शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

नवेगाव राष्ट्रीय उद्यान ठरत आहे प्रेमीयुगुलांसाठी एकांताचे ठिकाण

By admin | Updated: August 23, 2015 00:14 IST

गोंदिया जिल्ह्यात नवेगावबांध हे एकमेव राष्ट्रीय उद्यान आहे. या राष्ट्रीय उद्यानासाठी दरवर्षी कोट्यवधीच्या निधीची घोषणा होते.

संतोष बुकावन  अर्जुनी मोर.गोंदिया जिल्ह्यात नवेगावबांध हे एकमेव राष्ट्रीय उद्यान आहे. या राष्ट्रीय उद्यानासाठी दरवर्षी कोट्यवधीच्या निधीची घोषणा होते. मात्र प्रत्यक्षात हा निधी कुठे जिरतो हे कळायला मार्गच नाही. गेल्या पाच वर्षापासून झालेल्या विकास कामांचे अद्यापही लोकार्पण होऊ शकले नाही. केवळ आपल्यावर जबाबदारी आहे म्हणून उलटसुलट उत्तरे देवून अधिकारी मोकळे होतात. लोकप्रतिनिधींना तर काही सोयरसूतकच नाही. अशा दृष्टचक्रात नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाचा विकास खुंटला आहे. या राष्ट्रीय उद्यानाला गतवैभव प्राप्त होईल का? हा प्रश्न पर्यटनप्रेमींना पडला आहे.नवेगावबांध, इटियाडोह, प्रतापगड या परिसरावर निसर्गाने अमाप सौंदर्याची उधळण केली आहे. एकेकाळी पक्षितज्ज्ञ मारुती चितमपल्ली, पक्षिमित्र डॉ.सलीम अली यांच्या वास्तव्यातून हे राष्ट्रीय उद्यान साकारले. सुमारे २५ वर्षापूर्वी या उद्यान परिसरात भेट दिल्यानंतर पर्यटक मोहीत होत असत, पण कालांतराने जसजसा या उद्यानाच्या विकासासाठी निधी प्राप्त होऊ लागला तेव्हापासूनच खऱ्या अर्थाने उद्यानाला वक्रदृष्टी लागली. आज या उद्यानाची एवढी अवदशा झाली आहे की, येथे आल्यानंतर पर्यटकांनी नाक मुरडले नाही तर नवलच ! सद्यस्थितीत हे राष्ट्रीय उद्यान राहिले नसून स्कार्फ बांधून येणाऱ्या प्रेमीयुगलांसाठी एक निरव शांततेचे ठिकाण झाले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री याच मतदारसंघातून निवडून आलेत. विरोधी बाकावर असताना त्यांना या उद्यानाविषयी प्रेत होते. ते यासाठी सत्तापक्षावर आकाडतांडव करायचे. पण हल्ली ते राज्याच्या कारभारात व्यस्त आहेत. उद्यानाच्या विकाससंदर्भात जिल्हाधिकारी व नियोजन अधिकाऱ्यांसोबत केवळ बैठका घेण्यापलीकडे काहीच फलीत नाही. प्रशासकीय यंत्रणा संवेदनशून्य दिसत आहे. उंटावरुन शेळ्या हाकण्याचा प्रकार सुरू आहे. प्रत्यक्षात या उद्यानाचा विकास व्हावा ही मानसिकताच दिसून येत नाही.आतापर्यंत राष्ट्रीय उद्यानाच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी केंद्र व राज्य शासनाकडून प्राप्त झाला. मात्र या खर्चाचा कोणी वालीच नाही. वारेमाप खर्च केला जातो. पण झालेल्या कामाचे योग्य मुल्यांकन सुद्धा होत नाही. डिसेंबर महिन्यात राष्ट्रीय उद्यानाच्या विकासासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पर्यटन विकास समितीने उपोषण करण्याचे पत्र दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून एक महिन्याच्या आत कामे पूर्ण करुन घेण्याचे आश्वासन दिले व उपोषण न करण्याचा सल्ला दिला. नागपूर येथील हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत एक सभा लावली. जिल्हाधिकाऱ्यांनी लोकार्पणाचे आश्वासन दिले. आजमितीस ८ महिन्यांचा कालावधी लोटला पण लोकार्पण झालेच नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक जिल्हास्तरीय पर्यटन समिती आहे. त्या समितीच्या पर्यटनसंदर्भात बैठका होतात. या ठिकाणी गार्डन तयार करण्यात आले, त्यावर सुमारे ७८ लाख रुपयांचा खर्च झाला. पाच वर्षापासून या बगिच्यात एकही फुलझाड लागले नाही. या बगिच्याचे प्रवेशद्वार गेल्या पाच वर्षापासून कुलूपबंदच आहे. तो संपूर्ण बगिचा भग्नावस्थेत आहे. संबंधित कंत्राटदाराकडून आम्ही अमक्या तारखेपर्यंत काम करुन घेतल्यानंतर लगेच लोकार्पण करु असा ठराव घेण्यात आला आहे, तसे संबंधितांना निर्देश देण्यात आले. मात्र अद्याप कुठलीच कृती झालेली नाही. याच गार्डनमध्ये स्टेप गार्डन आहे. यावर २२ लाखांचा खर्च करण्यात आला. मात्र या उद्यानात कुठेच स्टेप गार्डन असल्याचे दिसते. संगित फवारे कार्यान्वित होऊ शकले नाही. विद्युतीकरणावर आठ लाख रुपयांचा खर्च दाखविण्यात आला मात्र एकही दिवा येथे जळत नाही. कंत्राटदाराला बिलाची संपूर्ण राशी दिल्याचे सांगितले जाते. केवळ अनामत रक्कम शिल्लक आहे. काम पूर्ण झाल्याचे कंत्राटदार सांगतो. तुम्ही आपल्या ताब्यात हा गार्डन घेवून लोकार्पण करा असे सांगतो, मग चार वर्षापूर्वीपासून लोकार्पणाची प्रतीक्षा का? यात मोठा घोळ आहे.