शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
2
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
3
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
4
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
5
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
6
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
7
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
8
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
9
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
10
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
11
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा
12
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
13
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या नेत्याचे निलंबन भाजपकडून रद्द, राणेंची डोकेदुखी वाढणार?
14
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाच्या आगमनाला उरले ८ दिवस, घराबाहेर काढा 'या' वस्तू; ज्यामुळे राहू केतू करतात अमंगल!
15
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर'! तुम्ही कधी फिरायला गेलात का?
16
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
17
फक्त १० वर्षांत कोट्यधीश होण्याची संधी! पती-पत्नीसाठी आर्थिक तज्ज्ञांनी सांगितला ‘स्मार्ट’ गुंतवणूक प्लॅन
18
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
19
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
20
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?

कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून नऊ लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:20 IST

गोंदिया : देशात मार्च महिन्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला व ही स्थिती बघता राज्यात निर्बंध लावण्यास सुरुवात झाली ...

गोंदिया : देशात मार्च महिन्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला व ही स्थिती बघता राज्यात निर्बंध लावण्यास सुरुवात झाली होती. अशात कोरोना नियमांचे पालन करणे सक्तीचे झाले होते व त्यानंतरही नागरिक आपल्या मर्जीने वागत असताना दिसत होते. अशात नागरिकांच्या बेभानवृत्तीवर लगाम लावण्यासाठी नाइलाजास्तव वाहतूक नियंत्रण शाखेला थोडीफार कठोर पावले उचलण्याची गरज पडली होती. त्यात वाहतूक नियंत्रण शाखेने नियम तोडून मनमर्जीने वागणाऱ्यांवर कारवाया करीत दंड ठोठावला होता. शहरात मार्च ते मे महिन्यांपर्यंतच्या कालावधीत शाखेने विविध कलमांतर्गत ४५०५ कारवाया केल्या असून, यातून आठ लाख ९५ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. या वर्षात म्हणजेच, जून ते ३१ मेपर्यंत वाहतूक नियंत्रण शाखेने दहा हजार ३३५ कारवाया केल्या असून, यातून २२ लाख ४६ हजार २५० रुपयांचा दंड वसूल केला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्य शासनाने कडक लॉकडाऊन घोषित केला होता. मात्र त्यानंतरही नागरिकांकडून विनाकारण बाहेर फिरणे यासह वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे दिसून येत होते. अशात त्यांना आवर घालण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेला कारवायांचे हत्यार उपसावे लागते.

-----------------------------

ट्रिपल सिट- १५०

विनामास्क- ०४

विनाहेल्मेट- १०

नो पार्किंग- ९४

मोबाइलवर बोलणे- १६

विनानंबर प्लेट- २२

फॅन्सी नंबर प्लेट-००

विनालायसन्स- ४२०९

----------------------------

लायसन्स नसलेल्यांवरच सर्वाधिक कारवाया

वाहन चालविताना लायन्सस नसणे हा प्रकार आजघडीला सर्वाधिक प्रचलित झाला आहे. पालक आपल्या पाल्यांना लायसन्स नसतानाही वाहन देत असल्याने हा प्रकार सर्वाधिक बघायला मिळत आहे. यातूनच वाहतूक नियंत्रण शाखेने या तीन महिन्यांच्या कालावधीत सर्वाधिक विनालायसन्सच्या ४२०९ कारवाया केल्या आहेत.

----------------------------

गोंदिया शहरातच नियमांचे उल्लंघन

गोंदिया हे जिल्ह्याचे ठिकाण असून, येथे शहरासह ग्रामीण भाग व अन्य शहर तसेच राज्यातील नागरिक येतात. एवढेच काय तर शहरवासीयांकडूनच सर्वाधिक नियमांचे उल्लंघन केली जात असल्याचे प्रकार घडतात. यामुळेच गोंदिया शहरात सर्वाधिक कारवाया केल्या जातात.

-----------------------------------

वाहतुकीचे नियम हे पुढील व्यक्तीच्या सुरक्षेसह स्वत:च्या सुरक्षेसाठीही आहेत. त्यामुळे नियमांचे उल्लंघन समोरच्या व्यक्तीसाठी धोकादायक ठरत असताना यात आपल्यासाठीही तेवढाच धोका असतो. कित्येकदा नियमांचे उल्लंघन अंगलट येते. यामुळे वाहतुकीच्या नियमांचे पालन करूनच वाहन चालवा. शिवाय, पाल्यांनी आपल्या पाल्यांनाही लायन्सस काढून दिल्यावरच वाहन हाती द्यावे.

- दिनेश तायडे

निरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखा, गोंदिया