शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

सर्वाधिक महिलांना रक्तक्षयाचा आजार

By admin | Updated: May 28, 2016 01:47 IST

स्त्री व पुरूष यांच्या शरीररचनेसह विचार करण्याच्या पद्धतीत निसर्गानेच फरक केला आहे. मासिक पाळीमुळे दर महिन्यात महिलांच्या रक्ताचे प्रमाण कमी-अधिक होते.

आरोग्य महिलांचे : सहा वर्षात प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतर जिल्ह्यात ९८ महिलांचा मृत्यूदेवानंद शहारे गोंदियास्त्री व पुरूष यांच्या शरीररचनेसह विचार करण्याच्या पद्धतीत निसर्गानेच फरक केला आहे. मासिक पाळीमुळे दर महिन्यात महिलांच्या रक्ताचे प्रमाण कमी-अधिक होते. शिवाय गरोदर स्त्रीला तर रक्ताची जास्तच गरज असते. त्यामुळे जिल्ह्यात सर्वाधिक महिलांना रक्तक्षयाचा आजार भेडसावत आहे. यातूनच प्रसुतीपूर्वी किंवा प्रसुतीनंतर प्रकृती खालावून महिला दगावत आहेत. अलिकडे हे प्रमाण कमी होत असले तरी त्यावर पूर्णपणे नियंत्रण मिळविणे आरोग्य विभागाला शक्य झालेले नाही.कुपोषित बाळ जन्माला येवू नये यासाठी स्त्रियांनाच मोठी काळजी घ्यावी लागते. सर्वप्रथम शरीर, मनाने विकसित झाल्याशिवाय व शरीर गर्भधारणेसाठी तयार झाल्याशिवाय स्त्रियांनी लग्न करू नये. वयोमानानुसार १८ वर्षांपूर्वी तर मुलीने लग्न करूच नये, असे आरोग्य विभागाकडून सांगितले जाते. त्यासाठी विविध स्तरावर जनजागृती केली जाते. तरीही आदिवासीबहुल आणि भटक्या जमातीत लवकर लग्न करण्याची पद्धत रूढ आहे. लग्नानंतर पहिली मासिक पाळी चुकते तेव्हा वैद्यकीय सल्ला व तपासण्या करून घेणे आवश्यक असते. शरीरास आवश्यक असलेले अन्नघटक आपल्या आहारातून मिळतात किंवा नाही, याकडे लक्ष देणे गरजेचे असते. असे अन्नघटक किंवा जीवनसत्वे आहारात मिळत नसतील तर योग्य अन्नघटकांचा वापर आपल्या आहारात करणे गरजेचे आहे. परंतू ग्रामीण भागात आर्थिक परिस्थिती आणि जागृतीचा अभाव यामुळे महिला सकस आराहाच्या बाबतीत गंभीर दिसत नाहीत. महिलेच्या शरीरात रक्ताची (हिमोग्लोबिन) कमतरता असेल तर होणारे बाळ कुपोषित होण्याची शक्यता असते. सुरूवातीला बाळात अशी लक्षणे आढळत नसली तरी भविष्यात ती दिसू लागतात. मातेच्या रक्तातूनच तिच्या गर्भात वाढणाऱ्या बाळास पोषक आहार मिळतो व बाळ सुदृढ होते. जर मातेलाच रक्ताची कमतरता असेल तर होणारे बाळ कमजोर राहते किंवा त्याचा एखादा भाग कमकुवत असण्याची शक्यता असते. त्यामुळे होणाऱ्या बाळासाठी आईचा आहार सर्वकाही असते. अलिकडे अंगणवाडी आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातून गरोदर महिलांच्या सकस आहारापासून तर औषधोपचारापर्यंतची काळजी घेतली जात असतानाही काही महिलांमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण आढळते. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांरी कितपत इमानदारीने कर्तव्य करतात यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.महिलांनी प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतर नियमित वैद्यकीय तपासण्या करणे गरजेचे आहे. यात ब्लड प्रेशर, गर्भाचा घेर, रक्ताचे प्रमाण, आईचे वजन आदी तपासण्या प्रामुख्याने करणे गरजेचे असते. यातून होणारे बाळ सशक्त आहे किंवा नाही हे समजते. आईचे वजन वाढत असेल व रक्ताचे प्रमाणही योग्य असेल तर होणारे बाळ सुदृढ असते. अन्यथा मातामृत्यू व अर्भक मृत्यूचा धोका असतो. मागील सहा वर्षांत जिल्ह्यात प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतर एकूण ९८ मातामृत्यू झाल्या आहेत.महिलांना उद्भवणारे आजारगोंदिया जिल्ह्यातील महिलांमध्ये आढळणाऱ्या आजारात सर्वप्रथम रक्तक्षयाचा क्रमांक आहे. शरीरात रक्ताची कमतरता असणे, त्यामुळे नंतर रक्तदाबाचा (बी.पी) आजार होण्याची शक्यता असते. त्यानंतर तिसरी स्टेप म्हणजे गर्भाला विषबाधा होणे. यात आईच्या जीवाला धोका होण्याची शक्यता असते. मात्र ही बाधा शोधण्याचे अत्याधुनिक तंत्र आता निघाले आहे. सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात प्रसूतीपूर्व दोन व प्रसूतीनंतर सहा अशा एकूण आठ मातामृत्यू झाल्या. मात्र प्रसूतीदरम्यान एकाही मातेचा मृत्यू झाला नाही. पीएएनए कार्यक्रमकोणत्याही महिलेमध्ये रक्ताचे प्रमाण व्यवस्थित राहात नाही. दर महिन्यात हे प्रमाण कमी-जास्त होते. गरोदर महिलांनी आपल्या आहारविहाराचे वेळापत्रक तयार करून पोषक तत्वांचा त्यात समावेश करावा. शिवाय शासनातर्फे पीएएनए (प्रोफीलॅक्सीक अगेन्स्ट न्युट्रीशनल एनिमिया) हा कार्यक्रम राबविण्यात येतो. त्यानुसार रक्ताची कमतरता असलेल्या महिलेसाठी १०० गोळ्या दिल्या जातात. दररोज एक गोळी याप्रमाणे सेवन करावी लागते. तसेच गरोदर महिलांनी शासनाच्या जननी सुरक्षा योजनेचा लाभ घ्यावा. त्याद्वारे त्यांना मार्गदर्शन व औषधोपचार केला जातो.