शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
2
'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
3
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
4
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
5
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
6
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
7
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
8
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
9
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
10
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
11
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
12
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
13
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
14
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
15
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
16
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
17
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
18
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
19
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
20
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या

शाळांच्या गुणवत्तेवर विचारमंथनाची आवश्यकता

By admin | Updated: May 20, 2014 23:44 IST

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शिक्षणात सुधारणा करण्यासाठी सन २०१२-१३ पासून ‘गावची शाळा-आमची शाळा’ हा अभिनव उपक्रम सुरु केला. या प्रकल्पाचा उद्देश साध्य करण्यासाठी

नामदेव हटवार - सालेकसा

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शिक्षणात सुधारणा करण्यासाठी सन २०१२-१३ पासून ‘गावची शाळा-आमची शाळा’ हा अभिनव उपक्रम सुरु केला. या प्रकल्पाचा उद्देश साध्य करण्यासाठी सन २०१३-१४ मध्येही तो प्रकल्प कायम ठेवण्यात आला. चुकांची दुरुस्ती करुन वर्ग १ ते ४ व वर्ग १ ते ७ अशा दोन गटात मूल्यांकन करण्याची व्यवस्था करण्यात आली. मूल्यांकनात यावेळी अनेक शाळांनी केवळ औपचारिकता दाखविण्यासाठी भाग घेतला तर काही शाळांची शोकांतिका निश्चितच समोर आली आहे. त्यामुळे गावची शाळा-आमची शाळा या प्रकल्पाचा उद्देश पूर्णत्वास जाईल काय, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. ‘गावची शाळा आमची शाळा’ हा प्रकल्प यशस्वी करायचा असेल तर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मुल्यांकन समितीचे सचिव म्हणून काम करतात. सालेकसात अनेक वर्षापासून गटशिक्षणाधिकार्‍यांचे पद रिक्त आहे. प्रभारी म्हणून उसनवारीवर काम सुरु आहे. त्यामुळे पाहिजे त्या पद्धतीने चांगल्या प्रकारे काम होत नाही. खंडविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी ही पदे एकाच व्यक्तीकडे असल्यामुळे कामे करताना वेळेअभावी समस्या निर्माण होतात. तरी पण अनेक शाळांना अचानक भेटी देऊन व शाळेत गैरहजर असणार्‍या शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस देऊन सुधारणा करण्याचा प्रयत्न गटशिक्षणाधिकार्‍यांनी केल्याचे दिसून येते. अनेक शिक्षक मुख्यालयात राहात नसल्याचे यावर्षीही पाहायला मिळाले. त्यांचे अप-डाउन आणि वेळेचे बंधन न पाळता केली जाणारी पळापळी यामुळे तेथील शैक्षणिक दर्जा काय असणार याचा विचारच केलेला बरा. दरेकसा परिसरातील काही शिक्षक पॅसेंजर मिळावी म्हणून ४.३० वाजताच शाळांना दांडी मारुन रेल्वे पकडण्यासाठी येत असतात. हाच प्रकार सालेकसा तालुक्यातील अनेक शाळांत दिसून येतो. त्यामुळे या शिक्षकांचे लक्ष शिकविण्यापेक्षा कमी आणि स्वत:च्या समस्या व अडचणी सोडविण्याकडे जास्त असते. या प्रकल्पांतर्गत अनेक शाळांनी आपापल्या पद्धतीने सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. मात्र काही शाळांनी या प्रकल्पाची फक्त रकानापूर्ती केली. नोकरी करणे व पगार घेणे एवढाच काही शिक्षकांचा उद्देश दिसून येतो. गावची शाळा आमची शाळा या प्रकल्पाची अजूनही तालुक्यात कडक अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. ज्या शाळांना मुल्यांकनात ६० ते ७० टक्यांपेक्षा कमी गुण मिळतात त्यांच्याकडे जास्त लक्ष देण्याची आवश्यकता आहे. तसेच कर्मचारी वर्गालाही नियंत्रणात आणणे आवश्यक आहे. समितीच्या मूल्याकंनात काही शाळांमधील दुरवस्था दिसून आली. दर्जेदार शिक्षणाचा अभाव मोठ्या प्रमाणात आढळून आला. मूल्यमापनात शिक्षण विभागाने लोकशाही चौथ्या स्तंभाला डावलून आपल्या चुकांवर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक शाळांतील शिक्षक मुल्याकंनात कमी पडले, त्यांनी सुधारणा करणे आवश्यक आहे. मागच्या वर्षी प्रथम, द्वितीय क्रमांकप्राप्त शाळांचा दर्जा वर्षी माघारला तर नवीन शाळांनी परिश्रमांती पुरस्कार प्राप्त केले, ही त्या शिक्षकांची व गावकर्‍यांची मेहनत आहे. त्यामुळे योजना यशस्वी होवो न होवो, त्याच्याशी आपल्याला काही देणे-घेणे नाही असा विचार जर शिक्षक, कर्मचारी, गावकरी करीत असतील तर शाळेत शिक्षणाचा बट्ट्याबोळ होण्यास काहीच वेळ लागणार नाही. काही शाळा एवढ्या दर्जेदार आहेत की तेथील विद्यार्थ्यांनी, पालक समितीने शिक्षकांवर नियंत्रण ठेवलेले आहे. तरीपण शाळांच्या मुल्याकंनात अनुत्तीर्ण शाळांच्या गुणवत्तेवर विचारमंथनाची आवश्यकता आहे, असे दिसून येते. काही शाळांना सुविधा नाहीत, तेथे शिक्षण विभाग सुविधा देणार काय, हा सुद्धा प्रश्न आहे. तरीपण दर्जेदार शिक्षणासाठी सर्वांनी परिश्रम करण्याची आवश्यकता आहे.