शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

अंतर्गत मुल्यमापनासह नववीचे गुण लक्षात घ्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:29 IST

केशोरी : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता २०२० - २१ हे शैक्षणिक सत्र शिक्षणाविनाच कोरे राहिले. विद्यार्थ्यांचे हित जोपासून ...

केशोरी : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता २०२० - २१ हे शैक्षणिक सत्र शिक्षणाविनाच कोरे राहिले. विद्यार्थ्यांचे हित जोपासून राज्य परीक्षा मंडळाने दहावी बोर्डाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. शालेय अंतर्गत मूल्यमापन पद्धतीनुसार दहावीचा निकाल लावण्याचे धोरण निश्चित करावे लागले.

या पद्धतीमुळे हुशार आणि साधारण विद्यार्थ्यांमध्ये दुजाभाव नको आणि शाळेचा निकाल चांगला लावण्याच्या दृष्टीने शाळा स्तरावरून अंतर्गत मूल्यमापनाचे गुण सारखेच देण्याच्या प्रचलित पद्धतीमुळे हुशार विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अंतर्गत मूल्यमापन गुणांसह गतवर्षीच्या नववीचे गुण लक्षात घेऊन दहावी परीक्षा बोर्ड निकाल लावण्याची पद्धत अंमलात आणण्याची मागणी अर्जुनी - मोरगाव तालुका शिक्षक भारती संघटनेचे अध्यक्ष प्रा. दिनेश नाकाडे यांनी शिक्षणमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून प्राधान्याने विद्यार्थ्यांचे हित जोपासत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या आदेशानुसार राज्य परीक्षा मंडळाने दहावी बोर्डाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. शाळेविनाच कागदोपत्री दहावीचा निकाल कसा लावावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करून गुण प्रदान करण्याचे शाळांना बोर्डाने निर्देश दिल्याने आता सर्वत्र हुशार आणि साधारण विद्यार्थ्यांना शाळेचा निकाल चांगला लावण्यासाठी अंतर्गत मूल्यमापनाची संधी मिळाल्यामुळे या प्रचलित पद्धतीने हुशार विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचे खच्चीकरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तशी भीतीदेखील विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.

.....

नववीच्या गुणांवर आधारित निकाल जाहीर करा

यावर्षी दहावी बोर्डाच्या परीक्षेला प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन गुणासह गतवर्षातील नववीची गुणपत्रिका बोर्डाने मागवून दहावीचा निकाल जाहीर करावा. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर सर्व विषय मिळून २०० गुणांचा एकत्रित एक पेपर घेण्याचा राज्य परीक्षा मंडळाचा विचार असून, जेव्हा तो पेपर होईल तत्पूर्वी नववीच्या गुणांवर आधारित दहावीचा निकाल घोषित करण्याची मागणी अर्जुनी - मोरगाव शिक्षक भारती संघटनेचे अध्यक्ष प्रा. दिनेश नाकाडे यांनी शिक्षण मंत्र्यांना ऑनलाईन निवेदनातून केली आहे.