शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विभागाकडून शासनाची दिशाभूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 23:54 IST

दहा दिवसांपूर्वी पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत कृषी विभागाच्या अधिकाºयांनी पावसाअभावी जिल्ह्यातील ७० हजार हेक्टर जमीन पडिक असल्याची माहिती दिली होती.

ठळक मुद्देशेतकºयांमध्ये संताप : जिल्ह्यात ७८ टक्के रोवणी झाल्याचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दहा दिवसांपूर्वी पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत कृषी विभागाच्या अधिकाºयांनी पावसाअभावी जिल्ह्यातील ७० हजार हेक्टर जमीन पडिक असल्याची माहिती दिली होती. मात्र आता यावरुन घुमजाव करीत जिल्ह्यात आत्तापर्यंत ७८ रोवण्या झाल्याचा दावा केला आहे. त्यामुळे कृषी विभागाकडूनच प्रशासनाची दिशाभूल केली जात असल्याचे चित्र आहे.यंदा आत्तापर्यंत सरासरीच्या केवळ ५४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. त्यातही सातत्याने नसल्याने धानापिकांना त्याचा फटका बसला. आॅगस्ट महिन्यापासून पाऊस झालेल्या केलेली रोवणी देखील वाळत आहे. तलाव, बोड्या व धरणांमध्ये देखील अत्यल्प पाणीसाठा आहे. एकंदरीत पावसाअभावी जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती आहे. मात्र जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने जिल्हाभरात आवत्यांसह ७८ टक्के रोवण्या झाल्याची नोंद केली आहे. यावर्षी अत्यल्प पाऊस पडला असताना मोठ्या प्रमाणात शेतकºयांनी रोवणी केलीच नाही. मग कृषी विभागाने ७८ टक्के रोवणीची नोंद घेतलीच कशी? असा सवाल शेतकºयांकडून केला जात आहे.जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ७८ हजार २२९ हेक्टर असून प्रत्यक्ष पेरणी एक लाख ३९ हजार ८७०.२० हेक्टरमध्ये करण्यात आली. यात रोवणी एक लाख ३० हजार ५७४.२० हेक्टरमध्ये तर आवत्या ९ हजार २९६ हेक्टरमध्ये असल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे. मात्र गेल्या महिनाभरापासून दमदार पाऊस झालेला नाही. मग कृषी विभागाने रोवणीची एवढी नोंद केली कशी असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने दुष्काळी परिस्थितीबाबत रोवणी न झालेल्या शेतजमिनीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश कृषी विभागाला दिले होते. मात्र अद्यापही कृषी विभागाला अद्यापही सर्वेक्षणाला सुरूवात केली नसल्याची माहिती आहे. यासंदर्भात कृषी विभागाच्या अधिकाºयांशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती देणे टाळले.आतापर्यंत ७१०.२० मिमी पावसाची नोंदसद्यस्थितीत जिल्ह्यातील पर्जन्यमानाची स्थितीसुद्धा वाईटच आहे. जिल्ह्यात १ जून ते ८ सप्टेंबर २०१७ पर्यंत एकूण सरासरी ७१०.२० मिमी पाऊस झाला आहे. यात गोंदिया तालुक्यात सरासरी ७७० मिमी पाऊस, गोरेगाव ७४५.२० मिमी, तिरोडा ६७९.९ मिमी, अर्जुनी-मोरगाव ९५४.२० मिमी, देवरी ५०६.८० मिमी, आमगाव ७९७.१० मिमी, सालेकसा ६९० मिमी व सडक-अर्जुनी तालुक्यात सरासरी ५३१.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.धरणामंध्ये अत्यल्प साठासद्यस्थितीत जिल्ह्यातील नदीनाले व तलावही आटले आहेत. काही मोठ्या धरणांमध्येही पाण्याचे प्रमाण अल्प आहे. त्यामुळे यावर्षी सर्वत्र दुष्काळाचे असल्याचे चित्र आहे. सध्या इटियाडोह धरणाला १९०.२३ दलघमी जलसाठा आहे. शिरपूर धरणात २७.२३ दलघमी, पुजारीटोला धरणात १९.९२ दलघमी, कालीसराडमध्ये ५.७६ दलघमी, संजय सरोवरमध्ये २५०.१३ दलघमी जलसाठा आहे. तसेच देवरी येथे वैनगंगा नदीतील पाण्याची पातळी ०.६२ मीटर व रजेगाव येथे वाघ नदीतील पाण्याची पातळी ०.९५ मीटर आहे. पाटबंधारे विभागानुसार, धोक्याची पातळी २७७.३० मीटरच्या वर असताना सद्यस्थितीत असलेली पाण्याची पातळी खूपच अत्यल्प आहे.गेल्या ३५ वर्षांत प्रथमच धरणाच्या पातळीत घटयंदा जिल्ह्यात सरासरीच्या केवळ ५४ टक्केच पावसाची नोंद झाली. परिणामी धरणांमध्ये देखील अत्यल्प पाणीसाठा आहे. सिंचन विभागाने दिलेल्या माहितीनुसार १९८२ नंतर म्हणजे ३५ वर्षांनी धरणाची पातळी ऐवढी खालावली असल्याचे सांगितले.