शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आज लागणार नऊ लाख रोपटे

By admin | Updated: July 1, 2016 01:41 IST

राज्यभर दोन कोटी वृक्ष लावण्याचा कार्यक्रम १ ते ७ जुलैदरम्यान राबविला जात आहे. यात गोंदिया जिल्ह्याला ९ लाख ६१ हजार ६९० रोपटे लावण्याचे लक्ष्य देण्यात आले आहे.

सर्व विभाग सज्ज : १६ हजार ९१२ अधिकारी-कर्मचारी व नागरिक होणार सहभागीगोंदिया : राज्यभर दोन कोटी वृक्ष लावण्याचा कार्यक्रम १ ते ७ जुलैदरम्यान राबविला जात आहे. यात गोंदिया जिल्ह्याला ९ लाख ६१ हजार ६९० रोपटे लावण्याचे लक्ष्य देण्यात आले आहे. शुक्रवार, १ जुलै रोजी जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या वृक्षलागवडीसाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. यात १६ हजार ९१२ अधिकारी-कर्मचाऱ्यांसह विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होत आहेत.गोंदिया वनविभाग, सामाजिक वनीकरण विभाग, वनविकास महामंडळ, नवेगांव-नागझिरा वन्यजीव अभयारण्य आणि इतर यंत्रणा मिळून हा वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी बनविण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.हरित महाराष्ट्र-समृद्ध महाराष्ट्रचा नारा राज्य सरकारने दिला. त्यानुसार वन महोत्सव २०१६ अंतर्गत जिल्ह्यात ९ हजार ६१ हजार ६९० वृक्ष लागवड केली जाणार आहे. रोपट्यांना नर्सरीमधून वनपरिक्षेत्र कार्यालयात पोहोचविण्यात आले असून गेल्या चार दिवसांपासून रोपांचे वितरण विविध विभागांना केले जात आहे. गोंदिया तालुक्यासाठी कुडवा नाका परिसरातील वनपरिक्षेत्र कार्यालयातून रोपांचे वितरण सतत सुरू आहे. जवळपास सर्व वृक्षारोपणाच्या ठिकाणी हे रोपटे पोहोचविण्यात आले आहे.या वृक्षारोपणासाठी वनविभाग गोंदियाला सर्वाधिक लक्ष्य देण्यात आले आहे. त्यांना ७ लाख ४८ हजार रोपांची लागवड करायची आहे. सामाजिक वनीकरण गोंदिया विभागाला २५ हजार रोपट्यांचे लक्ष्य आहे. तसेच वनविकास महामंडळाला ३१ हजार ८००, नवेगांव-नागझिरा वन्यजीव विभागाला २६ हजार ५९३, तसेच इतर यंत्रणांना १ लाख १५ हजार ९५० रोपटे लागवडीचे लक्ष्य देण्यात आले आहे. संबंधित विभागांनी त्यानुसार खड्डेही खोदले आहेत. कोणी कुठून रोपटे घ्यायचे याचेही नियोजन आधीच करण्यात आले होते. त्यानुसार वनविभाग गोंदियाने मुरदोली आणि मालकनपूर येथील रोपवनातून ५०-५० हजार रोपटे उचलले. सामाजिक वनीकरण गोंदियाने कुडवा येथून २५ हजार, गोंडमोहाडी येथून २३ हजार ६७२, आमगाव तालुक्यातील किकरीपार येथून १७ हजार १८९, देवरी येथून ३ हजार ७६५, भागी येथून २३ हजार ६००, सडक अर्जुनी तालुक्याने १२ हजार ३०५, माहुरकुडा येथून ५ हजार ३८० आणि निमगांव रोपवन येथून ३१ हजार ७५० रुपये संबंधित यंत्रणांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. कृषि विभागाने हिवरा येथील कृषि फार्म मधून ३० हजार २१५ रोपटे उपलब्ध करण्यात आले आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)माहिती कार्यालय व पत्रकारांचाही सहभागजिल्हा माहिती कार्यालय व पत्रकार बांधवांच्या संयुक्त विद्यमाने वृक्ष लागवडीचा कार्यक्र म १ जुलै रोजी सकाळी ७.३० वाजता नवीन जिल्हा क्रीडा संकुलासमोर, पवार गुरूजी यांच्या फार्म हाऊस जवळ आयोजित करण्यात आला आहे. यावेळी आंबा, पेरु, जांभूळ, कदंब, निंब, गुलमोहर या जातीची २५ रोपटे लावण्यात येणार आहे. पत्रकारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी केले आहे.पावसाच्या हजेरी जीव पडला भांड्यातजिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लाखो रोपटे लावले जाणार असले तरी पाऊसच नसल्यामुळे हे रोपटे जगणार तरी कसे? असा प्रश्न गुरूवारी सायंकाळपर्यंत सर्वांना पडला होता. मात्र रात्री ८ वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. यामुळे शुक्रवारी होणाऱ्या वृक्षारोपणातील झाडे किमान आठवडाभर तरी पाण्याशिवाय राहू शकतील, असा दिलासा मिळाला आहे.३१८ सभांमधून जनजागृतीजिल्ह्यात हा वृक्षलागवडीचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ९ चित्ररथ काढण्यात आले. ९१ पथनाट्य आणि कलापथक कामी लावण्यात आले. तसेच ३१८ सभा घेऊन प्रचार-प्रसार करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.