शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

आता फक्त तिरोडा तालुकाच ‘ग्रीन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:20 IST

गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरली असून, बाधितांची संख्याही आता अगदी कमी असल्याने दिलासादायक बाब आहे. मात्र, असे ...

गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरली असून, बाधितांची संख्याही आता अगदी कमी असल्याने दिलासादायक बाब आहे. मात्र, असे असतानाच जिल्ह्यातील कोरोनामुक्त झालेल्या तालुक्यांत पु्न्हा एकदा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. यामुळे आता फक्त तिरोडा तालुका कोरोनामुक्त उरला आहे. यावरून परिस्थिती नियंत्रणात असतानाच, तिसरी लाट टाळण्यासाठी खबरदारी अधिकच गरजेची झाली आहे.

कोरोनाची दुसरी लाट जिल्ह्यात ओसरली असून, जिल्ह्यात बाधितांची संख्या आता अगदी नाममात्र झाली आहे. यामुळे जिल्हावासी चांगलेच खूश असून, या आनंदाच्या भरात त्यांच्याकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. मात्र, हा प्रकार चांगला नसून, तिसऱ्या लाटेला घेऊन आता तज्ज्ञ व शासनाकडून वारंवार चेतावणी दिली जात आहे. राज्यातील कित्येक जिल्ह्यांत आजही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे पडसाद दिसून येतच आहेत. अशात बाधितांची संख्या कमी होत असल्याचे बघून अतिरेक करणे धोक्याचे ठरणार आहे. याची प्रचिती जिल्ह्यातच बघावयास मिळत आहे. कारण कोरोनामुक्त झालेल्या जिल्ह्यांत पुन्हा कोरोनाचा शिरकाव होत आहे. जिल्ह्यातील तिरोडा, देवरी, सडक-अर्जुनी व अर्जुनी-मोरगाव तालुका कोरोनामुक्त झाले होते. मात्र, आता तिरोडा सोडून अन्य तालुक्यांत पुन्हा कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील फक्त तिरोडा तालुका कोरोनामुक्त उरला आहे. म्हणजेच जिल्ह्यातून कोरोना गेलेला नाही, हे दिसून येत आहे.

----------------------------------

आता खबरदारीची खरी गरज

कोरोनाची दुसरी लाट काही भागांत आजही कहर करीत असल्याचे दिसत आहे. त्यात नियंत्रणात आलेल्या भागांमध्ये नागरिकांना निर्बंध शिथिल होताच, अतिरेक केल्यामुळे परिस्थिती पुन्हा गंभीर होताना दिसत आहे. यावरून आता शासनाने तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली आहे. म्हणजेच गर्दी होणार तर तिसऱ्या लाटेचा धोका वाढणार आहे. यासाठी आता नागरिकांनी अधिकच खबरदारीने वागण्याची गरज आहे. यासाठी नियमांचे पालन जास्त गरजेचे आहे.

-----------------------------------

व्यापाऱ्यांनो, सावधानी बाळगा

दुसऱ्या लाटेतील लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांचे चांगलेच नुकसान झाले, यात शंका नाही. त्यामुळे आता निर्बंध शिथिल होताच, व्यापारी आपल्या कामाला लागले आहेत. मात्र, या नादात ते नियमांना बगल देत असल्याचेही दिसून येत आहे. दुकानांत ना मास्क-ना सॅनिटायजर-ना शारीरिक अंतराचे पालन होत आहे. नागरिकांना नियमांचा विसर पडला आहे. मात्र, व्यापाऱ्यांनी सावधानी बाळगणे गरजेचे आहे. कारण परिस्थिती चिघळल्यास त्यांना पुन्हा कडक निर्बंधांचा फटका सहन करावा लागणार आहे.