शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

वीज समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन

By admin | Updated: May 25, 2016 02:05 IST

जिल्ह्यातील विद्युत ग्राहकांना होणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आ. राजेंद्र जैन यांच्या नेतृत्वात...

वीज ग्राहकांची तक्रार : नागरिकांना दिले जाते वाढीव बिलगोंदिया : जिल्ह्यातील विद्युत ग्राहकांना होणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आ. राजेंद्र जैन यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ गोंदियाच्या अधीक्षक अभियंता यांना निवेदन दिले. तसेच सामान्य नागरिकांना होणाऱ्या समस्या सोडविण्याची मागणी केली.जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी क्षेत्रात विद्युत विभागाच्या वतीने मागील सहा महिन्यांपासून घरगुती ग्राहकांना अत्याधिक रकमेचे बिल मिळत आहेत. विद्युत बिलांचे अतिभार व इतर शुल्कांमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सामान्य ग्राहकांना मोठ्या रकमेचे बिल मिळत आहेत, ते दुरूस्त करण्यात यावे. विद्युत ग्राहकांची तक्रार असल्यास व मीटर खराब असल्याच्या तक्रारीवरही मीटर बदलविण्याची कार्यवाही करण्यात यावी. विद्युत प्रवाह अनियंत्रित असल्यामुळे वेळीअवेळी विद्युत पुरवठा खंडित होत आहे.विशेष म्हणजे ट्रान्सफॉर्मर जळणे, फेज जाणे व विद्युत उपकरणे खराब होण्याच्या तक्रारी सामान्य झाल्या आहेत. त्यामुळे अनेक क्षेत्रात, अनेक गावांत रात्ररात्रभर विद्युत पुरवठा होत नसल्याने अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. ट्रान्सफॉर्मर व विद्युत लाईनची आवश्यक दुरूस्ती करण्याबाबत अधीक्षक अभियंता यांना आ. राजेंद्र जैन यांच्या नेतृत्वात निवेदन देवून कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली. मागण्या १५ दिवसांत पूर्ण न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आंदोलनाचा इशारासुद्धा देण्यात आला आहे. याप्रसंगी आ. राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे, शहर अध्यक्ष शिव शर्मा, प्रदेश प्रतिनिधी देवेंद्रनाथ चौबे, जिल्हा प्रवक्ता अशोक शहारे, रवी मुंदडा, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष केतन तुरकर, मुजीब पठान, खालीद पठान, करण गिल, संजीव राय, रौनक ठाकूर, आशा पाटील, नरू हालानी, जयंत कछवाह व इतर पदाधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)