शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

कारागृहात बंदीजनांच्या परिश्रमातून फुलतेय सेंद्रिय शेती

By admin | Updated: November 14, 2016 00:19 IST

येथील मध्यवर्ती कारागृृहातील बंदीजनांच्या परिश्रमातून सेंद्रिय शेती फुलत आहे.

आॅनलाईन खरेदीमुळे दलालांची कोंडी: प्रत्येक सातबाराची होणार तपासणीसालेकसा : यंदापासून शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावरील धान खरेदी आॅनलाईन करण्यात आलेली असून आता सातबाऱ्यावर खरी नोंद असल्याप्रमाणेच धान खरेदी केली जाईल. केंद्रावर धान विक्री करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याच्या सातबाऱ्याची प्रथम नोंदणी केली जाईल व त्यानंतर त्या सातबाऱ्याची शासकीय रेकार्डप्रमाणे महसूल विभागात नोंद असलेल्या जमिनीच्या सातबाऱ्याची पडताळणी केली जाईल. त्यामुळे सातबारा खोडतोड करणारे किंवा खोटा सातबारा बनवून वाटेल तेव्हा विक्री करणारे दलाल जाळ्यात सापडल्याशिवाय राहणार नाही. आदिवासी सेवा सहकारी संस्था अंतर्गत शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर आदिवासी शेतकऱ्यांचे निर्धारित भावात धान खरेदीसाठी सोय केली जाते. परंतु शासनाची दिशाभूल करीत काही व्यापारी व दलाल शेतकऱ्यांचे धान पडक्या भावात खरेदी करुन व त्यांचे सातबारा मागून त्यांचेच धान आधारभूत खरेदी केंद्रावर विक्री करण्याचे काम करीत राहिले. तसेच या दलालांकडे धानाचा सात बाऱ्यावर आणखी सातबाऱ्यांची गरज पडल्यास खोटे सातबारा उतारा तयार केले. किंवा खऱ्या सातबाऱ्याची खोडतोड करुन त्यात जमिनीचे प्रमाण वाढविण्याचा गोरखधंदा व्यापारी वर्गाने चालविला आहे. परंतु आता खोटा सातबारा मुळीच चालणार नसून याचा थेट फायदा शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता वाढली आहे. मात्र धान खरेदी केंद्रांनी सुद्धा शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक करुन सातबाराधारक शेतकऱ्यांचे धान खरेदी करुन त्यांच्या शेतमालाला योग्य भाव देण्याचे काम केले पाहिजे. (तालुका प्रतिनिधी)एकदाच करावी लागणार सातबाराची नोंदधान विक्री झालेल्या शेतकऱ्याच्या सातबाऱ्याची नोंद एकदाच करावी लागणार असून प्रति हेक्टर ३० क्विंटल धानाची विक्री सदर शेतकरी करु शकतो. समजा त्याने पहिल्या वेळी कमी धान विक्री केली आणि पुन्हा धान विक्री करायला आल्यास विक्री मर्यादा अनुसार त्याला पुन्हा सातबारा आणून नोंदणी करण्याची गरज नाही. जर त्याने ३० क्विंटलपेक्षा जास्त धान विक्री साठी आणले व सातबाऱ्याची मर्यादा संपली तर त्याला गरज पडल्यास दुसऱ्या जमिनीच्या सातबारा उतारा आणून नोंदणी करावी लागेल. तसेच महत्वाचे आणि फायद्याचे म्हणजे यंदा ज्या शेतकऱ्यांनी सातबारा नोंदणी केली त्याला पुढच्यावर्षी त्या सातबाऱ्याची नोंदणी करण्याची गरज राहणार नाही. नोंदणी झालेल्या सातबाऱ्याच्या मर्यादेनुसार ते आपला शेतमाल खरेदी केंद्रावर आणून विक्री करु शकतील. विपणन विभागाने धान खरेदी व सातबारा नोंदणीबद्दल एक मोबाईल अ‍ॅप तयार केला असून त्या अ‍ॅपनुसार मागील सर्व माहिती पुन्हा बघता येणार तसेच संबंधित शेतकऱ्याच्या नावे नोंद असलेली शेतजमीन किती याची सगळी माहिती प्राप्त होणार आहे.