शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Conflict: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
2
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
3
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
4
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
5
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
6
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
7
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
8
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
9
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
10
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
11
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
12
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
13
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
14
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
15
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
16
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
17
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
18
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
19
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
20
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश

व्यसनाधीन तरूण पिढीला योग्य मार्गदर्शन काळाची गरज

By admin | Updated: February 26, 2016 02:05 IST

शाळा-महाविद्यालय हे पूर्वीप्रमाणे ज्ञानदानाचे कार्य करणारे पवित्र मंदिर राहिले नाही. शिक्षणाला व्यावसायिकतेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

पालकवर्ग चिंतीत : वेळीच दखल घेणे गरजेचेरावणवाडी : शाळा-महाविद्यालय हे पूर्वीप्रमाणे ज्ञानदानाचे कार्य करणारे पवित्र मंदिर राहिले नाही. शिक्षणाला व्यावसायिकतेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यामुळे तरूणावर ठराविक वयात होणारे संस्कार योग्य प्रकारे होत नाही. या अभावामुळे महाविद्यालयीन तरूण व्यसनी होत आहे. भविष्याचा विचार करता या प्रकाराची दखल वेळीच घेणे गरजेचे आहे. आयुष्यभर मुलांच्या भविष्याची चिंता करीत त्याकरिता व्यवस्था करीत असणाऱ्या पालकांवर कॉलेजात शिकणाऱ्या मुलांच्या व्यसनाधिनतेमुळे चिंतेचे सावट पसरले आहे. परिवर्तन हा समाजाचा नियम असल्यामुळे योगायोगानेच शिक्षण क्षेत्रातही वेगवेगळे बदल घडून आले. त्यामुळे याला व्यावसायिकतेचे स्वरुप प्राप्त झाले आहे. गुरू द्रोणाचार्य व शिष्य एकलव्य ही परंपरा लाभलेल्या संस्कृतीला आज तसे गुरु व शिष्य मिळणे दुरापास्त झाले आहे. आज शिक्षक विद्यार्थ्यांना शाळेत विद्यादान करण्यापेक्षा कोचिंग क्लॉसेसमध्ये जास्त पैसे मिळत असल्याने ते शिकविण्यात धन्यता मानतात. त्यामुळे विद्यार्थी सैरावैरा झालेले दिसून येतात. सध्या कनिष्ठ तसेच वरिष्ठ महाविद्यालयातील तरूण मोठ्या प्रमाणात व्यसनधिनतेकडे आकर्षिले जात असल्याचे चित्र आहे. गुटखा, तंबाखू, सिगरेट मद्यपींची संख्या घटण्याऐवजी दिवसागणिक वाढतच आहे. यामुळे मात्र तरूण पिढीचे आरोग्य धोक्यात आले आहे. खर्रा, गुटखा, सिगरेट यावर महिन्याकाठी हजारो रुपयांपेक्षा अधिक खर्च करून तरूणवर्ग एक प्रकारे कॅन्सरच विकत घेत आहेत.प्रत्येक ठिकाणी असलेल्या पानटपऱ्यांवर तंबाखूची पर्यायाने कॅन्सरची विक्री होत आहे आणि घेण्यासाठी तरूणाच्या रांगा लागत आहेत. पानटपऱ्या चालकांकडून खाणाऱ्यांची हौश पुरविण्याकरिता मागेल तसा आणि हवा तशा गुटखा तयार करून दिला जात आहे. या तरूणांमधील वाढत्या व्यसनाधिनतेचे प्रमाण लक्षात घेता पालकांनी तसेच सामाजिक संघटनांनी वेळीच लक्ष घेऊन मार्गदर्शन करणे काळाची गरज निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)