शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
3
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
4
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
5
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
6
Tata घराण्यात मोठा बदल, नोएल टाटांच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी; परदेशातून घेतलंय शिक्षण
7
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
8
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
9
दिल्लीतील स्फोटामुळे 'कॉकटेल २'चं शूट पुढे ढकललं, आजपासूनच होणार होती सुरुवात
10
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
11
धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; सनी देओलच्या टीमने दिलं स्टेटमेंट, 'त्यांचं तुमच्यावर..."
12
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
13
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
14
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
15
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
16
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
17
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
18
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
19
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
20
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश

नाबार्डने केली यंदा पीक कर्जाच्या उद्दिष्टात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 05:00 IST

मागील २-३ वर्षांपासून काही जिल्ह्यात पीक कर्जाच्या मागणीत घट होत होती. तर काही जिल्ह्यांत पीक कर्ज वसुलीचा आकडा हा वाटपाच्या तुलनेत फार कमी होता. त्यामुळे मागील वर्षी खरीप हंगामात पीक कर्ज वाटपाचे प्रत्येक जिल्ह्याचे उद्दिष्ट नाबार्डने ३० ते ४० कोटी रुपयांनी कमी केली होते. त्यामुळे यंदा नाबार्ड नेमकी काय भूमिका घेते याकडे सर्व शेतकºयांचे लक्ष लागले होते.

ठळक मुद्देमागील वर्षी केली होती कपात : ‘लॉकडाऊन’च्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा

अंकुश गुंडावार।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सध्या सर्वत्र ‘लॉकडाऊन’ आणि संचारबंदी लागू आहे. तर खरीप हंगाम सुरू होण्यास अद्याप महिनाभराचा कालावधी शिल्लक आहे. मात्र ‘लॉकडाऊन’चा शेतीविषयक कामांवर परिणाम होवू नये यासाठी सरकारने शेतीविषयक कामांना यातून सुट दिली आहे. तर नाबार्डने सुद्धा यंदा बँकाच्या पीक कर्जाच्या उद्दिष्टात वाढ केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही दिलासा दायक बाब आहे.मागील २-३ वर्षांपासून काही जिल्ह्यात पीक कर्जाच्या मागणीत घट होत होती. तर काही जिल्ह्यांत पीक कर्ज वसुलीचा आकडा हा वाटपाच्या तुलनेत फार कमी होता. त्यामुळे मागील वर्षी खरीप हंगामात पीक कर्ज वाटपाचे प्रत्येक जिल्ह्याचे उद्दिष्ट नाबार्डने ३० ते ४० कोटी रुपयांनी कमी केली होते. त्यामुळे यंदा नाबार्ड नेमकी काय भूमिका घेते याकडे सर्व शेतकºयांचे लक्ष लागले होते. संपूर्ण देशभरात मागील १ महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव असून तो कमी करण्यासाठी सरकारने ‘लॉकडाऊन’ आणि संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे याचा कृषी विषयक कामांवर परिणाम होवू नये, तसेच झाल्यास त्याचे अर्थव्यवस्थेवर परिणाम होवू शकतात. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने नाबार्डला २५ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे नाबार्डने यंदा पीक कर्ज वाटपाच्या उद्दिष्टामध्ये वाढ केली आहे.गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेला मागील वर्षी खरीप आणि रब्बी हंगाम मिळून ११० कोटी रूपयांचे उद्दिष्ट दिले होते. तर यंदाच्या खरीप आणि रब्बी हंगामासाठी एकूण १५१ कोटी ८० लाख रुपयांचे उद्दिष्ट दिले आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या तुुलनेत पीक कर्ज वाटपाच्या उद्दिष्टात ४१ कोटी रुपयांनी वाढ केली आहे. याच प्रमाणे प्रत्येक जिल्ह्याच्या पीक कर्ज वाटपाच्या उद्दिष्टात वाढ केली आहे. त्यामुळे कृषी विषयक कामे करताना शेतकºयांना अडचण भासणार नाही.शेतकºयांना सर्वाधिक पीक कर्जाचे वाटप जिल्हा बँक करीत असतात. या बँकांमधून पीक कर्जाची उचल करण्याची प्रक्रिया ही राष्ट्रीयकृत बँकांच्या तुलनेत सोपी असते.त्यामुळे ही बँक शेतकºयांना आपली वाटते. नाबार्डने पीक कर्जाच्या उद्दिष्टात यंदा वाढ करुन दिल्याने ‘लॉकडाऊन’च्या काळात लाखो शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.पीक कर्ज वाटपाला सुरूवातशेतकºयांनी खरीप हंगामपूर्व शेतीच्या कामाला सुरूवात केली आहे. सध्या शेतकºयांनी खरीपासाठी शेतीच्या नांगरणीसह इतर कामांना सुरूवात केली आहे. त्यामुळे शेतीविषयक खर्चाला सुरूवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर बँकांनी सुद्धा १ एप्रिलपासून पीक कर्ज वाटपाला सुरूवात केली आहे. गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेने आत्तापर्यंत १७६ शेतकºयांना ७२ कोटी ७९ लाख रुपयांचे पीक कर्जाचे वाटप केले आहे.सातबारा मिळण्याची अडचणकोरोनाचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी सरकारने देशभरात ‘लॉकडाऊन’ आणि संचारबंदी लागू केली आहे. तसेच शासकीय कार्यालयांमध्ये कर्मचाºयांची १० टक्के उपस्थिती अनिवार्य केली आहे. मात्र ग्रामीण भागात तलाठी व इतर कर्मचारी अद्यापही कार्यालयात राहत नसल्याने शेतकºयांना सातबारा काढण्यासाठी अडचण जात आहे. जोपर्यंत सातबारा मिळत नाही, तोपर्यंत शेतकºयांना पीक कर्जाची उचल करता येत नाही. त्यामुळे जिल्हाधिकाºयांनी या समस्येकडे लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :Crop Loanपीक कर्ज