शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray Uddhav Thackeray Rally Live Update : ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! महाराष्ट्रभरातून मराठीप्रेमी मुंबईत, सभास्थळी मोठी गर्दी
2
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
3
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला. ती उदाहरणं देत साधला निशाणा
4
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
5
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
6
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
7
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
8
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
9
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
10
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
11
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
12
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
13
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
14
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
15
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
16
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
18
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
19
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
20
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय

आता लक्ष्य मारहाणमुक्त गावाचे

By admin | Updated: May 12, 2014 23:51 IST

व्यक्ती किंवा गटातील तंटे मिटवून गावात शांतता निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेला गावातील सज्जन व्यक्तींची साथ मिळाली.

गोंदिया : व्यक्ती किंवा गटातील तंटे मिटवून गावात शांतता निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेला गावातील सज्जन व्यक्तींची साथ मिळाली. या मोहिमेला महिलांचा हातभार लागल्याने गाव शांततेच्या मार्गावर चालू लागले आहे. तरीदेखील गावात मारहाणीची प्रकरणे वाढू लागली आहेत. या मारहाणीवर आळा घालण्यासाठी राज्य शासन आता मारहाणमुक्त गावाचे लक्ष्य ठेवत आहे.

गावात तंटे निर्माण होऊ नयेत यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेचे सदस्य प्रयत्न करीत असले तरी कौटुंबिक पातळीवरील वादांमध्ये तोडगा काढण्यावर तंटामुक्त समित्यांना र्मयादा येत आहेत. कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना चार भिंतींच्या आत होत असल्याने ही प्रकरणे वाढत आहेत. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले असले, तरी गावात शंभर टक्के शांतता प्रस्थापित झाली नाही. जुने तंटे मिटवून नवीन तंटे उद्भवणार नाहीत याची काळजी मोहीम राबविणारे नागरिकच घेत आहेत.

या पार्श्‍वभूमीवर पंचायतमधील महिला प्रशिक्षण आणि संघटनांच्या क्षेत्रात काम करणारी महिला राजसत्ता आंदोलने मारहाणमुक्त गाव ही संकल्पना राबवीत आहे. महिलांवरील हिंसाचाराच्या तक्रारी लक्षात घेता गावामध्ये ५0 सदस्य असतील. अशी राजसत्ता आंदोलनाची प्रत्येक गावात एक शाखा उघडली जाणार आहे. या शाखेची पंधरवड्यात एक बैठक घेण्यात येणार आहे. या शाखेकडे कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार आल्यावर प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला जातो. हे प्रकरण या शाखेकडे सुटले नाही तर ते महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीकडे येते. समितीत तडजोड झाले नाही तर हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंंत जाते. तेथेही तोडगा निघाला नाही तर तालुका पातळीवर शिष्टमंडळ तयार करून प्रयत्न केला जातो. समाजातील स्त्री किंवा पुरुषाला मारहाण केले जाऊ नये यासाठी प्रयत्न केले जातात. हा मारहाणीचा मुद्दा ग्रामसभेत मांडावा, एकमेकाने एकमेकाकडे लक्ष ठेवावे लागत आहे. कोणत्याही समस्येचा निकाल वर्षभरात लागावा, अशी या मागची भूमिका आहे. मारहाणमुक्त गावाबरोबर बालविवाहमुक्त गाव, भ्रूणहत्यामुक्त गाव याही संकल्पना राबविण्याचा मानस शासनाचा आहे. प्रत्येक घरात शांतता नांदण्यासाठी शासनाने उचललेले पाऊल योग्य आहे. (तालुका प्रतिनिधी)