शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

अनेक दिवसांपासून विजेचा बिघाडच सापडेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:28 IST

बाराभाटी : अनेक महिने झाले, अनेक दिवसही लोटून गेले पण परिसरात विद्युत व्यवस्था अद्यापही सुरळीत झालेली नाही. असे म्हणताच ...

बाराभाटी : अनेक महिने झाले, अनेक दिवसही लोटून गेले पण परिसरात विद्युत व्यवस्था अद्यापही सुरळीत झालेली नाही. असे म्हणताच येत नाही, विद्युत विभाग काय करतो, अशा प्रकारची उत्तम सेवा देतो की ग्राहकांना अंधारात राहावे लागते. अनेकवेळा विनाकारण वीज बंद केली जाते, मात्र बिघाडच सापडतच नाही, असा शब्द अनेक दिवसांपासून व महिन्यांपासून वीज ग्राहक ऐकत आहेत.

मागील वर्षाच्या ऑगस्ट- सप्टेंबरपासून या भागातील विद्युत विभागाला बिघाड असा कसा सापडत नाही, याला जबाबदार कोण ? या विभागाचे अधिकारी व कर्मचारी या अशा कारणासाठी अनेक महिने लावत असणार तर ग्राहकांनी काय करावे, नेमकी अडचण सापडत नाही, तर सेवा कशी उत्तम होणार ? असा गंभीर प्रश्न ग्राहक उपस्थित करीत आहेत. खंडित वीज पुरवठ्याने अनेक ग्राहक संतापले आहेत, अर्जुनी मोरगावच्या अधिकारी व कर्मचारी आणि लाईनमनला विचारणा करण्यासाठी फोन केला तर मोबाईल बंद, कव्हरेज बाहेर तर फोन उचलत नाही. विद्युत विभागाकडून चांगला प्रतिसाद मिळत नाही. दिवसभरात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होतो. मागील वर्षभरापासून हीच समस्या कायम आहे. मात्र अद्यापही वीज वितरण कंपनीला बिघाड सापडला नाही याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या भागाला ३३ केेव्हीचे सबस्टेशन असूनही अडचण आहे, देवरी, अर्जुनी मोरगावकडून आलेली वीज सुरळीत का राहत नाही काही कळेना. जिल्हा विद्युत अधीक्षक अभियंता गोंदिया व कार्यकारी अभियंता देवरी यांचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. मात्र याचा फटका वीज ग्राहकांना सहन करावा लागत आहे. बिघाडाच्या नावाखाली १७ तास, १२ तास, रात्रभर, दिवसभर वीज बंद केली जाते, तरी सुद्धा बिघाडच सापडत नाही. त्यामुळे याची तक्रार ऊर्जा मंत्री नितीन राऊत, पालकमंत्री नवाब मलिक, खासदार प्रफुल पटेल, सुनील मेंढे, आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्याकडे बोळदे, कवठा, येरंडी-देवलगाव, सुकळी, खैरी, डोंगरगाव येथील गावकऱ्यांनी केली आहे.

--------------------

दोन दिवसांपासून नळाचे पाणी नाही

मागील दोन दिवसांपासून या भागातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने ग्रामपंचायतचे नळांना पाणी पुरवठा केला नाही, वीज राहिली तरी नळाचे पाणी टाकीत पुरेसे पाणी भरुन ठेवत नाही. आता चक्क दोन दिवसांपासून नळांना अजिबात पाणी आलेच नाही, कोरोनाची समस्या, विजेची समस्या आणि ही नळांची समस्या आहे, कित्येक समस्यांना तोंड देऊन नागरिक सुध्दा आता त्रस्त झाले आहे.