शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

नवतपाला पावसाचा थंडावा

By admin | Updated: May 31, 2017 01:05 IST

नवतपा म्हणताच अंगाला घाम फुटू लागतो व जीवाला धसका बसतो. मात्र यंदाच्या नवतपाला पावसाचा थंडावा मिळाल्याने

 पाहिजे तसा तापलाच नाही : पावसाने पारा घसरला लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : नवतपा म्हणताच अंगाला घाम फुटू लागतो व जीवाला धसका बसतो. मात्र यंदाच्या नवतपाला पावसाचा थंडावा मिळाल्याने नवतपा पाहिजे तसा तापलाच नाही. विशेष म्हणजे मे महिन्यातील उन्हापेक्षा कमी तापमानाची नोंद नवतपात घेण्यात आली आहे. निसर्गाने उन्हाळा, हिवाळा व पावसाळा असे तीन ऋतूंचे चक्र बांधून दिले आहे. मात्र मानवाच्या स्वार्थीपणामुळे झाडांचे जंगल नष्ट होऊन सिमेंट कॉंक्रीटचे जंगल वाढू लागले आहे. याचा परिणाम ऋतूचक्रावर झाला असून पर्यावरण प्रदूषीत झाले आहे. उन्हाची दाहकता वाढत चालली असून पावसाळ््यात पाहिजे तसा पाऊस पडत नाही. निसर्गाशी छेडखानीचे हे परिणाम आता आपल्या समोर येवू लागले आहेत. हेच कारण आहे की पूर्वी ४० डिग्रीच्या वर न जाणारे तापमान आता ४५ च्यावर जाऊ लागले आहे. त्यात नवतपा म्हटला म्हणजे रविराज पृथ्वीच्या जवळ येऊन आग ओकू लागल्याचा काळच म्हटला जातो. अवघ्या उन्हाळ््यातील उन्ह या नऊ दिवसांत पडत असल्याचेही नवतपा बाबत बोलले जाते. यामुळेच नवतपा म्हटला की सूर्य सर्व काही भाजून काढणार एवढ्या तापमानाची कल्पना केली जाते. नवतपाच्या या नऊ दिवसांत सूर्य खरोखरच आग ओकून आपली ताकत दाखवून देतात. यंदा मात्र २५ मे पासून सुरू झालेल्या नवतपाला पावसाने आपला थंडावा दिल्याने नवतपा पाहिजे तसा तापला नाही. कारण यंदा नवतपाच्या काळात बहुतांश दिनी वरूणराजाने आपली हजेरी लावून तापमान नियंत्रणात आणले. विशेष म्हणजे नवतपाच्या पूर्वीच्या दिवसांत पारा जास्त चढलेला होता. मात्र नवताप सुरू झाल्यानंतर ढगाळ वातावरणाने पारा उतरल्याचे दिसले. रविवारपासून तर दररोज पाऊस बरसत आहे. विशेष म्हणजे नवतपाच्या पूर्वीच्या काळात यापेक्षा जास्त नोंद घेण्यात आली असल्याने यंदाच्या नवतपावर पावसाने पाणी फेरल्याचे दिसले. रविवारच्या पावसाने वातावरण कुल-कुल नवतपाच्या तिसऱ्या दिवशी शनिवारी ढगाळ वातावरणामुळे पारा उतरला होता. तर चवथ्या दिवशी रविवारी (दि.२८) पावसाने दमदार एंट्री मारली. रविवारच्या पावसाने जणू पावसाळाच सुरू झाल्याचे चित्र तयार झाले होते. पावसामुळे वातारणात गारवा निर्माण झाला व लोकांची उकाड्यापासून सुटका झाली. एकंदर रविवारच्या पावसाने वातावरण कुल-कुल झाले. सोमवारीही सकाळी ढगाळ वातावरण होते व थंड वारा वाहत होता. त्यामुळे लोकांना उन्हापासून दिलासा मिळाला. दररोजच पावसाची हजेरी रविवारी हजेरी लावल्यानंतर आता दिवसा उन्ह व सायंकाळी मात्र अचानक वादळीवाऱ्यासह पाऊस बरसण्याचे सत्रच सुरू झाले आहे. या पावसाने मात्र नवतपालाच फेल केले आहे. दररोज पाऊस बरसत असल्याने तापमानाच चांगलीच घट झाली असून उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. दररोजच पाऊस आपली हजेरी लावून सर्वांनाचा सुखावत आहे. पावसाच्या या आगमनामुळे सर्वांना दिलासा मिळाला असून दररोज असाच पाऊस बरसावा अशी सर्वांची इच्छा आहे.