शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विभागाकडून शासनाची दिशाभूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 23:54 IST

दहा दिवसांपूर्वी पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत कृषी विभागाच्या अधिकाºयांनी पावसाअभावी जिल्ह्यातील ७० हजार हेक्टर जमीन पडिक असल्याची माहिती दिली होती.

ठळक मुद्देशेतकºयांमध्ये संताप : जिल्ह्यात ७८ टक्के रोवणी झाल्याचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दहा दिवसांपूर्वी पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत कृषी विभागाच्या अधिकाºयांनी पावसाअभावी जिल्ह्यातील ७० हजार हेक्टर जमीन पडिक असल्याची माहिती दिली होती. मात्र आता यावरुन घुमजाव करीत जिल्ह्यात आत्तापर्यंत ७८ रोवण्या झाल्याचा दावा केला आहे. त्यामुळे कृषी विभागाकडूनच प्रशासनाची दिशाभूल केली जात असल्याचे चित्र आहे.यंदा आत्तापर्यंत सरासरीच्या केवळ ५४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. त्यातही सातत्याने नसल्याने धानापिकांना त्याचा फटका बसला. आॅगस्ट महिन्यापासून पाऊस झालेल्या केलेली रोवणी देखील वाळत आहे. तलाव, बोड्या व धरणांमध्ये देखील अत्यल्प पाणीसाठा आहे. एकंदरीत पावसाअभावी जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती आहे. मात्र जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने जिल्हाभरात आवत्यांसह ७८ टक्के रोवण्या झाल्याची नोंद केली आहे. यावर्षी अत्यल्प पाऊस पडला असताना मोठ्या प्रमाणात शेतकºयांनी रोवणी केलीच नाही. मग कृषी विभागाने ७८ टक्के रोवणीची नोंद घेतलीच कशी? असा सवाल शेतकºयांकडून केला जात आहे.जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ७८ हजार २२९ हेक्टर असून प्रत्यक्ष पेरणी एक लाख ३९ हजार ८७०.२० हेक्टरमध्ये करण्यात आली. यात रोवणी एक लाख ३० हजार ५७४.२० हेक्टरमध्ये तर आवत्या ९ हजार २९६ हेक्टरमध्ये असल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे. मात्र गेल्या महिनाभरापासून दमदार पाऊस झालेला नाही. मग कृषी विभागाने रोवणीची एवढी नोंद केली कशी असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने दुष्काळी परिस्थितीबाबत रोवणी न झालेल्या शेतजमिनीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश कृषी विभागाला दिले होते. मात्र अद्यापही कृषी विभागाला अद्यापही सर्वेक्षणाला सुरूवात केली नसल्याची माहिती आहे. यासंदर्भात कृषी विभागाच्या अधिकाºयांशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती देणे टाळले.आतापर्यंत ७१०.२० मिमी पावसाची नोंदसद्यस्थितीत जिल्ह्यातील पर्जन्यमानाची स्थितीसुद्धा वाईटच आहे. जिल्ह्यात १ जून ते ८ सप्टेंबर २०१७ पर्यंत एकूण सरासरी ७१०.२० मिमी पाऊस झाला आहे. यात गोंदिया तालुक्यात सरासरी ७७० मिमी पाऊस, गोरेगाव ७४५.२० मिमी, तिरोडा ६७९.९ मिमी, अर्जुनी-मोरगाव ९५४.२० मिमी, देवरी ५०६.८० मिमी, आमगाव ७९७.१० मिमी, सालेकसा ६९० मिमी व सडक-अर्जुनी तालुक्यात सरासरी ५३१.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.धरणामंध्ये अत्यल्प साठासद्यस्थितीत जिल्ह्यातील नदीनाले व तलावही आटले आहेत. काही मोठ्या धरणांमध्येही पाण्याचे प्रमाण अल्प आहे. त्यामुळे यावर्षी सर्वत्र दुष्काळाचे असल्याचे चित्र आहे. सध्या इटियाडोह धरणाला १९०.२३ दलघमी जलसाठा आहे. शिरपूर धरणात २७.२३ दलघमी, पुजारीटोला धरणात १९.९२ दलघमी, कालीसराडमध्ये ५.७६ दलघमी, संजय सरोवरमध्ये २५०.१३ दलघमी जलसाठा आहे. तसेच देवरी येथे वैनगंगा नदीतील पाण्याची पातळी ०.६२ मीटर व रजेगाव येथे वाघ नदीतील पाण्याची पातळी ०.९५ मीटर आहे. पाटबंधारे विभागानुसार, धोक्याची पातळी २७७.३० मीटरच्या वर असताना सद्यस्थितीत असलेली पाण्याची पातळी खूपच अत्यल्प आहे.गेल्या ३५ वर्षांत प्रथमच धरणाच्या पातळीत घटयंदा जिल्ह्यात सरासरीच्या केवळ ५४ टक्केच पावसाची नोंद झाली. परिणामी धरणांमध्ये देखील अत्यल्प पाणीसाठा आहे. सिंचन विभागाने दिलेल्या माहितीनुसार १९८२ नंतर म्हणजे ३५ वर्षांनी धरणाची पातळी ऐवढी खालावली असल्याचे सांगितले.