शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
2
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
3
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
4
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
5
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
6
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
7
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
8
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
9
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
10
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
11
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
12
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
13
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
14
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
15
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
16
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
17
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
18
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
19
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
20
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू

मजीप्राने केले बंधाऱ्याचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 00:53 IST

शहरातील पाणी टंचाईची समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाने(मजीप्रा) पुजारीटोला प्रकल्पात पाणी आरक्षीत केले आहे. मात्र प्रकल्पातून आलेले हे पाणी वाहून जावू नये, यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधीकरणने बंधारा बांधकामाचे नियोजन के ले आहे.

ठळक मुद्देडांर्गोली येथे बंधारा बांधणार : निविदा प्रक्रिया आटोपली

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील पाणी टंचाईची समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाने(मजीप्रा) पुजारीटोला प्रकल्पात पाणी आरक्षीत केले आहे. मात्र प्रकल्पातून आलेले हे पाणी वाहून जावू नये, यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधीकरणने बंधारा बांधकामाचे नियोजन के ले आहे. डांर्गोली येथे नदीत हा बंधारा बांधला जाणार असून यासाठीची निविदा प्रक्रिया आटोपली आहे.मागील वर्षी जिल्ह्यात कमी पाऊस झाल्यामुळे जिल्ह्याला पाणी टंचाईची झळ सोसावी लागली होती. गोंदिया शहरवासीयांची तहान भागविण्यासाठी डांर्गोली येथील वैनगंगा नदीचे पात्र सुध्दा कोरडे पडले होते.यावर तोडगा म्हणून कधी नव्हे ते सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला प्रकल्पातून पाणी आणावे लागले होेते. जिल्ह्यात प्रथमच असा हा प्रयोग करावा लागला होता.त्यामुळेच मागील वर्षी शहरातील पाणी टंचाईची समस्या सुटली होती. महाराष्ट्र जीवन प्राधीकरण व पाटबंधारे विभागाच्या सामंजस्यातून पाणी टंचाईची समस्या मार्गी लावण्यात आली होती. यंदाही पाणी टंचाईची तीच स्थिती असून जिल्ह्यात पाणी टंचाई भासणार यात शंका नाही. अशात पाणी टंचाईची झळ शहरालाही बसणार हे सुद्धा तेवढेच खरे आहे. भविष्यातील हे चित्र बघून महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाने यंदाही शहरासाठी पुजारीटोला प्रकल्पातील पाणी आरक्षीत करून ठेवले आहे. त्यामुळे पाणी टंचाईची स्थिती दिसल्यास पुजारीटोला प्रकल्पातून पाणी आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र प्रकल्पातून आलेले पाणी वाहून जावू नये, यासाठी मजीप्राने बंधाऱ्याचे नियोजन करून ठेवले आहे.मजीप्राने नदीत बंधारा बांधकामासाठी निविदा काढली असून सुमारे ५-६ लाखांचा यासाठी खर्च येणार असल्याची माहिती आहे. यात रेतीच्या पोतींचा बंधारा बांधला जाणार असून ४ महिन्यांसाठी त्याच्या देखरेखीची तरतूद करण्यात आली आहे. ऐनवेळी धावपळ होवू नये या दृष्टीने मजीप्राने बंधाºयाचे अगोदरच नियोजन केले आहे.या बंधाºयामुळे प्रकल्पातून आलेले पाणी वाहून जाणार नाही व शहराला पाणी पुरवठा करण्यात अडचण येणार नाही.मार्च अखेरपर्यंत पुरणार पाणीडांर्गोली येथे नदीत मार्चच्या शेवटपर्यंत पाणी पुरणार एवढा पाणीसाठा असल्याची माहिती आहे. सध्या डांर्गोली येथील पंपाला पाणी येत असून पाण्याची गरज मार्च महिन्यात शेवटी पडणार आहे. त्यामुळे सध्या तरी पाणी कधी आणायचे यासाठी मजिप्राकडून नियोजन करण्यात आले नसल्याची माहिती आहे. मात्र लवकरच या विषयाला घेवून अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. त्यात पाणी आणण्यासाठीचे नियोजन केले जाणार असल्याची माहिती मजिप्राचे विभागीय अभियंता राजेंद्र मडके यांनी दिली.