सालेकसा : सालेकसा तालुका एक नक्षलग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातो. नक्षलग्रस्त भागात शासनाकडून विशेष लक्ष देत अनेक भौतिक सोयी सुविधा पुरविण्यावर भर दिला जातो, परंतु सालेकसा तालुका आजही अनेक सोयी-सुविधांपासून वंचित आहे. यात मुख्य समस्या म्हणजे सालेकसा या तालुक्याच्या मुख्यालयीन अनेक मार्गावर पथदिवेच नसल्यामुळे प्रमुख रस्तेही रात्रभर अंधारात असतात. त्यामुळे सालेकसा येथे रात्रीचा प्रवास धोकादायक वाटतो. सालेकसा हे तालुका मुख्यालयाचे ठिकाण असून मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर आहे. त्यामुळे या ठिकाणाहून रेल्वेने प्रवास करणारे शेकडो प्रवासी रात्री बेरात्री ये-जा करीत असतात. तसेच या ठिकाणावरुन राज्य महामार्ग क्रमांक २४९ गेला असून या मार्गाद्वारे महाराष्ट्रला छत्तीसगड आणि मध्य प्रदेश हे दोन्ही राज्य जोडलेली आहेत. त्यामुळे सालेकसावरुन गेलेला रस्ता दिवस रात्र प्रवाशांनी व्यस्त असतो. अशा परिस्थिती सालेकसाच्या रस्त्यावरुन रात्रभर योग्य प्रकारे प्रकाश देणारे पथदिवे नसले दुदैवी ठरत आहे. नक्षलग्रस्त तालुका असल्याने या तालुक्यात दरवर्षी कोणत्या न कोणत्या नक्षली कारवाया घडत असतात.आश्चर्य असे की, एकदा आठवडी बाजाराच्या दिवशी भरदिवसा नक्षली हल्ल्यात एकाचा जीव गेला होता. त्यामुळे सालेकसा मुख्यालय सुद्धा सुरक्षित नाही. असी धारणा लोकांमध्ये रुजली आहे. सालेकसा मुख्यालयापासून अवघ्या एक कि.मी. अंतरापासून जंग़ल परिसर लागला आहे. त्यामुळे ही सालेकसा अनेकांना असुरक्षित वाटतो. अशात येथील अनेक रस्ते रात्रभर अंधारात व सामसूम राहतील तर लोकांना किती सुरक्षित वाटेल किंवा रस्त्यावरुन चालताना भिती वाटेल की नाही या बद्दल प्रशासनाने विचार करावा.सालेकसा मुख्यालयाच्या ठिकाणी सर्व प्रकारचे शासकीय कार्यालय निमशासकीय कार्यालय, शाळा कॉलेज, बाजारपेठ इत्यादी असून या सर्व ठिकाणाची रात्रीला सुरक्षा असणे आवश्यक आहे. आणि या साठी सर्वत्र आधुनिक पद्धतीचे पथदिवे शासनाच्या वतीने लावण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (प्रतिनिधी)
नक्षलग्रस्त सालेकसाचे रस्ते अंधारात
By admin | Updated: May 24, 2015 01:34 IST