शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

पाणलोट प्रकल्पाच्या लाभापासून गरजू वंचित

By admin | Updated: May 20, 2014 23:44 IST

शेतकर्‍यांच्या शेतात उत्पन्नात वाढ व्हावी, पाण्याची समस्या दूर व्हावी, पीक येईपर्यंत पाणी साचून राहील या उद्देशाने शासनाच्या कृषि विभागामार्फत विविध योजना राबविल्या जात आहेत.

काचेवानी : शेतकर्‍यांच्या शेतात उत्पन्नात वाढ व्हावी, पाण्याची समस्या दूर व्हावी, पीक येईपर्यंत पाणी साचून राहील या उद्देशाने शासनाच्या कृषि विभागामार्फत विविध योजना राबविल्या जात आहेत. या योजनांमुळे शेतकरी सुखावले आहेत.पाणलोट प्रकल्प हे शेतकर्‍यांकरिता वरदान आहे. मात्र पाणलोट प्रकल्पाचा लाभ गरजवंत शेतकर्‍यांना मिळत नसल्याचे चित्र काही ठिकाणी दिसत आहे. राज्य शासनाच्या कृषी विभागांतर्गत शेतकर्‍यांकरिता संयुक्तरीत्या विविध योजना राबविण्यात येत आहे. यापैकी काही योजनाचा लाभ शेतकर्‍यांना मिळतो तर काही शेतकर्‍यांना मुद्दाम मिळत नाही. कृषी विभागांतर्गत राबविण्यात येणार्‍या पाणलोट क्षेत्र हे विकासाच्या दृष्टिकोनातून महत्वाचा ठरला आहे. काही ठिकाणी यापूर्वी निदर्शनात आले होते की, या योजनेचा लाभ गरजवंताना सोडून काही स्वार्थी प्रवृत्तीच्या कृषी विभागातील कर्मचारी व अधिकारी या योजनेचा लाभ देताना पदाचा दुरुपयोग करतात. वास्तविक पाहता पाणलोट क्षेत्र प्रकल्पाची उद्दिष्टामध्ये पाणलोट विकासाच्या माध्यमातून निर्माण होणार्‍या कृषी आधारित स्वयंरोजगाराच्या संधीद्वारे समाज घटकांची आर्थिक उन्नती साधने, ग्रामसभेच्या सहभागातून, लोकसहभागातून आणि संमतीने स्थानिक परिस्थिती व नैसर्गिक तसेच उपलब्ध पायाभूत संसाधनाचा विचार केल्यानंतर प्रकल्पाचा नियोजन करणे, स्वयंरोगाराकरिता दीर्घकालीन काम व संसाधनाचा नियोजन करणे हे सुध्दा पाणलोट क्षेत्राचे उद्दिष्ट आहे. पाणलोट विकास कार्यक्रमाबरोबर पाणलोट क्षेत्रातील शेतकर्‍यासाठी, भूमिहीन, शेतमजूर महिलांच्या उदरनिर्वाहाची साधने निर्माण करण्यासाठी नियोजन आणि त्याची अंमलबजावणी करण्याचे पाण्याच्या ताळेबंदाविषयी जनजागृती करणे, सक्षमतेने पाण्याचा वापर करण्याच्या संदर्भात प्रबोधन करणे, दीर्घकालीन शाश्वत रोजगार निर्मितीवर भर देणे, कृषी आधारित अर्थव्यवस्था बळकट करणे त्याचबरोबर वेगवेगळ्या शेती पद्धतीत जसे कृषी शोधत पशुधन विकास, कृषीसोबत फलोत्पादन विकास आणि कृषीसोबत दुग्ध व्यवसाय इत्यादीची अंमलबजावणी करणे व दीर्घकालीन शाश्वत देखभाल दुरुस्ती कायमस्वरुपी सहभागी पद्धतीने करण्याकरिता पाणलोट निधी उभारणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट्ये आहेत. पाणलोट क्षेत्र विकासाच्या अंतर्गत शेततळे तयार करणे, बांध्यावर माती पुरवण्यासहीत अनेक कामे शेतकर्‍यांना दिल्या जात आहेत. शेतकर्‍यांकरिता या योजना हिताच्या असल्या तरी योजनेचा लाभ सर्वच शेतकर्‍यांना मिळेल, असे दिसून येत नाही. पाणलोट समिती ही गाव स्तरावर तयार केलेली असल्याने समितीचे सचिव हे गावातील असल्याने यात पक्षपात होत असल्याच्या तक्रारी मिळाल्या आहेत. लाभार्थी नावाची निवड करणे आणि त्याचा शिक्कामोर्तब करणे हे पाणलोट समितीचे सचिव व अध्यक्षाला असल्याने यात गरीब व मध्यम वर्गाच्या शेतकर्‍यांना याचा पूर्णपणे लाभ मिळेल, यात शंका व्यक्त करण्यात येत आहे. पाणलोट क्षेत्र हे प्रकल्प शेतकर्‍यांच्या हिताचे असले तरी हे २०१४ हे वर्ष शेवटचे असून ही योजना बंद होण्याच्या मार्गावर आहे. पाणलोट क्षेत्राच्या प्रकल्पातून पाहिजे तसा विकास शेतकर्‍यांचा झालेला नाही. (वार्ताहर)