शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
“रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
3
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हण्याल्या...
4
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
5
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
6
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
7
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
8
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
9
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
10
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
11
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
12
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
13
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
14
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
15
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
16
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
17
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
18
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
19
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
20
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
Daily Top 2Weekly Top 5

सर्वाधिक महिलांना रक्तक्षयाचा आजार

By admin | Updated: May 28, 2016 01:47 IST

स्त्री व पुरूष यांच्या शरीररचनेसह विचार करण्याच्या पद्धतीत निसर्गानेच फरक केला आहे. मासिक पाळीमुळे दर महिन्यात महिलांच्या रक्ताचे प्रमाण कमी-अधिक होते.

आरोग्य महिलांचे : सहा वर्षात प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतर जिल्ह्यात ९८ महिलांचा मृत्यूदेवानंद शहारे गोंदियास्त्री व पुरूष यांच्या शरीररचनेसह विचार करण्याच्या पद्धतीत निसर्गानेच फरक केला आहे. मासिक पाळीमुळे दर महिन्यात महिलांच्या रक्ताचे प्रमाण कमी-अधिक होते. शिवाय गरोदर स्त्रीला तर रक्ताची जास्तच गरज असते. त्यामुळे जिल्ह्यात सर्वाधिक महिलांना रक्तक्षयाचा आजार भेडसावत आहे. यातूनच प्रसुतीपूर्वी किंवा प्रसुतीनंतर प्रकृती खालावून महिला दगावत आहेत. अलिकडे हे प्रमाण कमी होत असले तरी त्यावर पूर्णपणे नियंत्रण मिळविणे आरोग्य विभागाला शक्य झालेले नाही.कुपोषित बाळ जन्माला येवू नये यासाठी स्त्रियांनाच मोठी काळजी घ्यावी लागते. सर्वप्रथम शरीर, मनाने विकसित झाल्याशिवाय व शरीर गर्भधारणेसाठी तयार झाल्याशिवाय स्त्रियांनी लग्न करू नये. वयोमानानुसार १८ वर्षांपूर्वी तर मुलीने लग्न करूच नये, असे आरोग्य विभागाकडून सांगितले जाते. त्यासाठी विविध स्तरावर जनजागृती केली जाते. तरीही आदिवासीबहुल आणि भटक्या जमातीत लवकर लग्न करण्याची पद्धत रूढ आहे. लग्नानंतर पहिली मासिक पाळी चुकते तेव्हा वैद्यकीय सल्ला व तपासण्या करून घेणे आवश्यक असते. शरीरास आवश्यक असलेले अन्नघटक आपल्या आहारातून मिळतात किंवा नाही, याकडे लक्ष देणे गरजेचे असते. असे अन्नघटक किंवा जीवनसत्वे आहारात मिळत नसतील तर योग्य अन्नघटकांचा वापर आपल्या आहारात करणे गरजेचे आहे. परंतू ग्रामीण भागात आर्थिक परिस्थिती आणि जागृतीचा अभाव यामुळे महिला सकस आराहाच्या बाबतीत गंभीर दिसत नाहीत. महिलेच्या शरीरात रक्ताची (हिमोग्लोबिन) कमतरता असेल तर होणारे बाळ कुपोषित होण्याची शक्यता असते. सुरूवातीला बाळात अशी लक्षणे आढळत नसली तरी भविष्यात ती दिसू लागतात. मातेच्या रक्तातूनच तिच्या गर्भात वाढणाऱ्या बाळास पोषक आहार मिळतो व बाळ सुदृढ होते. जर मातेलाच रक्ताची कमतरता असेल तर होणारे बाळ कमजोर राहते किंवा त्याचा एखादा भाग कमकुवत असण्याची शक्यता असते. त्यामुळे होणाऱ्या बाळासाठी आईचा आहार सर्वकाही असते. अलिकडे अंगणवाडी आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातून गरोदर महिलांच्या सकस आहारापासून तर औषधोपचारापर्यंतची काळजी घेतली जात असतानाही काही महिलांमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण आढळते. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांरी कितपत इमानदारीने कर्तव्य करतात यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.महिलांनी प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतर नियमित वैद्यकीय तपासण्या करणे गरजेचे आहे. यात ब्लड प्रेशर, गर्भाचा घेर, रक्ताचे प्रमाण, आईचे वजन आदी तपासण्या प्रामुख्याने करणे गरजेचे असते. यातून होणारे बाळ सशक्त आहे किंवा नाही हे समजते. आईचे वजन वाढत असेल व रक्ताचे प्रमाणही योग्य असेल तर होणारे बाळ सुदृढ असते. अन्यथा मातामृत्यू व अर्भक मृत्यूचा धोका असतो. मागील सहा वर्षांत जिल्ह्यात प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतर एकूण ९८ मातामृत्यू झाल्या आहेत.महिलांना उद्भवणारे आजारगोंदिया जिल्ह्यातील महिलांमध्ये आढळणाऱ्या आजारात सर्वप्रथम रक्तक्षयाचा क्रमांक आहे. शरीरात रक्ताची कमतरता असणे, त्यामुळे नंतर रक्तदाबाचा (बी.पी) आजार होण्याची शक्यता असते. त्यानंतर तिसरी स्टेप म्हणजे गर्भाला विषबाधा होणे. यात आईच्या जीवाला धोका होण्याची शक्यता असते. मात्र ही बाधा शोधण्याचे अत्याधुनिक तंत्र आता निघाले आहे. सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात प्रसूतीपूर्व दोन व प्रसूतीनंतर सहा अशा एकूण आठ मातामृत्यू झाल्या. मात्र प्रसूतीदरम्यान एकाही मातेचा मृत्यू झाला नाही. पीएएनए कार्यक्रमकोणत्याही महिलेमध्ये रक्ताचे प्रमाण व्यवस्थित राहात नाही. दर महिन्यात हे प्रमाण कमी-जास्त होते. गरोदर महिलांनी आपल्या आहारविहाराचे वेळापत्रक तयार करून पोषक तत्वांचा त्यात समावेश करावा. शिवाय शासनातर्फे पीएएनए (प्रोफीलॅक्सीक अगेन्स्ट न्युट्रीशनल एनिमिया) हा कार्यक्रम राबविण्यात येतो. त्यानुसार रक्ताची कमतरता असलेल्या महिलेसाठी १०० गोळ्या दिल्या जातात. दररोज एक गोळी याप्रमाणे सेवन करावी लागते. तसेच गरोदर महिलांनी शासनाच्या जननी सुरक्षा योजनेचा लाभ घ्यावा. त्याद्वारे त्यांना मार्गदर्शन व औषधोपचार केला जातो.