शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

संवादाची दरी बिघडवू शकते मानसिक स्वास्थ्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:33 IST

गोंदिया : कोरोनामुळे विस्कळीत झालेल्या जनजीवनामुळे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक वेदनांना सामोरे जावे लागत आहे. कोरोनामुळे आप्तजनांचा जीव गेला, ...

गोंदिया : कोरोनामुळे विस्कळीत झालेल्या जनजीवनामुळे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक वेदनांना सामोरे जावे लागत आहे. कोरोनामुळे आप्तजनांचा जीव गेला, त्यामुळे कुटुंबीय तणावात आहेत. कोरोनानंतर येणारा फेज आत्महत्यांचा राहणार आहे. यासाठी घराघरात संवाद होणे आवश्यक आहे. अन्यथा तणाव वाढून आत्महत्येसारखे पाऊल उचलले जाईल, असे मानसिक आरोग्य तज्ज्ञ डॉ. लोकेश चिरवतकर यांनी म्हटले आहे. जगात दरवर्षी ८ लाख लोक आत्महत्या करतात. हा आकडा युद्धात जीव गमावलेल्या व्यक्तींपेक्षा जास्त आहे. प्रत्येक ४० सेकंदाला एक व्यक्ती आत्महत्या करीत आहे. भारतात प्रत्येक तासाला एक विद्यार्थी आत्महत्या करीत आहे. कितीतरी कुटुंबे आप्तजनांचा जीव गेल्यामुळे पीडित आहेत. कितीतरी लोकांना आपला रोजगार कोरोनामुळे गमवावा लागला आहे. त्यामुळेही लोक अतिशय मानसिक तणावाखाली आहेत. त्यातून आत्महत्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी केंद्र सरकारने मानसिक आरोग्य कार्यक्रम सुरू केले आहेत. त्यातून आत्महत्या थांबविल्या जाणार असल्याचे डॉ. चिरवतकर यांनी सांगितले.

--------------------------

कोट

कोरोना महामारीनंतर दुसरी लाट मानसिक आजार व आत्महत्येची येणार आहे. जगभर चर्चा व्हावी याकरिता आत्महत्या थांबविण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. जानेवारी २०२० च्या ‘द हिंदू’च्या सर्व्हेनुसार एका तासाला एक विद्यार्थी आत्महत्या करतो. वर्षाकाठी २५ हजार विद्यार्थ्यांची आत्महत्या भारतात होतात. भारतीय सांख्यिकी विभागानुसार १५ ते २९ या वयोगटातील मृत्यूचे सर्वात मोठे कारण म्हणजे आत्महत्या आहे. शारीरिक, मानसिक आणि सामाजिक तणाव व दुर्धर आजारांमुळे खचून जाऊन आत्महत्या केल्या जातात.

- डॉ. लोकेश चिरवतकर, जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम अधिकारी

.................

कोट

तणाव व कौटुंबिक कलह हे आत्महत्येचे सर्वात मोठे कारण आहे. डिप्रेशन, सिजोफ्रेमिया (संशयाचा आजार), मेनिया (कभी खुशी कभी गम) या मानसिक आजारांमुळेही आत्महत्या होतात. व्यसनांमुळे आत्महत्या वाढतात. दारू हे सर्वात मोठे आत्महत्येसाठी कारण आहे. दारूमुळे व्यक्तीची सारासार विचार करण्याची क्षमता कमी होत जाते. मेंदूत बदल होतात व त्यामुळे ते आत्महत्या करतात.

- डॉ. यामिनी येळणे, मानसोपचार तज्ज्ञ, गोंदिया.

......

मन हलके करणे हाच उपाय

-कोरोनामुळे आप्तांचा जीव गेला, नोकरी गेली, आर्थिक संकट ओढवल्याने तणाव वाढला असून तो कमी करणे आवश्यक आहे.

- कोरोनाच्या संकटाने एकाकी पडलेल्या लोकांना आधार देण्यासाठी त्यांच्या घरात संवाद घडावा, त्या संवादातून तणाव कमी करण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा.

- सरकार, प्रसार माध्यमे व जनता या तिघांनी मिळून आत्महत्या प्रतिबंध करण्याची गरज आहे. यासाठी सरकारने मानसिक आरोग्य कार्यक्रम सुरू केले पाहिजेत.

- समुपदेशनाच्या माध्यमातून त्यांच्या तणावाचे निवारण केले जाऊ शकते. एखादी व्यक्ती बोलत नाही तर त्याच्या हावभावावरून किंवा हालचालीवरून आपल्याला सहज समजते.