शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

बाधितांच्या संख्येत चार दिवसानंतर परत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:30 IST

गोंदिया : गेल्या तीन चार दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत बरीच घट झाली होती. रुग्णसंख्या दीडशेच्या आतच होती. मात्र मंगळवारी ...

गोंदिया : गेल्या तीन चार दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत बरीच घट झाली होती. रुग्णसंख्या दीडशेच्या आतच होती. मात्र मंगळवारी पुन्हा रुग्णसंख्येत थोडी वाढ झाली आहे. मात्र बाधितांपेक्षा मात करणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने थोडा दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यात मंगळवारी (दि. १८) ३१० बाधितांनी कोरोनावर मात केली तर १९० नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. चार बाधितांचा उपचार दरम्यान शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. मागील पंधरा ते वीस दिवसांच्या तुलनेत जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आला असून कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे समाधानकारक चित्र आहे. मंगळवारी आढळलेल्या १९० रुग्णांमध्ये सर्वाधिक ८७ रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहे. तिरोडा ६, गोरेगाव ४, आमगाव ३०, सालेकसा १६, देवरी २८, सडक अर्जुनी १, अर्जुनी मोरगाव १५, बाहेरील ३ रुग्णांचा समावेश आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत १,४५,८६१ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १,२०,८९७ नमुने निगेटिव्ह आले आहे. कोरोना बाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. या अंतर्गत १,४७,४०० नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १,२६,७८० नमुने निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३९,६५१ कोरोना बाधित आढळले असून यापैकी ३६,२५१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत २,७५५ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून ८३३ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.

...........

आतापर्यंत २ लाख ९३ हजार २६१ चाचण्या

कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने चाचणी करण्यासाठी नागरिक आता स्वत:हून पुढे येत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २ लाख ९३ हजार २६१ कोरोना चाचणी करण्यात आल्या. त्यापैकी २ लाख ४७ हजार ६७७ नमुने निगेटिव्ह आले आहे.

..........

बाधितांच्या मृत्यूचे सत्र सुरुच

कोरोनाचा संसर्ग बऱ्याच प्रमाणात आटोक्यात येत असला बाधितांच्या मृत्यूचे सत्र मात्र कायमच आहे. त्यामुळे बाधितांच्या मृत्यू दरात सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र आहे. सद्यस्थितीत बाधितांचा मृत्यूदर १.६२ टक्के आहे.

.............

जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट १८ टक्क्यांवर

एप्रिल महिन्यात कोरोना बाधितांचा आलेख चांगलाच उंचावला होता. तर मात करणाऱ्यांची संख्या कमी होती. त्यामुळे पॉझिटिव्हिटी रेट ३२ टक्क्यांवर गेला होता. पण मे महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णसंख्येत घट होत असल्याने हा दर आता १८ टक्क्यांवर आला आहे.