शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
3
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
4
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
5
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
6
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
7
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
8
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
9
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
10
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
11
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
12
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
13
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
14
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
15
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
16
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
17
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
18
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
19
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
20
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा

मुंबईत मिळाले केवळ तोंडी आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 01:06 IST

तालुक्यातील कवलेवाडा, कालीमाती व झंकारगोंदी या गावांतील नागरिकांनी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या त्वरीत मार्गी लावण्यात याव्या, अन्यथा जुन्याच गावात जावून राहण्याचा इशारा प्रशासनाला या गावातील पूर्वाश्रमीच्या श्रीरामनगरवासीयांनी दिला.

ठळक मुद्देजुन्या गावात परतण्याचा इशारा : श्रीरामनगरवासीयांचे पाचव्या दिवशीही आंदोलन सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्कसडक अर्जुनी : तालुक्यातील कवलेवाडा, कालीमाती व झंकारगोंदी या गावांतील नागरिकांनी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या त्वरीत मार्गी लावण्यात याव्या, अन्यथा जुन्याच गावात जावून राहण्याचा इशारा प्रशासनाला या गावातील पूर्वाश्रमीच्या श्रीरामनगरवासीयांनी दिला. तसेच मागील चार दिवसांपासून जंगलातच आंदोलन सुरू केले आहे.दरम्यान आंदोलकांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी (दि.१) आंदोलकांच्या शिष्टमंडळाला मुंबई येथे बोलविण्यात आले होते. मात्र तिथे सुध्दा ठोस नव्हे तर तोंडी आश्वासन मिळाले. त्यामुळे पाचव्या दिवशी श्रीरामनगरवासीयांचे आंदोलन सुरूच होते. पूर्वाश्रमीच्या कलवेवाडा, झंकारगोंदी, कालीमाती येथील गावकऱ्यांनी आपल्या मुलाबाळांसह सोमवारपासून (दि.२५) गावाकडे जाणाऱ्या मार्गावरील जंगलातच आंदोलन सुरू केले आहे. श्रीरामनगरवासीयांनी त्यांना सोयी सुविधा उपलब्ध करुन न देण्यात आल्याने आपल्या पूर्वीच्या कवलेवाडा, कालीमाती व झंकारगोंदी या गावात जावून राहण्याचा इशारा देत सोमवारी (दि.२५) गावांच्या दिशेने कुच केली. मात्र वनविभागाने गावकऱ्यांचा संताप लक्षात घेत गावाकडे जाणाºया जंगलातील प्रवेशव्दारावर ताराचे कुंपण करुन गावकºयांना रोखून धरले, त्यामुळे श्रीरामनगरवासीयांनी सुध्दा माघार न घेता जंगलातील या मार्गावरच आपला मुक्काम ठोकला. जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाही. तोपर्यंत या ठिकाणाहून हटणार नाही अशी भूमिका घेतली आहे. तसेच मागील चार दिवसांपासून जंगलातच आपल्या मुलाबाळांसह मुक्काम ठोकला. जवळपास सहाशे गावकरी याच ठिकाणी तळ ठोकून आहेत. तिथेच स्वयंपाक तयार करीत असून याच ठिकाणी झोपत आहे.दरम्यान शुक्रवारी त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी त्यांना मुंबई येथे चर्चेसाठी बोलविण्यात आले होते. मात्र या चर्चेत सुध्दा केवळ तोंडी आश्वासन मिळाल्याने शिष्टमंडळाला रिकाम्या हातानेच परतावे लागेल.चर्चेसाठी गेलेले शिष्टमंडळ परत आल्यानंतर या आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले.