शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
3
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
4
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
5
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
6
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
7
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
8
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
9
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
10
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
11
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
12
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
13
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
14
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
15
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
16
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
17
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
18
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  
19
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
20
‘मद्यपान करून गाडी चालवणारे दहशतवादीच’, कुरनूल बस अपघातानंतर हैदराबादच्या पोलीस आयुक्तांचं परखड विधान

फक्त ३८.८६ टक्केच मतदान

By admin | Updated: May 30, 2016 01:34 IST

अवघ्या शहराचे लक्ष लागून असलेल्या शहरातील प्रभाग क्रमांक १ मधील पोटनिवडणुकीप्रती मतदारांत निरू त्साह दिसून आला.

गोंदिया : अवघ्या शहराचे लक्ष लागून असलेल्या शहरातील प्रभाग क्रमांक १ मधील पोटनिवडणुकीप्रती मतदारांत निरू त्साह दिसून आला. परिणामी या पोटनिवडणुकीत फक्त ३८.८६ टक्केच मतदान करण्यात आले. उन्हामुळे दिवसा मतदानासाठी मतदार बाहेर निघाले नसल्याचे दिसले. तर सायंकाळी मात्र मतदानात भर पडल्याचेही दिसून आले व त्यामुळेच १२ टक्के मतदानाची नोंद घेण्यात आली. रिंगणात असलेल्या सहा उमेदवारांचे भाग्य अखेर पेटीत बंद झाले. शहरातील प्रभाग क्रमांक १ मधील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक अनिल पांडे यांच्या मृत्यूमुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोटनिवडणूक घेण्यात आली. यांतर्गत रविवारी (दि.२९) मतदान घेण्यात आले. यासाठी प्रभागातील संत तुकाराम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात १ ते ४, जेठाभाई माणिकलाल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मुख्य शाखेत ५ ते ८, सरस्वती महिला विद्यालयात ९ व १० आणि नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयात ११ ते १३ असे एकूण १३ मतदान केंद्र ठेवण्यात आले होते. या पोटनिवडणुकीत एकूण १३ हजार १६७ मतदारांना मतदानाचा हक्क बजावयाचा होता. तर रिक्त झालेली ही जागा आपल्याकडे खेचून आणण्यासाठी रिंगणात असलेल्या प्रभागात राष्ट्रीय पक्षांपासून ते अपक्ष उमेदवारांनीही चांगलाच जोर लावला होता. त्यामुळे अवघ्या शहराचे लक्ष या पोटनिवडणुकीकडे लागून आहे. तर मदतानाला घेऊनही शहरवासीयांना उत्सुकता होती. मात्र फक्त ३८.८६ टक्केच मतदानाची नोंद घेण्यात आली आहे. यावरून मतदारांचा निरूत्साह दिसून आला असे म्हणणे वावगे ठरणार नाही. शिवाय कडक उन्हामुळेही मतदारांनी घराबाहेर निघणे टाळल्याचे कमी झालेल्या मतदानासाठी म्हणता येईल. विशेष म्हणजे झालेल्या मतदानांतर्गत सायंकाळी ३.३० ते ५.३० च्या राऊंडमध्ये १२ टक्के मतदानाची नोंद घेण्यात आली आहे. पोटनिवडणुकीतील या मतदानातंर्गत प्रत्येक केंद्रावर पोलिसांचा चोख बंदोबस्त दिसून आला. विशेष म्हणजे पोलीस विभागाचे अधिकारीही सातत्याने केंद्रांवर नजर ठेवून असल्याचेही दिसले. त्यामुळे शांततेत मतदान पार पडले. शिवाय अन्य काही तांत्रीक अडचणीही आल्या नसल्याची माहिती आहे. (शहर प्रतिनिधी)अशी आहे मतदानाची टक्केवारी मतदानांतर्गत संत तुकाराम महाविद्यालयात असलेल्या मतदान केंद्र क्रमांक १ वर ४०.४० टक्के, केंद्र क्रमांक २ वर ४४.५२ टक्के, केंद्र क्रमांक ३ वर ३७.२२ टक्के, केंद्र क्रमांक ४ वर ३८.५२ टक्के, जेठाभाई माणिकलाल हायस्कूलमधील केंद्र क्रमांक ५ वर ४०.४१ टक्के, केंद्र ६ वर ३९.८९ टक्के, केंद्र क्रमांक ७ वर ४०.३५ टक्के, केंद्र क्रमांक ८ वर ३४.६२ टक्के, सरस्वती विद्यालयातील केंद्र क्रमांक ९ वर ४३.२७ टक्के, केंद्र क्रमांक १० वर ३८.०१ टक्के तर नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयातील केंद्र क्रमांक ११ वर ४६.३८ टक्के, केंद्र क्रमांक १२ वर २७.९२ टक्के व केंद्र क्रमांक १३ वर ३५. ४६ टक्के मतदान झाले. नमाद महाविद्यालयात सर्वाधिक मतदान १३ केंद्रांवर घेण्यात आलेल्या मतदानातंर्गत नमाद महाविद्यालयात देण्यात आलेल्या मतदान केंद्र क्रमांक ११ वर सर्वाधीक ४६.७८ टक्के मतदानाची नोंद घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे याच महाविद्यालयातील मतदान केंद्र क्रमांक १२ वरच सर्वात कमी २७.९२ टक्के मतदानाची नोंद घेण्यात आली आहे. मतमोजणीकडे लागले लक्ष पोटनिवडणुकीची मतमोजणी सोमवारी (दि.३०) सकाळी १० वाजतापासून हिंदी टाऊन स्कूल परिसरातील स्वर्ण जयंती इमारतीत घेण्यात येणार आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला आपली जागा कायम ठेवता येते की नाही. शिवाय कुणाच्या गळ्यात विजयाची माळ पडते हे जाणून घेण्याची उत्सुकता वाढली असून सर्वांचे लक्ष आता मतमोजणीकडे लागले आहे.