शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

नगर पंचायतींचा बिगूल वाजला

By admin | Updated: September 30, 2015 05:18 IST

जिल्ह्यातील सालेकसा, सडक-अर्जुनी, अर्जुनी मोरगाव, गोरेगाव व देवरी या नव्याने अस्तित्वात आलेल्या पाच नगर

गोंदिया : जिल्ह्यातील सालेकसा, सडक-अर्जुनी, अर्जुनी मोरगाव, गोरेगाव व देवरी या नव्याने अस्तित्वात आलेल्या पाच नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. सोबतच या नगर पंचायत क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. ग्रामपंचायत बरखास्त होऊन नगर पंचायतचा दर्जा मिळाल्यानंतर पहिल्याच होत असलेल्या या निवडणुकीबाबत औत्सुक्याचे वातावरण आहे.विशेष म्हणजे नगर परिषदेप्रमाणे ही निवडणूक राजकीय पक्षांच्या चिन्हावर लढविली जाणार आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्ष आपले कोण उमेदवार उभे करायचे हे ठरविण्यापासून तर नगर पंचायतीवर आपले वर्चस्व कसे प्रस्थापित होईल यासाठी गेल्या काही दिवसांपासून कामी लागले आहेत. आता निवडणूक जाहीर झाल्यामुळे या कामाला आणखी वेग येणार आहे.राज्य निवडणूक आयोगाकडून घोषित केल्यानुसार सालेकसा, सडक/अर्जुनी, अर्जुनी/मोरगाव, गोरेगाव व देवरी या नगर पंचायत क्षेत्रात दि.२८ च्या मध्यरात्री १२ वाजतापासून निवडणूक आचासंहिता लागू करण्यात आली आहे. सर्व नगर पंचायतीचे प्रशासक तथा तहसीलदार यांनी आचासंहितेचे पालन काटेकोरपणे होईल याची दक्षता घ्यावी, तसेच आचारसंहितेबाबत तरतूदीचे सर्वतोपरी पालन होईल याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी केले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)निवडणुकीची वैशिष्ट्ये पक्षीय चिन्हांवर उमेदवार निवडणूक लढणार. त्यामुळे राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागणार.प्रत्येक उमेदवाराला निवडणूक खर्चाची मर्यादा दिड लाख रुपये ठेवण्यात आली आहे.नगर पंचायतींमध्ये ५० टक्के महिला आरक्षण राहणार आहे. त्यामुळे महिला उमेदवारांना तयार करताना पक्षांचा कस लागणार आहे.दि.२८ ला मध्यरात्री आचारसंहिता जाहीर झाली. त्यामुळे दि.२९ पासून दि.१ नोव्हेंबरपर्यंत अवघ्या ३३ दिवसांच्या कालावधीत सर्व खेळ करावा लागणार आहे.आमगावची निवडणूक न्यायालयाच्या निकालानंतरआमगाव नगर पंचायतीवर काही स्थानिक लोकांनी आक्षेप घेतला आहे. आमगावला नगर पंचायत नको तर नगर परिषदेचा दर्जा द्या, अशी मागणी करण्यात आली आहे. लगतच्या रिसामा बनगाव, पदमपूरला त्यात समाविष्ठ करून नगर परिषद बनवा अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात दाखल केली आहे. त्यावर न्यायालयाने नगर पंचायतीच्या अध्यादेशावर स्थगनादेश देऊन न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत पुढील प्रक्रिया न करण्याचा आदेश दिला आहे.असा आहे निवडणूक कार्यक्रम२९ सप्टेंबरला जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. १ ते ८ आॅक्टोबरपर्यंत नामनिर्देशपत्रे वाटप करून ते स्विकारले जातील. २ व ४ आॅक्टोबर या सुटीच्या दिवशी सोडून इतर दिवशी सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत नामनिर्देशनपत्र देण्यात व स्विकारली जातील. ९ आॅक्टोबरला नामनिर्देशनपत्रांची छानणी व वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध होणार आहे. १९ आॅक्टोबरपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची मुदत आहे. त्यानंतर निवडणूक चिन्ह देऊन अंतिमरित्या निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. २६ आॅक्टोबरला मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध होणार असून १ नोव्हेंबरला सकाळी ७.३० पासून ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदान होणार आहे. २ नोव्हेंबरला सकाळी १० वाजतापासून मतमोजणी सुरू होईल.