शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
3
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
4
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ महत्वाच्या समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
5
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
6
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
7
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
8
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
9
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
10
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
12
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
13
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
14
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
15
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
16
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
17
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
18
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
19
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
20
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती

आता फक्त तिरोडा तालुकाच ‘ग्रीन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:20 IST

गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरली असून, बाधितांची संख्याही आता अगदी कमी असल्याने दिलासादायक बाब आहे. मात्र, असे ...

गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरली असून, बाधितांची संख्याही आता अगदी कमी असल्याने दिलासादायक बाब आहे. मात्र, असे असतानाच जिल्ह्यातील कोरोनामुक्त झालेल्या तालुक्यांत पु्न्हा एकदा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. यामुळे आता फक्त तिरोडा तालुका कोरोनामुक्त उरला आहे. यावरून परिस्थिती नियंत्रणात असतानाच, तिसरी लाट टाळण्यासाठी खबरदारी अधिकच गरजेची झाली आहे.

कोरोनाची दुसरी लाट जिल्ह्यात ओसरली असून, जिल्ह्यात बाधितांची संख्या आता अगदी नाममात्र झाली आहे. यामुळे जिल्हावासी चांगलेच खूश असून, या आनंदाच्या भरात त्यांच्याकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. मात्र, हा प्रकार चांगला नसून, तिसऱ्या लाटेला घेऊन आता तज्ज्ञ व शासनाकडून वारंवार चेतावणी दिली जात आहे. राज्यातील कित्येक जिल्ह्यांत आजही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे पडसाद दिसून येतच आहेत. अशात बाधितांची संख्या कमी होत असल्याचे बघून अतिरेक करणे धोक्याचे ठरणार आहे. याची प्रचिती जिल्ह्यातच बघावयास मिळत आहे. कारण कोरोनामुक्त झालेल्या जिल्ह्यांत पुन्हा कोरोनाचा शिरकाव होत आहे. जिल्ह्यातील तिरोडा, देवरी, सडक-अर्जुनी व अर्जुनी-मोरगाव तालुका कोरोनामुक्त झाले होते. मात्र, आता तिरोडा सोडून अन्य तालुक्यांत पुन्हा कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील फक्त तिरोडा तालुका कोरोनामुक्त उरला आहे. म्हणजेच जिल्ह्यातून कोरोना गेलेला नाही, हे दिसून येत आहे.

----------------------------------

आता खबरदारीची खरी गरज

कोरोनाची दुसरी लाट काही भागांत आजही कहर करीत असल्याचे दिसत आहे. त्यात नियंत्रणात आलेल्या भागांमध्ये नागरिकांना निर्बंध शिथिल होताच, अतिरेक केल्यामुळे परिस्थिती पुन्हा गंभीर होताना दिसत आहे. यावरून आता शासनाने तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली आहे. म्हणजेच गर्दी होणार तर तिसऱ्या लाटेचा धोका वाढणार आहे. यासाठी आता नागरिकांनी अधिकच खबरदारीने वागण्याची गरज आहे. यासाठी नियमांचे पालन जास्त गरजेचे आहे.

-----------------------------------

व्यापाऱ्यांनो, सावधानी बाळगा

दुसऱ्या लाटेतील लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांचे चांगलेच नुकसान झाले, यात शंका नाही. त्यामुळे आता निर्बंध शिथिल होताच, व्यापारी आपल्या कामाला लागले आहेत. मात्र, या नादात ते नियमांना बगल देत असल्याचेही दिसून येत आहे. दुकानांत ना मास्क-ना सॅनिटायजर-ना शारीरिक अंतराचे पालन होत आहे. नागरिकांना नियमांचा विसर पडला आहे. मात्र, व्यापाऱ्यांनी सावधानी बाळगणे गरजेचे आहे. कारण परिस्थिती चिघळल्यास त्यांना पुन्हा कडक निर्बंधांचा फटका सहन करावा लागणार आहे.