शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

संवादाची दरी बिघडवू शकते मानसिक स्वास्थ्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:33 IST

गोंदिया : कोरोनामुळे विस्कळीत झालेल्या जनजीवनामुळे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक वेदनांना सामोरे जावे लागत आहे. कोरोनामुळे आप्तजनांचा जीव गेला, ...

गोंदिया : कोरोनामुळे विस्कळीत झालेल्या जनजीवनामुळे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक वेदनांना सामोरे जावे लागत आहे. कोरोनामुळे आप्तजनांचा जीव गेला, त्यामुळे कुटुंबीय तणावात आहेत. कोरोनानंतर येणारा फेज आत्महत्यांचा राहणार आहे. यासाठी घराघरात संवाद होणे आवश्यक आहे. अन्यथा तणाव वाढून आत्महत्येसारखे पाऊल उचलले जाईल, असे मानसिक आरोग्य तज्ज्ञ डॉ. लोकेश चिरवतकर यांनी म्हटले आहे. जगात दरवर्षी ८ लाख लोक आत्महत्या करतात. हा आकडा युद्धात जीव गमावलेल्या व्यक्तींपेक्षा जास्त आहे. प्रत्येक ४० सेकंदाला एक व्यक्ती आत्महत्या करीत आहे. भारतात प्रत्येक तासाला एक विद्यार्थी आत्महत्या करीत आहे. कितीतरी कुटुंबे आप्तजनांचा जीव गेल्यामुळे पीडित आहेत. कितीतरी लोकांना आपला रोजगार कोरोनामुळे गमवावा लागला आहे. त्यामुळेही लोक अतिशय मानसिक तणावाखाली आहेत. त्यातून आत्महत्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी केंद्र सरकारने मानसिक आरोग्य कार्यक्रम सुरू केले आहेत. त्यातून आत्महत्या थांबविल्या जाणार असल्याचे डॉ. चिरवतकर यांनी सांगितले.

--------------------------

कोट

कोरोना महामारीनंतर दुसरी लाट मानसिक आजार व आत्महत्येची येणार आहे. जगभर चर्चा व्हावी याकरिता आत्महत्या थांबविण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. जानेवारी २०२० च्या ‘द हिंदू’च्या सर्व्हेनुसार एका तासाला एक विद्यार्थी आत्महत्या करतो. वर्षाकाठी २५ हजार विद्यार्थ्यांची आत्महत्या भारतात होतात. भारतीय सांख्यिकी विभागानुसार १५ ते २९ या वयोगटातील मृत्यूचे सर्वात मोठे कारण म्हणजे आत्महत्या आहे. शारीरिक, मानसिक आणि सामाजिक तणाव व दुर्धर आजारांमुळे खचून जाऊन आत्महत्या केल्या जातात.

- डॉ. लोकेश चिरवतकर, जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम अधिकारी

.................

कोट

तणाव व कौटुंबिक कलह हे आत्महत्येचे सर्वात मोठे कारण आहे. डिप्रेशन, सिजोफ्रेमिया (संशयाचा आजार), मेनिया (कभी खुशी कभी गम) या मानसिक आजारांमुळेही आत्महत्या होतात. व्यसनांमुळे आत्महत्या वाढतात. दारू हे सर्वात मोठे आत्महत्येसाठी कारण आहे. दारूमुळे व्यक्तीची सारासार विचार करण्याची क्षमता कमी होत जाते. मेंदूत बदल होतात व त्यामुळे ते आत्महत्या करतात.

- डॉ. यामिनी येळणे, मानसोपचार तज्ज्ञ, गोंदिया.

......

मन हलके करणे हाच उपाय

-कोरोनामुळे आप्तांचा जीव गेला, नोकरी गेली, आर्थिक संकट ओढवल्याने तणाव वाढला असून तो कमी करणे आवश्यक आहे.

- कोरोनाच्या संकटाने एकाकी पडलेल्या लोकांना आधार देण्यासाठी त्यांच्या घरात संवाद घडावा, त्या संवादातून तणाव कमी करण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा.

- सरकार, प्रसार माध्यमे व जनता या तिघांनी मिळून आत्महत्या प्रतिबंध करण्याची गरज आहे. यासाठी सरकारने मानसिक आरोग्य कार्यक्रम सुरू केले पाहिजेत.

- समुपदेशनाच्या माध्यमातून त्यांच्या तणावाचे निवारण केले जाऊ शकते. एखादी व्यक्ती बोलत नाही तर त्याच्या हावभावावरून किंवा हालचालीवरून आपल्याला सहज समजते.