शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

मजीप्राने केले बंधाऱ्याचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 00:53 IST

शहरातील पाणी टंचाईची समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाने(मजीप्रा) पुजारीटोला प्रकल्पात पाणी आरक्षीत केले आहे. मात्र प्रकल्पातून आलेले हे पाणी वाहून जावू नये, यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधीकरणने बंधारा बांधकामाचे नियोजन के ले आहे.

ठळक मुद्देडांर्गोली येथे बंधारा बांधणार : निविदा प्रक्रिया आटोपली

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील पाणी टंचाईची समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाने(मजीप्रा) पुजारीटोला प्रकल्पात पाणी आरक्षीत केले आहे. मात्र प्रकल्पातून आलेले हे पाणी वाहून जावू नये, यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधीकरणने बंधारा बांधकामाचे नियोजन के ले आहे. डांर्गोली येथे नदीत हा बंधारा बांधला जाणार असून यासाठीची निविदा प्रक्रिया आटोपली आहे.मागील वर्षी जिल्ह्यात कमी पाऊस झाल्यामुळे जिल्ह्याला पाणी टंचाईची झळ सोसावी लागली होती. गोंदिया शहरवासीयांची तहान भागविण्यासाठी डांर्गोली येथील वैनगंगा नदीचे पात्र सुध्दा कोरडे पडले होते.यावर तोडगा म्हणून कधी नव्हे ते सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला प्रकल्पातून पाणी आणावे लागले होेते. जिल्ह्यात प्रथमच असा हा प्रयोग करावा लागला होता.त्यामुळेच मागील वर्षी शहरातील पाणी टंचाईची समस्या सुटली होती. महाराष्ट्र जीवन प्राधीकरण व पाटबंधारे विभागाच्या सामंजस्यातून पाणी टंचाईची समस्या मार्गी लावण्यात आली होती. यंदाही पाणी टंचाईची तीच स्थिती असून जिल्ह्यात पाणी टंचाई भासणार यात शंका नाही. अशात पाणी टंचाईची झळ शहरालाही बसणार हे सुद्धा तेवढेच खरे आहे. भविष्यातील हे चित्र बघून महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाने यंदाही शहरासाठी पुजारीटोला प्रकल्पातील पाणी आरक्षीत करून ठेवले आहे. त्यामुळे पाणी टंचाईची स्थिती दिसल्यास पुजारीटोला प्रकल्पातून पाणी आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र प्रकल्पातून आलेले पाणी वाहून जावू नये, यासाठी मजीप्राने बंधाऱ्याचे नियोजन करून ठेवले आहे.मजीप्राने नदीत बंधारा बांधकामासाठी निविदा काढली असून सुमारे ५-६ लाखांचा यासाठी खर्च येणार असल्याची माहिती आहे. यात रेतीच्या पोतींचा बंधारा बांधला जाणार असून ४ महिन्यांसाठी त्याच्या देखरेखीची तरतूद करण्यात आली आहे. ऐनवेळी धावपळ होवू नये या दृष्टीने मजीप्राने बंधाºयाचे अगोदरच नियोजन केले आहे.या बंधाºयामुळे प्रकल्पातून आलेले पाणी वाहून जाणार नाही व शहराला पाणी पुरवठा करण्यात अडचण येणार नाही.मार्च अखेरपर्यंत पुरणार पाणीडांर्गोली येथे नदीत मार्चच्या शेवटपर्यंत पाणी पुरणार एवढा पाणीसाठा असल्याची माहिती आहे. सध्या डांर्गोली येथील पंपाला पाणी येत असून पाण्याची गरज मार्च महिन्यात शेवटी पडणार आहे. त्यामुळे सध्या तरी पाणी कधी आणायचे यासाठी मजिप्राकडून नियोजन करण्यात आले नसल्याची माहिती आहे. मात्र लवकरच या विषयाला घेवून अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. त्यात पाणी आणण्यासाठीचे नियोजन केले जाणार असल्याची माहिती मजिप्राचे विभागीय अभियंता राजेंद्र मडके यांनी दिली.