शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

देशाला सकारात्मक विकासाकडे नेण्याचे काम मोदी सरकारने केले ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:26 IST

गोंदिया : देशात दोन समुदायांची वाटणी करणाऱ्या राममंदिर-बाबरी मस्जीद वादावर सकारात्मक तोडगा काढून दोन समुदायांत आपसी भाईचारा वाढविला. शेतकऱ्यांना ...

गोंदिया : देशात दोन समुदायांची वाटणी करणाऱ्या राममंदिर-बाबरी मस्जीद वादावर सकारात्मक तोडगा काढून दोन समुदायांत आपसी भाईचारा वाढविला. शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांची आर्थिक मदत व प्रत्येक गावात घरकुलांना मजुरी देऊन प्रत्येकाला २०२२ पर्यंत पक्के घर देण्याचे वचन मोदी सरकारने निभावले. कोरोना काळात गरिबांना मोफत रेशन व गॅस सिलिंडर दिले. बचतगट संलग्न महिलांच्या खात्यात ५०० रुपये टाकून मदत दिली. तर आता सरकारी रुग्णालयांत कोरोनाची लस मोफत दिली जात आहे. मागील ७० वर्षांत जे काम होऊ शकले नाही ते क्रांतिकारी काम मागील ७ वर्षांत नरेंद्र मोदी सरकारने केले. देशाला सकारात्मक विकासाकडे नेण्याचे काम मोदी सरकारने केले असल्याचे प्रतिपादन माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.

भारतीय जनता पक्षाच्यावतीने आयोजित गोंदिया तालुका ग्रामीण मंडळाच्या बैठकीत ते मार्गदर्शन करताना बोलत होते. याप्रसंगी खासदार सुनील मेंढे यांनी, आज दोन्ही जिल्ह्यातील परंपरागत धान खरेदी केंद्रांना हटवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आपले केंद्र उघडले आहे. या केंद्रांवर शेतकरी टोकन घेऊन फिरत असून, फक्त व्यापाऱ्यांचा धान घेतला जात आहे. राष्ट्रवादीचे नेते दोन हजार कोटींचे बोनस वाटल्याच्या गोष्टी करीत आहेत. मात्र यातील १९०० कोटींचा बोनस राष्ट्रवादीच्या नेत्यांकडेच जात आहे. जे नेता मागील ३०-३५ वर्षांपासून गोंदिया-जबलपूर ब्रॉडगेजचे काम करू शकले नाही, ते काम मोदी सरकारने ७ वर्षांत पूर्ण करून आता गाडीही चालवून दिल्याचे सांगितले.

नेतराम कटरे यांनी, ठाकरे सरकार फक्त घोषणा करत आहे. कर्जमाफीत ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जफेड केली, त्या शेतकऱ्यांना आतापर्यंत १ रुपयाची मदत मिळालेली नाही. उलट आता वीज कापण्याची घोषणा करून जनतेशी विश्वासघात करीत असल्याचे सांगितले. माजी जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांनी, राज्य सरकार फक्त राज्यातील जनतेला लुटण्याचे काम करीत आहे. यात वीजदर असो की कर असो. मागील १ वर्षातील कोरोना काळात जेथे सर्वसामान्यांची आवक घटली आहे, तेथे राज्य सरकारने प्रत्येक कर ४-५ पट वाढवित असल्याचे सांगितले.

बैठकीला संघटन मंत्री बाळा अंजनकर, बाबूलाल रहांगडाले, योगराज रहांगडाले, सुनील केलनका, नंदू बिसेन, अशोक चौधरी, संजय टेंभरे, नरेंद्र तुरकर, ओम कटरे, धनलाल ठाकरे, गुड्डू कारडा, राजेश चतुर, तिजेश गौतम, मनोज मेंढे, देवचंद नागपुरे, भावना कदम, छाया दसरे, प्रकाश रहमतकर, योगेश्वरी रहांगडाले, वंदना चुटे, हेमराज बिसेन, राजेश हरिणखेडे, पन्नालाल हरिणखेडे, गणेश हरिणखेडे, कुसोबा मस्के, दिनेश तिडके यांच्यासह मोठ्या संख्येत पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.