शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
5
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
6
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
7
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
8
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
9
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
10
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
11
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
12
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
13
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
14
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
15
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
16
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
17
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
18
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
19
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
20
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?

नगर पंचायतची विकासकामे ठप्प

By admin | Updated: February 27, 2016 02:11 IST

आमगाव हे शहर तालुक्यातील मुख्यस्थान येथील विकासाचा प्रारूप तालुक्यातील ग्रामपंचायतीकरिता मॉडल म्हणून पुढे येतो.

नवीन कामांना मंजुरी नाही : अवैध बांधकामांना पाठबळआमगाव : आमगाव हे शहर तालुक्यातील मुख्यस्थान येथील विकासाचा प्रारूप तालुक्यातील ग्रामपंचायतीकरिता मॉडल म्हणून पुढे येतो. मात्र नगर पंचायतचा दर्जा मिळून प्रशासकांच्या हातात कारभार आल्याने विकासकामांना मंजुरी नसून विकासकामे ठप्प पडली आहेत. आमगाव हे तालुकास्थळ असून येथील ग्रामपंचायत तालुक्यातील मुख्य ग्रामपंचायत आहे. वाढती लोकसंख्या बघता शासनाने १६ फेबु्रवारी २०१५ ला आमगावला नगर पंचायत दर्जा देत येथे प्रशासकांची नियुक्ती केली. शासनाने आमगाव ग्रामपंचायतला नगर पंचायतचा दर्जा देताना मुलभूत मागणीकडे गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे येथील नागरिकांनी नगर पंचायत विरूद्ध विरुद्ध न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे येथे एक वर्षापासून प्रशासकांचा कारभार सुरू आहे.येथील अपूर्ण कामे पूर्ण व्हावी यासाठी नागरिकांनी प्रशासकांना अनेकदा मागणी केली. परंतु विकासकामांना प्रारंभ करण्यात आला नाही. येथील नाल्यांचे बांधकाम, दुरुस्ती, स्वच्छता अभियान, पिण्याच्या पाण्याची समस्या, सिंचन सुविधा, रस्ते दुरुस्ती व बांधकाम, शासकीय जमिनीवरील वाढते अतिक्रमण, अवैध बांधकाम, आरोग्य समस्या, शासकीय रुग्णालयांचे हाल, आर्थिक दुर्बलांची निवास योजना तसेच शासकीय योजनांचे लाभ या मुलभूत आवश्यकता नगर पंचायत कार्यालयात प्रशासकांपुढे दप्तरजमा झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना प्रशासकांचे कारभार डोईजड झाले आहे.आमगाव नगर पंचायत प्रभागामध्ये नाल्यांच्या अस्वच्छतेमुळे गलिच्छ वातावरण निर्माण झाले आहे. नाल्यांची दुरुस्ती व पूर्ण बांधकामाला मंजुरी नसल्याने घाणीचे वातावरण परिसरात पसरले आहे. तसेच वाढत्या घाणीमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. अस्वच्छता व आरोग्य समस्यांमुळे रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. परंतु अस्वच्छता व जंतुनाशक औषधांची फवारणीकडे विभागाने हात घातला नाही. प्रभाग क्रमांक दोन, तीन, चार व सहामध्ये प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे रस्ते, सांडपाणी व अस्वच्छतेची समस्या वाढली आहे.प्रशासकांचे कार्यकाळ एक वर्ष पूर्ण झाले आहे. या नगर पंचायत गावातील विकास कामांना मंजुरीच मिळत नाही. तर नगर पंचायत हद्दीत असलेल्या शासकीय जमिनीवर मात्र अवैध बांधकामाना पाठबळ देण्यात आले आहे. त्यामुळे विकासकामांना पाठ तर अवैध बांधकामांना पाठबळ अशी अवस्था नगर पंचायतमध्ये दिसून येत आहे. आमगाव ग्रामपंचायतला शासनाने नगर पंचायतचा दर्जा दिला आहे. परंतु नागरिकांनी नगर पंचायत ऐवजी नगर परिषद व्हावी यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. परंतु एक वर्ष लोटूनही निर्णय होत नसल्याने प्रशासकांचा कार्यकाळ नागरिकांना डोईजड होत आहे. विकास व शासन योजनांचे कार्य ठप्प पडल्याने नागरिक हैरान झाले आहेत. आता शासनाने योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी नागरिक करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)