शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
2
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
3
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ पण मित्रांंसाठी खर्च कराल...
4
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
5
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
6
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
7
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
8
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
9
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
10
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
11
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
12
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
13
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
14
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
15
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
16
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
17
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
18
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
19
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
20
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून

आता नागरिक सरसावले तर लसींचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:18 IST

गोंदिया : जिल्ह्यात लसींचा साठा संपल्याने लसीकरणाला पूर्णपणे ब्रेक लागला होता. मात्र शुक्रवारी २६,६०० लसींचा पुरवठा होताच शनिवारी (दि.३) ...

गोंदिया : जिल्ह्यात लसींचा साठा संपल्याने लसीकरणाला पूर्णपणे ब्रेक लागला होता. मात्र शुक्रवारी २६,६०० लसींचा पुरवठा होताच शनिवारी (दि.३) थेट २१,४०८ नागरिकांनी लस घेतली आहे. यामुळे आता आरोग्य विभागाकडे सोमवारसाठी फक्त ५१९२ डोस उरले आहेत. यातून सोमवारी अर्धा दिवस लसीकरण होणार असून, त्यानंतर मात्र लसीकरण थांबवावे लागणार आहे. विशेष म्हणजे, सोमवारी लसींचा पुरवठा न झाल्यास मंगळवारी मात्र पुन्हा लसीकरणाला ब्रेक देण्याची वेळ येऊ शकते.

लसीकरणासाठी आतापर्यंत आरोग्य विभागाला नागरिकांची मनधरणी करण्याची गरज दिसून येत होती. शहरात याचे प्रमाण कमी असले तरी ग्रामीण भागात मात्र लसीकरणासाठी जनजागृती व घरोघर भेट देऊन नागरिकांना लसीकरणाबाबत समजावून त्यांना तयार करावे लागत होते. शिवाय जिल्ह्यात कित्येक ठिकाणी लसीकरण केंद्र देऊनही गावागावांत लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. मात्र त्यानंतरही नागरिक शिबिरात जाऊन लस घ्यायला तयार नसल्याचे दिसून आले. मात्र कोरोना लस घेतल्यानंतरच आपण सुरक्षित राहू शकतो याबाबत वृत्तपत्र व टीव्हीवरील माहितीमुळे नागरिकांत आता लसीकरणाला घेऊन जागृती आली आहे. यामुळेच आता जिल्ह्यात लसीकरणासाठी नागरिक सरसावत असल्याचे दिसत आहे, तर दुसरीकडे मात्र आता लसींचा नियमित व जास्त प्रमाणात पुरवठा होत नसल्यामुळे लसीकरणाला ब्रेक द्यावा लागत असल्याचे प्रकार घडत आहेत. लसींचा साठा संपल्यामुळे गुरुवारी व शुक्रवारी असेच काहीसे घडले. मात्र शुक्रवारी लसींचा पुरवठा होताच शनिवारी (दि.३) तब्बल २१,४०८ नागरिकांनी लस घेतल्याची नोंद आहे. म्हणजेच, लसीकरणासाठी नागरिक आता स्वत: पुढे येत असल्याचे यातून दिसून येते.

----------------------------------

सर्वच गटातील नागरिकांची धाव

लसींचा पुरवठा झाल्यानंतर जिल्ह्यातील नागरिक आता जागरूक झाल्याचे दिसून आले आहे. कारण, शनिवारी तब्बल २१,४०८ नागरिकांनी लस घेतली असून, यामध्ये सर्वच गटातील नागरिकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, शनिवारी १८-४४ गटात सर्वाधिक १५,७२० तरुणांनी लस घेतली असून, ४५-६० गटात ४२०३ तर ६० प्लस गटात १४७५ नागरिकांनी लस घेतली आहे. आता जिल्ह्यात ४,६१,८८४ नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

-------------------------------

अपुऱ्या लस पुरवठ्यामुळे यंत्रणा हतबल

शुक्रवारी मिळालेल्या २६,६०० डोसेसमधून शनिवारी २१,४०८ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. म्हणजेच, आरोग्य विभागाकडे आता ५१९२ डोस उरले असून, शनिवारचे आकडे बघता सोमवारी यातून अर्धा दिवसच लसीकरण करता येणार आहे. अशात सोमवारी लसींचा पुरवठा न झाल्यास मात्र मंगळवारी जिल्ह्यात पुन्हा लसीकरणाला ब्रेक देण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे आता नागरिकांना लस हवी असताना लसींचा तुटवडा जाणवू लागला आहे.