शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
4
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
5
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
6
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
7
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
8
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
9
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
10
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
11
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
12
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
13
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
14
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
15
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
16
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
17
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
18
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
19
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
20
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी

सर्वसामान्यांना रडवतोय कांदा

By admin | Updated: August 22, 2015 00:21 IST

बाजारात हिरवी मिरची आणि लाल मिरचीचे दर तेजीत आहेत. हिरवी मिरची ४० रुपये किलो तर लाल मिरची ११० रुपये किलो आहे. मिरची तिखट १६० रुपये किलो आहे.

४० ते ५० रुपये किलो कांदा : अवकाळी पावसाचा फटकाबाजारात हिरवी मिरची आणि लाल मिरचीचे दर तेजीत आहेत. हिरवी मिरची ४० रुपये किलो तर लाल मिरची ११० रुपये किलो आहे. मिरची तिखट १६० रुपये किलो आहे. याउलट स्थिती साखरेची आहे. साखरेचे दर ३२ रूपयावरून घसरून २५ रूपयापर्र्यंत घसरले आहेत. यामुळे साखरेचा गोडवा आणखी वाढणार असल्याचे दिसून येत आहे. डाळी कडाडल्या..४कडधान्य बाजार सर्वाधिक तेजीत आहे. यामध्ये पावसाळ्यात सर्वाधिक खरेदी होणाऱ्या डाळी महागल्या आहेत. यामुळे सर्वसामान्यांना त्या खरेदी करणेही अशक्य झाले आहे. सर्वाधिक विक्री तूर डाळीची होते. तूर डाळीने १०० चा आकडा पार केला आहे. ७० रूपयांपासून ते ११० रूपयांपर्यंत तूर डाळ विकली जात आहे. उडीद डाळ १०० रुपये किलोच्या घरात आहे. मूग डाळ ९० रुपये तर मूगाचा सोल १०० रूपयांच्या घरात आहे. मसूर डाळ ८० रुपये किलो आहे. हरभरा ६० रुपये, वटाना ५० रुपये तर बरबटी ६० रुपये किलो दराने विकली जात आहे. सर्वांचेच भाव वाढले आहे. गोंदिया : गारपीट आणि अवकाळी पावसाने राज्यातील दोन लाख टन कांदा सडला. त्याचा परिणाम आता बाजारपेठेवर जाणवू लागला आहे. सर्वसामान्यांच्या भोजनाचा अविभाज्य घटक असलेला कांदा यावर्षी वाढीव दराने रडविणार आहे. गत आठवड्यात ३० ते ३२ रुपये किलोच्या घरात असलेला कांदा या आठवड्यात ४० रूपयांपर्यंत वधारला आहे. या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यासोबतच बाजारात डाळींचे दरही कडाडले आहेत. हे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत.गतवर्षी लागवड करण्यात आलेला कांदा राज्यात वाया गेला. याचा परिणाम बाजारपेठेवर झाला आहे. जिल्ह्यातील कांद्याचे क्षेत्रही मोठ्या प्रमाणात घटल्याने बाजारात कांद्याचे दर चढले आहेत. ठोक बाजारात कांद्याचे दर ३० ते ३२ रुपये होते. चिल्लर बाजारात कांद्याचे दर ४० रुपये किलोच्या घरात राहीले. कांद्याच्या दरात झालेल्या दरवाढीने सर्वसामान्यांना मोठा फटका बसणार आहे. बहुतांश नागरिकांनी उन्हाळ्यात कांद्याचा साठा करून ठेवला. २५ ते ५० किलोपर्यंत १० ते १५ रुपये किलो दरात कांद्याची खरेदी केली. आता हा साठा संपत आल्याने त्यांना ४० रुपये किलोच्यावर दराने कांद्याची खरेदी करावी लागणार आहे. कांद्यांचा भाव गगणाला भिडल्याने सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे. पुढे कांद्याचे भाव आणखी चढणार असल्याचे दिसून येत आहे. (शहर प्रतिनिधी)