शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

मुख्याध्यापकाची पालकांशी अपमानास्पद वागणूक

By admin | Updated: December 20, 2015 01:54 IST

तिरोडा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या अत्री येथील वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकाने आपल्या मनमर्जीने शासन....

 आरोप : व्यवस्थापन समिती केली गठितपरसवाडा : तिरोडा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या अत्री येथील वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकाने आपल्या मनमर्जीने शासन नियमांची पायमल्ली केली. हिटलरशाहीने १० महिन्याचा कार्यकाल लोटूनही शाळा व्यवस्थापन समिती गठित केली नाही. तसेच विद्यार्थ्यांच्या पालकाशी अपमानस्पद वागणूक केल्याची बाब पुढे आली आहे. फेब्रुवारी २०१३ मध्ये शाळा समिती गठित करण्यात आली होती. तिचा कार्यकाल २०१५ फेब्रुवारी होता. दोन वर्षाची मुदत असल्याने जानेवारीमध्ये पालक सभा घेऊन नवीन समिती गठित करणे बंधनकारक होते. पण मुख्याध्यापक व शाळा समितीचे अध्यक्ष यांची साठगाठ असल्याने समिती गठित न करता जुन्याच समितीची पुनर्नियुक्ती करून कार्यकाल वाढवून दिला. हे सर्व नियमबाह्य असून लाखो रूपयांचा आर्थिक व्यवहारही यात झाला आहे.शाळेत व्यायामशाळा, क्रीडांगण सपाटीकरण, वर्गखोलीचे काम समितीमार्फत करण्यात येत असल्याने समितीचा दर्जा व अध्यक्षांच्या सहीने आर्थिक व्यवहार होत असल्याने समितीला अधिक महत्व आले आहे. पालकांनी आक्षेप घेतला असता मुख्याध्यापक अंबुले यांनी ११ डिसेंबर रोजी पालक सभा समिती गठित करण्यासाठी बोलावली. पालकही सभेत आले. पण मुख्याध्यापकाने सत्ताधारी अध्यक्षांच्या दबावाखाली येवून समिती गठित केली नाही. उलट पालकाशी असभ्य वागणूक करून सभा न घेता तुम्हाला वाटेल ते करा, माझा कोणी काहीच करू शकत नाही, अधिकारी व नेते माझे आहेत, तुम्ही घरी जाऊ शकता, मला वाटेल ते करीन, असे म्हणत शाळेतून पसार झाले. गावात मुख्याध्यापक अंबुले यांच्याविरूध्द तणावाचे वातावरण निर्माण झाले. शिक्षक गावात राजकारण करत असून शिक्षणाचे धडे न शिकवता विद्यार्थ्यांना आता मुख्याध्यापक पालकांना राजकारणाचे धडे शिकवित आहे. आता पालकांनी आपली मुले शाळेत न पाठविण्याचा व शाळा बंद करण्याचा पवित्रा घेतल्याचे निलकंठ परिहार, ज्ञानेश्वर बिसेन, राजेश परिहार, बिजेवार व अन्य ५८ पालकांनी सांगितले. मुख्याध्यापक अंबुले व अध्यक्ष बिसेन यांची साठगाठ व समितीला विश्वासात न घेता दहा लाखांच्या जवळपास आर्थिक कामे करून इमारत, क्रीडांगण, व्यायामशाळेच्या कामात भ्रष्टाचार केला आहे. त्याचे पितळ उघडे होऊ नये म्हणून नवीन समिती गठित करण्यात आली नाही, असे पालकांनी लोकमत प्रतिनिधीला सांगितले. सदर मुख्याध्यापक व अध्यक्षावर कारवाई करण्याची मागणी पालकवर्ग गावकऱ्यांनी केली आहे. मुख्याध्यापक अंबुले यांच्याशी संपर्क केला असता समितीचा कार्यकाल संपला असून त्यात आपली चूक झाली. पण समिती ११ डिसेंबर रोजी सरपंच नसल्याने व गावकऱ्यांच्या गदारोळामुळे झाली नाही. यात भ्रष्टाचार आर्थिक व्यवहार नसल्याचे सांगितले. अंबुले, सरपंच माहुरे यांच्याशी संपर्क केला असता मुख्याध्यापक यांनी समितीबद्दल पालकांची सभा घेण्याचे नोटीस दिले. पण हेतुपुरस्कर मुख्याध्यापकांनी सभा पूर्ण होवू दिली नाही. (वार्ताहर)