शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

डिजिटल शाळांतील बहुतांश एलसीडी झाल्या खराब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:34 IST

गोंदिया : प्रत्येक विद्यार्थ्याला डिजिटल शिक्षण देता यावे, यासाठी लोकसहभागातून डिजिटल करण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमधील एलसीडींची मात्र आता ...

गोंदिया : प्रत्येक विद्यार्थ्याला डिजिटल शिक्षण देता यावे, यासाठी लोकसहभागातून डिजिटल करण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमधील एलसीडींची मात्र आता नासधूस होताना दिसत आहे. कोरोनामुळे मागील मार्च महिन्यापासून शाळा बंद असल्याने, या एलसीडी नादुरुस्त होत आहेत. शिवाय उंदरांनी एलसीडींची तार कुरतडल्याचेही आता दिसून येत आहे.

महाराष्ट्र शासनाने २२ जून, २०१५ रोजी पारित केलेला प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम राज्यात राबविला जात असल्याने, प्रत्येक विद्यार्थी घडविण्याच्या प्रक्रियेला अधिकाधिक गती मिळाली आहे. त्यामुळे समाजाचा जिल्हा परिषद शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. आदिवासी बहुल व नक्षल प्रभावित म्हणून चर्चेत असलेला गोंदिया जिल्हा महाराष्ट्राच्या पूर्व टोकावरचा जिल्हा आहे. हिंदी भाषिक मध्य प्रदेश व छत्तीसगड राज्याच्या सीमा लागून असल्याने बोलीभाषेवर हिंदीचा प्रभाव आहे. अवघे ५,४३१ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या जिल्ह्यात सर्व बाबतीत विविधता आढळून येते. मात्र, प्राथमिक शिक्षणाच्या सक्षमीकरणासाठी बिडी उद्योग व मजुरीची कामे करणाऱ्या लोकांनी एकत्र येऊन जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलण्यास मोलाची साथ दिली.

‘प्रत्येक मुल शिकावे’ या प्रेरणेने सर्वच शाळांच्या विकासासाठी लोकचळवळ निर्माण झाली. ज्ञानरचनावादी शाळा, डिजिटल शाळा, वाचनकुटी, रंगरंगोटी, हॅण्डवॉश स्टेशन, आवारभिंत, पिण्याचे पाणी, पूर्व प्राथमिक वर्ग, एलईडी प्रोजेक्टर, इन्टरेक्टिव्ह बोर्ड साउंड सीस्टम, टॅबलेट, रंगमंच आदी कामांसाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लोकसहभागाने निधी उभारण्यात आला. यातून शाळा डिजिटल झाल्या खऱ्या, परंतु आता हे साहित्य खराब होऊ लागले आहेत. कोरोनामुळे मागील वर्षभरापासून शाळा बंद असल्याने, शाळेत लावण्यात आलेल्या एलसीडींचे तारा उंदरांनी कुरतडल्याचे दिसून येत आहे.

-----------------------------------

उभारला ४.१४ कोटींचा निधी

आपल्या पाल्यांच्या अभ्यासासाठी पालकांनी शैक्षणिक सत्र २०१५-१६ मध्ये ९६ लाख ७० हजार रुपयांचा आणि सत्र २०१६-१७ मध्ये तीन कोटी १७ लाख ५० हजार असा एकूण चार कोटी १४ लाख २० हजार रुपयांचा निधी उभारून शाळा दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करण्यात आल्या. विशेष म्हणजे, यामध्ये बिडीपत्ता संकलन व बिडी वळणारे, तसेच मोलमजुरी करणाऱ्यांचे हातही जुळले आहेत.