शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
2
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
3
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
4
भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?
5
पाकिस्ताने भारतातील १५ ठिकाणी क्षेपणास्त्रे डागली; एस-४०० 'सुदर्शन चक्र'ने हवेतच केली उद्ध्वस्त
6
Operation Sindoor: पाकिस्तानसोबतच चीनलाही दणका! भारतानं उद्ध्वस्त केलेली लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम काय आहे?
7
'आम्ही तुमच्यासोबत आहोत', ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांचा सरकारला पाठिंबा
8
Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”
9
Raigad Accident: रायगडमध्ये भीषण अपघात! डंपर आणि एसटीच्या धडकेत चौघांचा मृत्यू, २० जण गंभीर जखमी
10
आधी सिंदूर आता आणणार पूर! भारताने उघडले बगलिहारचे दरवाजे, पाकिस्तानात पाणीच पाणी
11
"डॉक्टरांच्या चुकीमुळे गर्भपात झाला", प्रसिद्ध अभिनेत्रीची दुःखद कहाणी, म्हणाली- "तिसऱ्या महिन्यातच मला..."
12
Operation Sindoor: मोठी बातमी! कंदहार प्लेन हायजॅकचा मास्टरमाईंड रौफ असगरचा हल्ल्यात खात्मा
13
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सर्वपक्षीय एकत्र; बैठक संपताच काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले...
14
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानच्या दोन मित्रराष्ट्रांचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर, जयशंकर यांची भेट
15
Operation Sindoor : एअर स्ट्राइक दिवशी झाला जन्म, कुटुंबीयांनी मुलीचे नाव 'सिंदूर' ठेवले
16
तुम्हीही वारंवार पर्सनल लोन घेता? मग 'हे' ५ मोठे तोटे समजून घ्या; अनेकजण करतात दुर्लक्ष
17
Mumbai: पत्नीची हत्या करून मृतदेह बेडमध्ये लपवला, मुंबईतील गोरेगाव येथील धक्कादायक प्रकार
18
"मी रात्रभर त्यांच्या फोनची वाट पाहिली, पण..."; ढसाढसा रडली शहीद दिनेश कुमार यांची पत्नी
19
"तुमच्या हातात माईक दिलाय म्हणून तुम्ही काहीही बडबडू नका..."; रोहित शर्मा समालोचकांवर भडकला
20
'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरूच! किती आतंकवादी मारले? संरक्षण मंत्र्यांनी आकडाच सांगितला!

नगर पंचायतची विकासकामे ठप्प

By admin | Updated: February 27, 2016 02:11 IST

आमगाव हे शहर तालुक्यातील मुख्यस्थान येथील विकासाचा प्रारूप तालुक्यातील ग्रामपंचायतीकरिता मॉडल म्हणून पुढे येतो.

नवीन कामांना मंजुरी नाही : अवैध बांधकामांना पाठबळआमगाव : आमगाव हे शहर तालुक्यातील मुख्यस्थान येथील विकासाचा प्रारूप तालुक्यातील ग्रामपंचायतीकरिता मॉडल म्हणून पुढे येतो. मात्र नगर पंचायतचा दर्जा मिळून प्रशासकांच्या हातात कारभार आल्याने विकासकामांना मंजुरी नसून विकासकामे ठप्प पडली आहेत. आमगाव हे तालुकास्थळ असून येथील ग्रामपंचायत तालुक्यातील मुख्य ग्रामपंचायत आहे. वाढती लोकसंख्या बघता शासनाने १६ फेबु्रवारी २०१५ ला आमगावला नगर पंचायत दर्जा देत येथे प्रशासकांची नियुक्ती केली. शासनाने आमगाव ग्रामपंचायतला नगर पंचायतचा दर्जा देताना मुलभूत मागणीकडे गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे येथील नागरिकांनी नगर पंचायत विरूद्ध विरुद्ध न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे येथे एक वर्षापासून प्रशासकांचा कारभार सुरू आहे.येथील अपूर्ण कामे पूर्ण व्हावी यासाठी नागरिकांनी प्रशासकांना अनेकदा मागणी केली. परंतु विकासकामांना प्रारंभ करण्यात आला नाही. येथील नाल्यांचे बांधकाम, दुरुस्ती, स्वच्छता अभियान, पिण्याच्या पाण्याची समस्या, सिंचन सुविधा, रस्ते दुरुस्ती व बांधकाम, शासकीय जमिनीवरील वाढते अतिक्रमण, अवैध बांधकाम, आरोग्य समस्या, शासकीय रुग्णालयांचे हाल, आर्थिक दुर्बलांची निवास योजना तसेच शासकीय योजनांचे लाभ या मुलभूत आवश्यकता नगर पंचायत कार्यालयात प्रशासकांपुढे दप्तरजमा झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना प्रशासकांचे कारभार डोईजड झाले आहे.आमगाव नगर पंचायत प्रभागामध्ये नाल्यांच्या अस्वच्छतेमुळे गलिच्छ वातावरण निर्माण झाले आहे. नाल्यांची दुरुस्ती व पूर्ण बांधकामाला मंजुरी नसल्याने घाणीचे वातावरण परिसरात पसरले आहे. तसेच वाढत्या घाणीमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. अस्वच्छता व आरोग्य समस्यांमुळे रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. परंतु अस्वच्छता व जंतुनाशक औषधांची फवारणीकडे विभागाने हात घातला नाही. प्रभाग क्रमांक दोन, तीन, चार व सहामध्ये प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे रस्ते, सांडपाणी व अस्वच्छतेची समस्या वाढली आहे.प्रशासकांचे कार्यकाळ एक वर्ष पूर्ण झाले आहे. या नगर पंचायत गावातील विकास कामांना मंजुरीच मिळत नाही. तर नगर पंचायत हद्दीत असलेल्या शासकीय जमिनीवर मात्र अवैध बांधकामाना पाठबळ देण्यात आले आहे. त्यामुळे विकासकामांना पाठ तर अवैध बांधकामांना पाठबळ अशी अवस्था नगर पंचायतमध्ये दिसून येत आहे. आमगाव ग्रामपंचायतला शासनाने नगर पंचायतचा दर्जा दिला आहे. परंतु नागरिकांनी नगर पंचायत ऐवजी नगर परिषद व्हावी यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. परंतु एक वर्ष लोटूनही निर्णय होत नसल्याने प्रशासकांचा कार्यकाळ नागरिकांना डोईजड होत आहे. विकास व शासन योजनांचे कार्य ठप्प पडल्याने नागरिक हैरान झाले आहेत. आता शासनाने योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी नागरिक करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)