शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

बाधितांच्या संख्येत चार दिवसानंतर परत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:30 IST

गोंदिया : गेल्या तीन चार दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत बरीच घट झाली होती. रुग्णसंख्या दीडशेच्या आतच होती. मात्र मंगळवारी ...

गोंदिया : गेल्या तीन चार दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत बरीच घट झाली होती. रुग्णसंख्या दीडशेच्या आतच होती. मात्र मंगळवारी पुन्हा रुग्णसंख्येत थोडी वाढ झाली आहे. मात्र बाधितांपेक्षा मात करणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने थोडा दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यात मंगळवारी (दि. १८) ३१० बाधितांनी कोरोनावर मात केली तर १९० नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. चार बाधितांचा उपचार दरम्यान शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. मागील पंधरा ते वीस दिवसांच्या तुलनेत जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आला असून कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे समाधानकारक चित्र आहे. मंगळवारी आढळलेल्या १९० रुग्णांमध्ये सर्वाधिक ८७ रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहे. तिरोडा ६, गोरेगाव ४, आमगाव ३०, सालेकसा १६, देवरी २८, सडक अर्जुनी १, अर्जुनी मोरगाव १५, बाहेरील ३ रुग्णांचा समावेश आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत १,४५,८६१ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १,२०,८९७ नमुने निगेटिव्ह आले आहे. कोरोना बाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. या अंतर्गत १,४७,४०० नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १,२६,७८० नमुने निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३९,६५१ कोरोना बाधित आढळले असून यापैकी ३६,२५१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत २,७५५ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून ८३३ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.

...........

आतापर्यंत २ लाख ९३ हजार २६१ चाचण्या

कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने चाचणी करण्यासाठी नागरिक आता स्वत:हून पुढे येत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २ लाख ९३ हजार २६१ कोरोना चाचणी करण्यात आल्या. त्यापैकी २ लाख ४७ हजार ६७७ नमुने निगेटिव्ह आले आहे.

..........

बाधितांच्या मृत्यूचे सत्र सुरुच

कोरोनाचा संसर्ग बऱ्याच प्रमाणात आटोक्यात येत असला बाधितांच्या मृत्यूचे सत्र मात्र कायमच आहे. त्यामुळे बाधितांच्या मृत्यू दरात सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र आहे. सद्यस्थितीत बाधितांचा मृत्यूदर १.६२ टक्के आहे.

.............

जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट १८ टक्क्यांवर

एप्रिल महिन्यात कोरोना बाधितांचा आलेख चांगलाच उंचावला होता. तर मात करणाऱ्यांची संख्या कमी होती. त्यामुळे पॉझिटिव्हिटी रेट ३२ टक्क्यांवर गेला होता. पण मे महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णसंख्येत घट होत असल्याने हा दर आता १८ टक्क्यांवर आला आहे.