शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, संजय राऊतांसह अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात; 'मतचोरी'वरून विरोधकांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
2
“सगळीकडे हीच चर्चा, मतचोरीविरोधात जनता राहुल गांधींसोबत, संपूर्ण देश म्हणणे ऐकतोय”: काँग्रेस
3
महुआ मोईत्रा बेशुद्ध झाल्या, राहुल गांधींनी पाणी दिले; टीएमसीची आणखी महिला खासदार...
4
बर्फाळ टेकडीवर वसलाय 'हा' छोटासा देश! स्वतःचा झेंडा, ध्वज आणि पासपोर्टची सुविधा देखील उपलब्ध; तुम्हाला माहितीये का?
5
१२ लाखांपर्यंतची करसवलत रद्द होणार का? नव्या आयकर विधेयकावरुन सरकारने केला खुलासा
6
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅम GOLD साठी किती खर्च करावा लागणार?
7
"जोपर्यंत लोकांच्या मनात निवणुकीच्या निष्पक्षतेबाबत संशय राहील तोपर्यंत...’’, शशी थरूर यांचं विधान  
8
ही कसली आई! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी स्वतःच्या ५ महिन्यांच्या लेकीची केली हत्या
9
"हे देवा, त्यांनी आता बोलणं थांबवावं", डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत सनी लिओनीचं स्पष्ट मत, म्हणाली- "त्यांच्या काही गोष्टी..."
10
Turkey Earthquake: तुर्कीत ६.१ रिश्टर स्केलचा भूकंप, २० सेकंदाचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
11
जुही बब्बरने भावाला बांधली राखी, प्रतीक बब्बरची अनुपस्थिती; भावुक पोस्ट करत म्हणाली...
12
Navi Mumbai: नेरुळमधील सुश्रुषा हाॅस्पिटलला आग, रुग्णांची सुखरूप सुटका
13
मौतका कुआ : बापाचा 'लाडला', जोरदार पडला...! स्टंट करणं पडलं भारी, दिवसाढवळ्या दिसले असतील तारे; VIDEO व्हायरल
14
कुत्रा, मांजर विसरा..; विद्यार्थ्याने शाळेत आणला हत्ती, पाहून सर्वांनाच बसला धक्का; पाहा video
15
मेवाड-जैसलमेर-बूंदी...! राजस्थानला मराठा साम्राज्याचा नकाशा खुपू लागला; एनसीईआरटीच्या पुस्तकावरून वाद
16
NSDL Share Price: 'या' IPO चे गुंतवणुदार झाले मालामाल; ४ दिवसांत ७८% चा छप्परफाड रिटर्न; लिस्टिंगनंतर लागला जॅकपॉट
17
“कविता करना बंद किया क्या?”; PM मोदींनी केली आठवलेंना विचारणा, तत्काळ पूर्ण केली इच्छा
18
VIDEO: दोन सिंहांचा सुरु होता मुक्त संचार, अचानक समोरून आला 'किंग कोब्रा' अन् मग...
19
माधुरी हत्तीबाबत सुप्रीम कोर्टातून मोठी अपडेट! हत्ती कोल्हापूरला येणार की वनतारामध्ये राहणार?
20
तब्बल ७०० वर्ष जगले दक्षिणेतले संत राघवेंद्र स्वामी; पण कसे? त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या!

आमगाव न. प. प्रस्तावाला १०,२१५ नागरिकांचा आक्षेप

By admin | Updated: February 5, 2017 00:16 IST

राज्य शासनाने जिल्ह्यातील आमगाव या गावात परिसरातील ६ गावांचा समावेश करून नगरपरिषदेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे.

शेतकरी व गावकऱ्यांचा तीव्र विरोध : सरपंचांनी मांडल्या अडचणी गोंदिया : राज्य शासनाने जिल्ह्यातील आमगाव या गावात परिसरातील ६ गावांचा समावेश करून नगरपरिषदेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात नगर विकास मंत्रालयाने ६ जानेवारीपर्यंत आक्षेप मागितले होते. परंतु, आमगाव व परिसरातील गावांना एकात जोडून नगरपरिषदेचा दर्जा देणे हा निर्णय नागरिकांसाठी अन्यायकारक ठरणार आहे. या निर्णयाविरूध्द आमगाव व परिसरातील गावांच्या नागरिकांनी एल्गार पुकारून (दि.३) १० हजार २१५ आक्षेप शासनाकडे सादर केले आहे. माजी मंत्री महादेवराव शिवणकर यांच्या नेतृत्वात सर्व आक्षेप जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने शासनाशी पाठपुरावा करावा, अशी मागणी केली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात आक्षेप नोंदविणे हे जिल्ह्यातील इतिहासात पहिल्यांदाच घडले आहे. शासनाने १२ फेब्रुवारी २०१५ रोजी तालुकास्तराच्या गावांना नगरपंचायतींचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने तालुकास्तराच्या गावांची ग्रामपंचायत भंग करण्यात आली. जिल्ह्यातील ७ पैकी ५ गावांमध्ये नगरपंचायत स्थापित झाली. परंतु, आमगाव व सालेकसा या दोन नगरपंचायत स्थापनेचे काम अडले होते. आता राज्य शासनाने आमगावला रिसामा, बनगाव, कुंभारटोली, पदमपूर, किंडगीपार, माली व बिरसी या गावांना समावेश करून नगरपरिषद ही संस्था स्थापन करण्यासाठी आक्षेप मागविला आहे. त्या अनुषंगाने नगरविकास मंत्रालयाने ६ जानेवारी २०१७ पर्यंत अधिसूचना जाहीर केली. आमगावसह परिसरातील सर्व ग्रामपंचायतींनी नगरपरिषदेचा विरोध दर्शविला आहे. त्या अनुषंगाने मासिक व ग्रामसभेचे ठरावही घेवून शासनाच्या निर्णयावर आक्षेप घेतले. आमगाव, रिसामा, पदमपूर, बनगाव, बिरसी, माली, किंडगीपार, कुंभारटोली येथील १० हजार २१५ नागरिकांनी व्यक्तीश: शासन निर्णयावर आक्षेप नोंदविले आहे. आक्षेपपत्र शुक्रवारी माजी मंत्री महादेवराव शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महिरे यांना सोपविण्यात आले. दरम्यान, शासनाकडे नगरपरिषद स्थापन न करण्याची आक्षेपानुरुप शिफारस करण्यात यावी, अशीही विनंती करण्यात आली. आक्षेपात आमगावची लोकसंख्या १२ हजार २०० असून कुटूंबसंख्या २०९४ आहे. नगरपरिषदेच्या अधिनियमानुसार २५ हजारापेक्षा खाली आहे. त्यामुळे हे गाव ग्रामीण क्षेत्रातच मोडते. नगरपरिषद अधिनियमानुसार औद्योगिक क्षेत्र असायला पाहिजे. परंतु आमगाव हे कृषक क्षेत्र आहे. परिसरातील गावांना आमगाव नगरपरिषदेवर समावेश करण्याचा प्रयत्न केला तरी त्या गावांवर हा निर्णय लादून अन्याय करण्यासारखा ठरणार आहे. नगरपरिषदेसाठी फक्त ३५ टक्के अकृषक भूखंड असायला पाहिजे. मात्र, हे आमगावात नगण्य आहे. महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम आणि औद्योगिक अधिनियम १९३५ अन्वये आमगाव नगरपरिषद कोणत्याही नियमात बसत नाही. तर शासन नागरिकांच्या इच्छेविरूध्द किंबहुना ग्रामपंचायत या प्रमुख संस्थेला विश्वासात न घेता आमगावला नगरपरिषदेचा दर्जा का देत आहे? असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. नगरपरिषदेच्या स्थापनेनंतर परिसरातील गावातील नागरिकांना होणारी अडचण लक्षात घेवून शासनाने निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी माजी मंत्री महादेवराव शिवणकर, जिल्हा परिषद सदस्य सुखराम फुंडे, उपसरपंच तिरथ येटरे, ओमेंद्र खोब्रागडे, निकेश मिश्रा, सरपंच सुनंदा येरणे, उपसरपंच निखील मेश्राम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती रवीदत्त अग्रवाल, सरपंच चुटे यांच्यासह सरपंच, उपसरपंच व नागरिक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)