शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
4
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
5
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
6
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
7
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
8
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
9
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
11
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
12
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
13
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
14
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
15
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
16
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
17
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
18
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
19
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
20
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ

मजीप्राने केले बंधाऱ्याचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 00:53 IST

शहरातील पाणी टंचाईची समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाने(मजीप्रा) पुजारीटोला प्रकल्पात पाणी आरक्षीत केले आहे. मात्र प्रकल्पातून आलेले हे पाणी वाहून जावू नये, यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधीकरणने बंधारा बांधकामाचे नियोजन के ले आहे.

ठळक मुद्देडांर्गोली येथे बंधारा बांधणार : निविदा प्रक्रिया आटोपली

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील पाणी टंचाईची समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाने(मजीप्रा) पुजारीटोला प्रकल्पात पाणी आरक्षीत केले आहे. मात्र प्रकल्पातून आलेले हे पाणी वाहून जावू नये, यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधीकरणने बंधारा बांधकामाचे नियोजन के ले आहे. डांर्गोली येथे नदीत हा बंधारा बांधला जाणार असून यासाठीची निविदा प्रक्रिया आटोपली आहे.मागील वर्षी जिल्ह्यात कमी पाऊस झाल्यामुळे जिल्ह्याला पाणी टंचाईची झळ सोसावी लागली होती. गोंदिया शहरवासीयांची तहान भागविण्यासाठी डांर्गोली येथील वैनगंगा नदीचे पात्र सुध्दा कोरडे पडले होते.यावर तोडगा म्हणून कधी नव्हे ते सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला प्रकल्पातून पाणी आणावे लागले होेते. जिल्ह्यात प्रथमच असा हा प्रयोग करावा लागला होता.त्यामुळेच मागील वर्षी शहरातील पाणी टंचाईची समस्या सुटली होती. महाराष्ट्र जीवन प्राधीकरण व पाटबंधारे विभागाच्या सामंजस्यातून पाणी टंचाईची समस्या मार्गी लावण्यात आली होती. यंदाही पाणी टंचाईची तीच स्थिती असून जिल्ह्यात पाणी टंचाई भासणार यात शंका नाही. अशात पाणी टंचाईची झळ शहरालाही बसणार हे सुद्धा तेवढेच खरे आहे. भविष्यातील हे चित्र बघून महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाने यंदाही शहरासाठी पुजारीटोला प्रकल्पातील पाणी आरक्षीत करून ठेवले आहे. त्यामुळे पाणी टंचाईची स्थिती दिसल्यास पुजारीटोला प्रकल्पातून पाणी आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र प्रकल्पातून आलेले पाणी वाहून जावू नये, यासाठी मजीप्राने बंधाऱ्याचे नियोजन करून ठेवले आहे.मजीप्राने नदीत बंधारा बांधकामासाठी निविदा काढली असून सुमारे ५-६ लाखांचा यासाठी खर्च येणार असल्याची माहिती आहे. यात रेतीच्या पोतींचा बंधारा बांधला जाणार असून ४ महिन्यांसाठी त्याच्या देखरेखीची तरतूद करण्यात आली आहे. ऐनवेळी धावपळ होवू नये या दृष्टीने मजीप्राने बंधाºयाचे अगोदरच नियोजन केले आहे.या बंधाºयामुळे प्रकल्पातून आलेले पाणी वाहून जाणार नाही व शहराला पाणी पुरवठा करण्यात अडचण येणार नाही.मार्च अखेरपर्यंत पुरणार पाणीडांर्गोली येथे नदीत मार्चच्या शेवटपर्यंत पाणी पुरणार एवढा पाणीसाठा असल्याची माहिती आहे. सध्या डांर्गोली येथील पंपाला पाणी येत असून पाण्याची गरज मार्च महिन्यात शेवटी पडणार आहे. त्यामुळे सध्या तरी पाणी कधी आणायचे यासाठी मजिप्राकडून नियोजन करण्यात आले नसल्याची माहिती आहे. मात्र लवकरच या विषयाला घेवून अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. त्यात पाणी आणण्यासाठीचे नियोजन केले जाणार असल्याची माहिती मजिप्राचे विभागीय अभियंता राजेंद्र मडके यांनी दिली.