शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

राष्ट्रवादी व काँग्रेसने केले भाजपला लक्ष्य

By admin | Updated: October 28, 2015 01:57 IST

काहीही न करणे, मात्र झालेल्या कामावर बोंबा मारणे हे राष्ट्रवादी काँग्रेसला कधीही जमले नाही. मात्र ज्या पक्षाच्या पुढाऱ्याने दिशाभूल करून सत्ता काबीज केली त्यांनी आता काय केले,....

गोंदिया : काहीही न करणे, मात्र झालेल्या कामावर बोंबा मारणे हे राष्ट्रवादी काँग्रेसला कधीही जमले नाही. मात्र ज्या पक्षाच्या पुढाऱ्याने दिशाभूल करून सत्ता काबीज केली त्यांनी आता काय केले, हे सांगितले पाहीजे. मात्र त्यांच्याकडे सांगण्यासारखे काहीही नाही. भाजप हा पक्ष आणि त्याचे पुढारी बेजबाबदार आणि अविश्वासू आहेत, असा घणाघात करीत विश्वास आणि जबाबदारीने काम करणारा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच असून जिल्ह्यातील जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेता खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोरेगाव येथे राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी आयोजित प्रचारसभेत मंगळवारी ते बोलत होते. यावेळी मंचावर आ.राजेंद्र जैन, माजी आ.दिलीप बन्सोड, म्हाडाचे माजी सभापती नरेश माहेश्वरी, राकाँचे तालुका अध्यक्ष केवलराम बघेले, माजी पं.स.सदस्य डुमेश चौरागडे, जि.प.सदस्य ललिता चौरागडे, डॉ.श्रीप्रकाश रहांगडाले, राकाँचे शहर अध्यक्ष टेकेश्वर पटले यांच्यासह राष्ट्रवादीचे उमेदवार उपस्थित होते.यावेळी खा.पटेल पुढे म्हणाले, स्व.मनोहरभाई पटेल यांनी जिल्ह्याच्या विकासाची धुरा खांद्यावर घेतली होती. त्याच विकास कामांना गती देण्याचे काम आम्ही सातत्याने करीत आहोत. अदानी प्रकल्प, कवलेवाडा सिंचन प्रकल्प, कटंगी प्रकल्प, कलपाथरी प्रकल्प यासारखी महत्वपूर्ण कामे आपल्या माध्यमातून झाली आहेत. याशिवाय भेलसारख्या प्रकल्पांना मंजुरी देण्याचे काम आपण केले होते. मात्र भेल प्रकल्प भाजपने रखडून ठेवला आहे. यावरून जिल्ह्यातील बेरोजगारांची किती गय होत आहे हे स्पष्ट होते. १८ महिन्यांपूर्वी भाजपच्या पुढाऱ्यांनी अनेक स्वप्न दाखविले. आजच्या पंतप्रधानांनी तर मी खाणार नाही आणि दुसऱ्यांना खाऊ देणार नाही या त्यांच्या कथनाप्रमाणे आज खऱ्या अर्थाने सर्वसामान्य माणसाच्या जेवणाच्या ताटातून डाळ हिरावून घेतली आहे. रेशन मिळत नाही. केरोसीन मिळत नाही या सांगण्यासारख्या बाबी राहिल्या नाहीत, असे पटेल म्हणाले. (जिल्हा प्रतिनिधी)तोंडचा घास पळविला- अग्रवालगोंदिया : आम्ही गोरेगाव, सडक अर्जुनी, मोरगाव अर्जुनी व देवरी येथे नेहमीच आम जनतेत जाऊन त्यांच्या भावना समजून घेत त्यांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र भाजपच्या नेत्यांनी सामान्य जनतेच्या थाळीतील खान्याच्या वस्तूही हिरावून घेतल्या आहेत. जे सरकार सामान्य जनतेच्या तोंडातील घास पळविते ते सरकार सामान्य जनतेचे भले कसे करणार? असा सवाल काँग्रेसचे आमदार तथा लोकलेखा समितीचे अध्यक्ष गोपालदास अग्रवाल यांनी केला.देवरी व गोरेगाव येथे नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचार सभेत ते मार्गदर्शन करीत होते. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पुरूषोत्तम कटरे, माजी आ.रामरतन राऊत, जिल्हा परिषद अध्यक्ष उषाताई मेंढे, सहेसराम कोरोटे, डॉ.झामसिंग बघेले, डॉ.योगेंद्र भगत, जगदीश येरोला, डॉ.नामदेव किरसान, जि.प. सभापती पी. जी. कटरे आदींनी मार्गदर्शन करून काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.यावेळी बोलताना आ.अग्रवाल म्हणाले, लोकांसाठी घाम गाळून धान्य उगवणाऱ्या शेतकऱ्यांचेच आज देशात आणि राज्यात हाल होत आहेत. त्यांचेच हे सरकार भले करू शकत नाही तर सामान्य लोकांच्या व्यथा काय समजून घेणार आहेत. राज्यात दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी सतत आत्महत्या करीत आहेत. मात्र मुख्यमंत्री सहायता निधीमधील पैसा बँकॉकला जाणाऱ्या डान्स ट्रूपला देऊन शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळत आहे. अशा धोकेबाज लोकांना त्यांची जागा दाखविण्याची वेळ आली असून त्यासाठी चौफेर विकास करण्यास कटीबद्ध असणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवारांनाच विजयी करा, असे आवाहन आ.अग्रवाल यांनी केले. देवरी, गोरेगावचा विकास गोंदियाच्या धर्तीवर केला जाईल, असेही ते म्हणाले. (जिल्हा प्रतिनिधी)