शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
2
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
3
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
4
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
5
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
6
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
7
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
8
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
9
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
10
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
11
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
12
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
13
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
14
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
15
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
16
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
17
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
18
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
19
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
20
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे

सर्वाधिक महिलांना रक्तक्षयाचा आजार

By admin | Updated: May 28, 2016 01:47 IST

स्त्री व पुरूष यांच्या शरीररचनेसह विचार करण्याच्या पद्धतीत निसर्गानेच फरक केला आहे. मासिक पाळीमुळे दर महिन्यात महिलांच्या रक्ताचे प्रमाण कमी-अधिक होते.

आरोग्य महिलांचे : सहा वर्षात प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतर जिल्ह्यात ९८ महिलांचा मृत्यूदेवानंद शहारे गोंदियास्त्री व पुरूष यांच्या शरीररचनेसह विचार करण्याच्या पद्धतीत निसर्गानेच फरक केला आहे. मासिक पाळीमुळे दर महिन्यात महिलांच्या रक्ताचे प्रमाण कमी-अधिक होते. शिवाय गरोदर स्त्रीला तर रक्ताची जास्तच गरज असते. त्यामुळे जिल्ह्यात सर्वाधिक महिलांना रक्तक्षयाचा आजार भेडसावत आहे. यातूनच प्रसुतीपूर्वी किंवा प्रसुतीनंतर प्रकृती खालावून महिला दगावत आहेत. अलिकडे हे प्रमाण कमी होत असले तरी त्यावर पूर्णपणे नियंत्रण मिळविणे आरोग्य विभागाला शक्य झालेले नाही.कुपोषित बाळ जन्माला येवू नये यासाठी स्त्रियांनाच मोठी काळजी घ्यावी लागते. सर्वप्रथम शरीर, मनाने विकसित झाल्याशिवाय व शरीर गर्भधारणेसाठी तयार झाल्याशिवाय स्त्रियांनी लग्न करू नये. वयोमानानुसार १८ वर्षांपूर्वी तर मुलीने लग्न करूच नये, असे आरोग्य विभागाकडून सांगितले जाते. त्यासाठी विविध स्तरावर जनजागृती केली जाते. तरीही आदिवासीबहुल आणि भटक्या जमातीत लवकर लग्न करण्याची पद्धत रूढ आहे. लग्नानंतर पहिली मासिक पाळी चुकते तेव्हा वैद्यकीय सल्ला व तपासण्या करून घेणे आवश्यक असते. शरीरास आवश्यक असलेले अन्नघटक आपल्या आहारातून मिळतात किंवा नाही, याकडे लक्ष देणे गरजेचे असते. असे अन्नघटक किंवा जीवनसत्वे आहारात मिळत नसतील तर योग्य अन्नघटकांचा वापर आपल्या आहारात करणे गरजेचे आहे. परंतू ग्रामीण भागात आर्थिक परिस्थिती आणि जागृतीचा अभाव यामुळे महिला सकस आराहाच्या बाबतीत गंभीर दिसत नाहीत. महिलेच्या शरीरात रक्ताची (हिमोग्लोबिन) कमतरता असेल तर होणारे बाळ कुपोषित होण्याची शक्यता असते. सुरूवातीला बाळात अशी लक्षणे आढळत नसली तरी भविष्यात ती दिसू लागतात. मातेच्या रक्तातूनच तिच्या गर्भात वाढणाऱ्या बाळास पोषक आहार मिळतो व बाळ सुदृढ होते. जर मातेलाच रक्ताची कमतरता असेल तर होणारे बाळ कमजोर राहते किंवा त्याचा एखादा भाग कमकुवत असण्याची शक्यता असते. त्यामुळे होणाऱ्या बाळासाठी आईचा आहार सर्वकाही असते. अलिकडे अंगणवाडी आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातून गरोदर महिलांच्या सकस आहारापासून तर औषधोपचारापर्यंतची काळजी घेतली जात असतानाही काही महिलांमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण आढळते. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांरी कितपत इमानदारीने कर्तव्य करतात यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.महिलांनी प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतर नियमित वैद्यकीय तपासण्या करणे गरजेचे आहे. यात ब्लड प्रेशर, गर्भाचा घेर, रक्ताचे प्रमाण, आईचे वजन आदी तपासण्या प्रामुख्याने करणे गरजेचे असते. यातून होणारे बाळ सशक्त आहे किंवा नाही हे समजते. आईचे वजन वाढत असेल व रक्ताचे प्रमाणही योग्य असेल तर होणारे बाळ सुदृढ असते. अन्यथा मातामृत्यू व अर्भक मृत्यूचा धोका असतो. मागील सहा वर्षांत जिल्ह्यात प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतर एकूण ९८ मातामृत्यू झाल्या आहेत.महिलांना उद्भवणारे आजारगोंदिया जिल्ह्यातील महिलांमध्ये आढळणाऱ्या आजारात सर्वप्रथम रक्तक्षयाचा क्रमांक आहे. शरीरात रक्ताची कमतरता असणे, त्यामुळे नंतर रक्तदाबाचा (बी.पी) आजार होण्याची शक्यता असते. त्यानंतर तिसरी स्टेप म्हणजे गर्भाला विषबाधा होणे. यात आईच्या जीवाला धोका होण्याची शक्यता असते. मात्र ही बाधा शोधण्याचे अत्याधुनिक तंत्र आता निघाले आहे. सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात प्रसूतीपूर्व दोन व प्रसूतीनंतर सहा अशा एकूण आठ मातामृत्यू झाल्या. मात्र प्रसूतीदरम्यान एकाही मातेचा मृत्यू झाला नाही. पीएएनए कार्यक्रमकोणत्याही महिलेमध्ये रक्ताचे प्रमाण व्यवस्थित राहात नाही. दर महिन्यात हे प्रमाण कमी-जास्त होते. गरोदर महिलांनी आपल्या आहारविहाराचे वेळापत्रक तयार करून पोषक तत्वांचा त्यात समावेश करावा. शिवाय शासनातर्फे पीएएनए (प्रोफीलॅक्सीक अगेन्स्ट न्युट्रीशनल एनिमिया) हा कार्यक्रम राबविण्यात येतो. त्यानुसार रक्ताची कमतरता असलेल्या महिलेसाठी १०० गोळ्या दिल्या जातात. दररोज एक गोळी याप्रमाणे सेवन करावी लागते. तसेच गरोदर महिलांनी शासनाच्या जननी सुरक्षा योजनेचा लाभ घ्यावा. त्याद्वारे त्यांना मार्गदर्शन व औषधोपचार केला जातो.