शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

सरपंचपदाच्या आरक्षणावर हरकत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अर्जुनी-मोरगाव : नुकत्याच सरपंच पदाच्या झालेल्या आरक्षण सोडतीत धाबेटेकडी ग्रामपंचायतीमध्ये अनुसूचित जमातीवर अन्याय झाल्याने येथील देवाजी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अर्जुनी-मोरगाव : नुकत्याच सरपंच पदाच्या झालेल्या आरक्षण सोडतीत धाबेटेकडी ग्रामपंचायतीमध्ये अनुसूचित जमातीवर अन्याय झाल्याने येथील देवाजी कुंभरे यांनी या आरक्षणावर हरकत घेतली आहे. प्रशासनाने सतत होणाऱ्या या अन्यायाची दखल घेऊन आरक्षणात बदल करण्याची मागणी त्यांनी तहसीलदारांकडे केली आहे.

सरपंच पदासाठीची आरक्षण सोडत गुरुवारी (दि. २८ जानेवारी) काढण्यात आली. यात २००५पासून प्रत्येक ग्रामपंचायतींचा सरपंच पदाचा आरक्षण घोषवारा तयार करण्यात आला. त्यानुसार २०२० ते २०२५ या कालावधीसाठी सरपंचांचे आरक्षण ठरविण्यात आले. धाबेटेकडी ग्रामपंचायतीमध्ये २००५ ते २०१०करिता सरपंचपद अनुसूचित जमातीकरिता राखीव असल्याचे घोषवाऱ्यात दाखवले गेले, प्रत्यक्षात ते सर्वसाधारणकरिता राखीव होते. यामुळे २०१० ते २०१५, २०१५ ते २०२० आणि २०२० ते २०२५मध्येही सतत चुका होत गेल्या. यामुळे अनुसूचित जमातीचे आरक्षण निघालो नाही. हा घोषवारा प्रशासनाकडून तयार करण्यात आला असून, तो चुकीचा आहे व हा घोळ घोषवारातील चुकीमुळे झाला आहे. यावर कुंभरे यांनी आक्षेप घेतला असून, तातडीने यात सुधारणा करण्याची मागणी त्यांनी जिल्हाधिकारी व तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.