शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

अनेक दिवसांपासून विजेचा बिघाडच सापडेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:28 IST

बाराभाटी : अनेक महिने झाले, अनेक दिवसही लोटून गेले पण परिसरात विद्युत व्यवस्था अद्यापही सुरळीत झालेली नाही. असे म्हणताच ...

बाराभाटी : अनेक महिने झाले, अनेक दिवसही लोटून गेले पण परिसरात विद्युत व्यवस्था अद्यापही सुरळीत झालेली नाही. असे म्हणताच येत नाही, विद्युत विभाग काय करतो, अशा प्रकारची उत्तम सेवा देतो की ग्राहकांना अंधारात राहावे लागते. अनेकवेळा विनाकारण वीज बंद केली जाते, मात्र बिघाडच सापडतच नाही, असा शब्द अनेक दिवसांपासून व महिन्यांपासून वीज ग्राहक ऐकत आहेत.

मागील वर्षाच्या ऑगस्ट- सप्टेंबरपासून या भागातील विद्युत विभागाला बिघाड असा कसा सापडत नाही, याला जबाबदार कोण ? या विभागाचे अधिकारी व कर्मचारी या अशा कारणासाठी अनेक महिने लावत असणार तर ग्राहकांनी काय करावे, नेमकी अडचण सापडत नाही, तर सेवा कशी उत्तम होणार ? असा गंभीर प्रश्न ग्राहक उपस्थित करीत आहेत. खंडित वीज पुरवठ्याने अनेक ग्राहक संतापले आहेत, अर्जुनी मोरगावच्या अधिकारी व कर्मचारी आणि लाईनमनला विचारणा करण्यासाठी फोन केला तर मोबाईल बंद, कव्हरेज बाहेर तर फोन उचलत नाही. विद्युत विभागाकडून चांगला प्रतिसाद मिळत नाही. दिवसभरात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होतो. मागील वर्षभरापासून हीच समस्या कायम आहे. मात्र अद्यापही वीज वितरण कंपनीला बिघाड सापडला नाही याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या भागाला ३३ केेव्हीचे सबस्टेशन असूनही अडचण आहे, देवरी, अर्जुनी मोरगावकडून आलेली वीज सुरळीत का राहत नाही काही कळेना. जिल्हा विद्युत अधीक्षक अभियंता गोंदिया व कार्यकारी अभियंता देवरी यांचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. मात्र याचा फटका वीज ग्राहकांना सहन करावा लागत आहे. बिघाडाच्या नावाखाली १७ तास, १२ तास, रात्रभर, दिवसभर वीज बंद केली जाते, तरी सुद्धा बिघाडच सापडत नाही. त्यामुळे याची तक्रार ऊर्जा मंत्री नितीन राऊत, पालकमंत्री नवाब मलिक, खासदार प्रफुल पटेल, सुनील मेंढे, आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्याकडे बोळदे, कवठा, येरंडी-देवलगाव, सुकळी, खैरी, डोंगरगाव येथील गावकऱ्यांनी केली आहे.

--------------------

दोन दिवसांपासून नळाचे पाणी नाही

मागील दोन दिवसांपासून या भागातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने ग्रामपंचायतचे नळांना पाणी पुरवठा केला नाही, वीज राहिली तरी नळाचे पाणी टाकीत पुरेसे पाणी भरुन ठेवत नाही. आता चक्क दोन दिवसांपासून नळांना अजिबात पाणी आलेच नाही, कोरोनाची समस्या, विजेची समस्या आणि ही नळांची समस्या आहे, कित्येक समस्यांना तोंड देऊन नागरिक सुध्दा आता त्रस्त झाले आहे.