शहरं
Join us  
Trending Stories
1
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
2
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
3
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
4
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
5
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
6
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
9
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
10
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
11
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
12
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
13
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
15
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
20
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार

दुरूस्तीच्या नावावर फक्त खड्डे खोदकाम

By admin | Updated: September 6, 2014 23:56 IST

आमगाववासीयांसाठी वरदान ठरलेली येथील वाढीव पाणी पुरवठा योजना राजकीय खेळीमुळे मात्र आता शाप वाटू लागली आहे. घाईघाईने झालेल्या लोकार्पणानंतर लगेच पाईप लाईन फुटून पाण्याचा नासाडा यातून होत आहे.

आमगाव : आमगाववासीयांसाठी वरदान ठरलेली येथील वाढीव पाणी पुरवठा योजना राजकीय खेळीमुळे मात्र आता शाप वाटू लागली आहे. घाईघाईने झालेल्या लोकार्पणानंतर लगेच पाईप लाईन फुटून पाण्याचा नासाडा यातून होत आहे. यावर आळा घालण्यासाठी दुरूस्तीच्या नावावर आता मात्र जागोजागी खड्डे खोदकाम काम सुरू असल्याचा प्रकार दिसून येत आहे. आज शहराची लोकसंख्या २० हजार च्या घरात आहे. वाढत्या लोकसंख्येला लक्षात घेता शासनाने दोन कोटींची वाढीव पाणी पुरवठा योजना दिली. मात्र या योजनेला दुसऱ्या योजनेत समाविष्ट करण्याचा नाद अंगलट आल्याचा प्रकार घडला. योजनेची पाईप लाईन टाकण्याचे काम सुरूच असतानाच घाईघाईत या योजनेचे लोकार्पण करण्यात आले. शहरासाठी वरदान म्हणून या योजनेकडे बघितले जात होते. मात्र श्रेय लाटण्याचे राजकारण या योजनेसाठी शाप ठरू लागले आहे. नियोजन शून्य कारभारामुळेच एक ना एक विघ्न या योजनेच्या आडी येत आहे. काम अपूर्ण असूनही त्यातून पाणी पुरवठा सुरू केल्याने पाईप लाईन फुटून पाण्याचा नासाडा होऊ लागला आहे. पाणी वाचवाचा संदेश दिला जात असताना शहरात मात्र पाण्याचा खुलेआम अपव्यय होत आहे. दुरूस्ती करण्याचे काम हाती घेण्यात आले असून फक्त खड्डे खुदाईचा प्रकार सुरू असल्याचे बघावयास मिळत आहे. हा प्रकार मात्र आता शहरवासीयांत चिड निर्माण करीत आहे. खोदण्यात येत असलेल्या खड्यांमुळे नागरिकांना एकतर वाहतूकीला त्रास होत आहे. शिवाय पाणी पुरवठा खंडीत झाल्याने नागरिकांचा पारा चढला आहे. त्यात आता पाईप लाईनच्या दुरूस्तीचे सोंग केले जात असल्याने नागरिकांच्या सहनशक्तीचा अंत होऊन ज्वालामुखी कधी फुटतो हेच बघायचे आहे. (शहर प्रतिनिधी)