किमी भुयारी मार्गांचे जाळे उभारणार
9
चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास; टाटा समूहाचा निवृत्ती धोरणापलीकडचा विचार; टाटा सन्सची मंजुरी अपेक्षित
10
टाटा कॅपिटलची शेअर बाजारात एन्ट्री; मूल्यांकन १.३८ लाख कोटी
11
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
12
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
13
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
14
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
15
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
16
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
17
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
18
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
19
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
20
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी

महिला शेतकऱ्याने फुलविली सेंद्रिय बागायत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:32 IST

संडे स्पेशल संतोष बुकावन अर्जुनी मोरगाव : प्रत्येकाला आवडीनुसार विशिष्ट क्षेत्रात काम करण्याची इच्छा असते. यासाठी मनुष्य जीवाचे रान ...

संडे स्पेशल

संतोष बुकावन

अर्जुनी मोरगाव : प्रत्येकाला आवडीनुसार विशिष्ट क्षेत्रात काम करण्याची इच्छा असते. यासाठी मनुष्य जीवाचे रान करतो. हल्ली महिलांनी सुद्धा प्रत्येक क्षेत्रात उडी घेतली आहे. बहुधा आवड म्हणून नव्हे तर नाईलाजाने ग्रामीण भागात महिला कृषी क्षेत्राकडे वळतात. मात्र अर्जुनी मोरगावच्या निता ओंकार लांजेवार या उच्च शिक्षण घेऊनही वैशिष्ट्यपूर्ण शेती करतात हे इतरांसाठी प्रेरणादायी आहे.

सध्या उत्पादन वाढीसाठी शेतात रासायनिक खते, कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू आहे. यामुळे दैनंदिन आहार हे सुद्धा विषयुक्त झाले आहे. सत्वहीन आहाराची सवय माणसाला जडत आहे. हल्ली अन्नधान्य,भाजीपाला,फळे हे शुद्ध असतील यावर विश्वासार्हता राहिली नाही. उत्पादन व त्यातून कमी उत्पन्न झाले तरी चालेल पण सेंद्रिय शेतीच करणार असे बोटावर मोजण्याइतके शेतकरी उरले आहेत. त्यातील एक म्हणजे निता लांजेवार. निता यांनी ब्राम्हणटोला शिवारात एक एकर शेती विकत घेतली. अर्जुनी मोरगाव तालुका धान शेतीचा आहे. निता यांनी पद्धतशीर नियोजन केले. त्यांनी शेतात ठिबक सिंचनाची सुविधा केली. शंभर टक्के सेंद्रिय शेती करण्याचा निर्धार केला.

...................

फळबाग व फुल शेतीचा साधला संयोग

निता यांनी एक एकर क्षेत्रात मिश्र भाजीपाला, फळबाग व फुल शेतीचा अत्यंत सुंदर संयोग साधला आहे. त्यांनी या शेतात झुकिनी, वाल, ठेमसा मिरची, आमरस, गवार, भेंडी, चवळी शेंगा, भुईमूग, तूर, मका, स्वीटकॉर्न, वांगी, कारले, कोहळा, काकडी, दोडके, लवकी, मुळा, गाजर, सांभार, तोंडली, मेथी, पालक, तीळ, टमाटर, फुलकोबी, पत्ताकोबी, पोपट,तूर आदी भाजीपाला लागवड केली. फुल झाडांमध्ये झेंडू व निशिगंध लागवड आहे. फळझाडात आंबा, चिकू, फणस, लिची, पेरू, ॲपल बोर, आवळा, पपई, सीताफळ, रामफळ, मलबेरी,शेवगा, नारळ, काजू या झाडांची लागवड केली.

..............

शेतातून थेट ग्राहकांपर्यंत

सेंद्रिय शेतीतून उत्पादित झालेला भाजीपाला पसंत करणारी अनेक लोक आहेत. अशा लोकांचे मोबाईल क्रमांक घेऊन एक व्हाॅट्सॲप ग्रुप तयार करण्यात आला. या ग्रुपवर आज उपलब्ध असलेल्या भाजीपाल्याची नोंद केली जाते. इच्छुक व्हाॅट्सॲप धारक मोबाईलवर हव्या असलेल्या भाजीची नोंदणी करतात. जितकी नोंदणी झाली तेवढ्याच भाजीची तोडणी केली जाते. तेवढी भाजी पॅकिंग करून दिली जाते. शेतमाल शेतातून थेट ग्राहकांपर्यंत पोहोचतो.

........

खर्च कमी-उत्पादन कमी

शेणखताचा वापर होत असल्याने लागवडीचा खर्च अत्यंत कमी असतो. उत्पादन सुद्धा कमीच होते. मात्र आपण लोकांना विषमुक्त भाजी उपलब्ध करून देतो याचे मनोमन समाधान लाभते. जाणवा येथे सुद्धा एक एकर शेती आहे. तिथे सेंद्रिय शेतीतून तुलसी बासमती व रेड राईसची लागवड केली आहे.

- निता ओंकार लांजेवार, महिला शेतकरी अर्जुनी मोरगाव

210821\img-20210821-wa0012.jpg

महिला शेतकऱ्याने फुलविली सेंद्रिय बागायत