शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
2
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
3
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
4
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
5
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
6
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
7
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
8
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
9
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
10
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
11
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
12
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
13
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
14
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
15
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
16
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...
17
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
18
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
19
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
20
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 

अनेक दिवसांपासून विजेचा बिघाडच सापडेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:28 IST

बाराभाटी : अनेक महिने झाले, अनेक दिवसही लोटून गेले पण परिसरात विद्युत व्यवस्था अद्यापही सुरळीत झालेली नाही. असे म्हणताच ...

बाराभाटी : अनेक महिने झाले, अनेक दिवसही लोटून गेले पण परिसरात विद्युत व्यवस्था अद्यापही सुरळीत झालेली नाही. असे म्हणताच येत नाही, विद्युत विभाग काय करतो, अशा प्रकारची उत्तम सेवा देतो की ग्राहकांना अंधारात राहावे लागते. अनेकवेळा विनाकारण वीज बंद केली जाते, मात्र बिघाडच सापडतच नाही, असा शब्द अनेक दिवसांपासून व महिन्यांपासून वीज ग्राहक ऐकत आहेत.

मागील वर्षाच्या ऑगस्ट- सप्टेंबरपासून या भागातील विद्युत विभागाला बिघाड असा कसा सापडत नाही, याला जबाबदार कोण ? या विभागाचे अधिकारी व कर्मचारी या अशा कारणासाठी अनेक महिने लावत असणार तर ग्राहकांनी काय करावे, नेमकी अडचण सापडत नाही, तर सेवा कशी उत्तम होणार ? असा गंभीर प्रश्न ग्राहक उपस्थित करीत आहेत. खंडित वीज पुरवठ्याने अनेक ग्राहक संतापले आहेत, अर्जुनी मोरगावच्या अधिकारी व कर्मचारी आणि लाईनमनला विचारणा करण्यासाठी फोन केला तर मोबाईल बंद, कव्हरेज बाहेर तर फोन उचलत नाही. विद्युत विभागाकडून चांगला प्रतिसाद मिळत नाही. दिवसभरात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होतो. मागील वर्षभरापासून हीच समस्या कायम आहे. मात्र अद्यापही वीज वितरण कंपनीला बिघाड सापडला नाही याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या भागाला ३३ केेव्हीचे सबस्टेशन असूनही अडचण आहे, देवरी, अर्जुनी मोरगावकडून आलेली वीज सुरळीत का राहत नाही काही कळेना. जिल्हा विद्युत अधीक्षक अभियंता गोंदिया व कार्यकारी अभियंता देवरी यांचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. मात्र याचा फटका वीज ग्राहकांना सहन करावा लागत आहे. बिघाडाच्या नावाखाली १७ तास, १२ तास, रात्रभर, दिवसभर वीज बंद केली जाते, तरी सुद्धा बिघाडच सापडत नाही. त्यामुळे याची तक्रार ऊर्जा मंत्री नितीन राऊत, पालकमंत्री नवाब मलिक, खासदार प्रफुल पटेल, सुनील मेंढे, आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्याकडे बोळदे, कवठा, येरंडी-देवलगाव, सुकळी, खैरी, डोंगरगाव येथील गावकऱ्यांनी केली आहे.

--------------------

दोन दिवसांपासून नळाचे पाणी नाही

मागील दोन दिवसांपासून या भागातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने ग्रामपंचायतचे नळांना पाणी पुरवठा केला नाही, वीज राहिली तरी नळाचे पाणी टाकीत पुरेसे पाणी भरुन ठेवत नाही. आता चक्क दोन दिवसांपासून नळांना अजिबात पाणी आलेच नाही, कोरोनाची समस्या, विजेची समस्या आणि ही नळांची समस्या आहे, कित्येक समस्यांना तोंड देऊन नागरिक सुध्दा आता त्रस्त झाले आहे.