शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

घटत चालली मुलींची संख्या

By admin | Updated: October 26, 2015 01:47 IST

मुलींना वाचविण्यासाठी शासन-प्रशासन सर्व प्रयत्न करीत आहेत. मात्र यानंतरही क्रूरता आपली सीमा सोडू शकली नाही.

१,००५ वरून ९२४ पर्यंत लिंगदरात घटलोकमत विशेष

दिेवानंद शहारे  गोंदियामुलींना वाचविण्यासाठी शासन-प्रशासन सर्व प्रयत्न करीत आहेत. मात्र यानंतरही क्रूरता आपली सीमा सोडू शकली नाही. केंद्र शासनाच्या आदेशानुसार यावर्षी १९ जानेवारीपासून ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियान सुरू झाले. यानंतरही जिल्ह्यात भयावह वास्तव समोर येत आहे. एकीकडे शिक्षण क्षेत्रात सुधारणा झाली व होत आहे. परंतु दुसरीकडे लिंगदरात विशेष सुधारणा दिसून येत नाही. सन २०११ मध्ये प्रति एक हजार पुरूषांमागे एक हजार पाच मुली होत्या. या संख्येत आता घट होऊन ही संख्या ९२४ वर आली आहे.‘डीएचआयएस-२’ च्या संबंधितांकडून मिळालेल्या संख्येनुसार, वर्ष २०१४-१५ मध्ये जिल्ह्यात १८ हजार ९६७ प्रसूतींमध्ये १९ हजार ८९ बालकांचा जन्म झाला. यात ९ हजार ७५८ मुले तर ९ हजार १६ मुलींचा समावेश आहे. त्यावर्षी केवळ डिसेंबर महिन्यात प्रति हजार पुरूषांमध्ये १ हजार २२ मुली होत्या. एप्रिल, मे, जून, जुलै, आॅक्टोबर, नोव्हेंबर व मार्च महिन्यात मुलींचा जन्मदर ९२३ ते ९७३ च्या दरम्यान नोंद करण्यात आला होता. आॅगस्टमध्ये ८९८, सप्टेंबरमध्ये ८९३, जानेवारीमध्ये ८५३ व फेब्रुवारीमध्ये सर्वात कमी ७९१ नोंद करण्यात आली होती. तर वर्ष २०१५-१६ मध्ये आतापर्यंतच्या लिंगदराच्या संख्येत सुधारणा दिसून येत आहे. प्रति एक हजार मुलांमागे ९७० मुलींचा जन्म झाला. मे, जून महिन्यात स्थिती उत्तम पाहण्यात आली. परंतु एप्रिल, जुलै, आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यांत स्थिती खूप वाईट राहिली. यावर्षी आतापर्यंत ८ हजार ९६४ प्रसूतींमध्ये ९ हजार ३१ बालकांचा जन्म झाला. यात ४ हजार ४८६ मुले व ४ हजार ३५२ मुलींचा समावेश आहे. उर्वरित बालकांचा मृत्यू जन्माबरोबरच झाला. अर्भकांच्या मृत्यूंत वाढजिल्ह्यात सन २०१४-१५ मध्ये आतापर्यंत लिंगदरामध्ये सुधारणा पाहण्यात आली आहे. परंतु नवजात बाळांच्या मृत्यूंची संख्या ०.४८ टक्के वाढली आहे. मागील वर्षी १९ हजार ८९ बालकांचा जन्म झाला होता. यापैकी ३१५ (१.६५ टक्के) अर्भकांचा मृत्यू झाला. तर यावर्षी आतापर्यंत नऊ हजार ३१ मधून १९३ (२.१३ टक्के) अर्भकांचा मृत्यू झाला आहे.