कपिल केकत
गोंदिया : रस्त्यावर वाहन चालविण्यासाठी काही नियम ठरवून देण्यात आले असून, ते स्वत:सहसमोरील व्यक्तीच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे आहेत. या अत्यंत महत्त्वाचा नियम म्हणजे वाहन सावकाश चालविणे. कारण भरधाव वेगात वाहन चालविणाऱ्यांचेच सर्वाधिक अपघात होतात व त्यातून कित्येकदा जिवावर बेतते हे दिसून येते. मात्र त्यानंतरही कित्येकच जण या नियमाचे उल्लंघन करून वाहनाने भरधाव वेगात चालवून स्वत:ला अति शहाणा ठरवून घेण्याचा प्रयत्न करतात. मात्र अशा लोकांवर आता महामार्ग पोलीस नजर ठेवून आहे व नियम तोडल्यास मात्र त्यांना दंड भरावा लागतो. या वर्षात महामार्ग पोलिसांनी अशा स्पीड लिमिट मोडणाऱ्या १०,१४४ वाहनांवर कारवाई केली असून, त्यांना एक कोटी एक लाख ४४ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
-----------------------------
महामार्गावर कोणत्या महिन्यात किती दंड
महिना दंड
जानेवारी- १५०००००
फेब्रुवारी- १६०००००
मार्च- १३०००००
एप्रिल- ००
मे- ३०४०००
जून- १६५००००
जुलै- २२९००००
ऑगस्ट- १५०००००
--------------------
धावत्या गाडीचा मोजा जातो वेग
महामार्गावर भरधाव वेगात धावणाऱ्या गाड्यांवर नजर ठेवण्यासाठी महामार्ग पोलिसांच्या वाहनावरच इंटरसेप्टर मशीन लावण्यात आले आहे. हे मशीन महामार्गाने ये-दा करणाऱ्या वाहनांना टिपत असते. अशात एखादे वाहन ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त वेगात जात असल्याने तेही मशीनमध्ये टिपले जाते व त्यावर कारवाई केली जाते.
----------------------------
एसएमएसवर मिळते माहिती
आजघडीला सर्वच क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान आले असून यात पद्धतीने महामार्ग पोलीसही अंमलात आणत आहेत. एखाद्या वाहनावर कारवाई करायची असल्यास त्या गाडीच्या क्रमांकावर संपूर्ण माहिती महामार्ग पोलिसांना मिळते. त्यानुसार महामार्ग पोलिसांकडून वाहनमालकाच्या मोबाइलवर मॅसेज पाठवून कळविते.