शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
3
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
4
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ महत्वाच्या समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
5
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
6
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
7
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
8
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
9
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
10
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
12
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
13
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
14
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
15
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
16
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
17
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
18
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
19
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
20
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती

संवादाची दरी बिघडवू शकते मानसिक स्वास्थ्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:33 IST

गोंदिया : कोरोनामुळे विस्कळीत झालेल्या जनजीवनामुळे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक वेदनांना सामोरे जावे लागत आहे. कोरोनामुळे आप्तजनांचा जीव गेला, ...

गोंदिया : कोरोनामुळे विस्कळीत झालेल्या जनजीवनामुळे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक वेदनांना सामोरे जावे लागत आहे. कोरोनामुळे आप्तजनांचा जीव गेला, त्यामुळे कुटुंबीय तणावात आहेत. कोरोनानंतर येणारा फेज आत्महत्यांचा राहणार आहे. यासाठी घराघरात संवाद होणे आवश्यक आहे. अन्यथा तणाव वाढून आत्महत्येसारखे पाऊल उचलले जाईल, असे मानसिक आरोग्य तज्ज्ञ डॉ. लोकेश चिरवतकर यांनी म्हटले आहे. जगात दरवर्षी ८ लाख लोक आत्महत्या करतात. हा आकडा युद्धात जीव गमावलेल्या व्यक्तींपेक्षा जास्त आहे. प्रत्येक ४० सेकंदाला एक व्यक्ती आत्महत्या करीत आहे. भारतात प्रत्येक तासाला एक विद्यार्थी आत्महत्या करीत आहे. कितीतरी कुटुंबे आप्तजनांचा जीव गेल्यामुळे पीडित आहेत. कितीतरी लोकांना आपला रोजगार कोरोनामुळे गमवावा लागला आहे. त्यामुळेही लोक अतिशय मानसिक तणावाखाली आहेत. त्यातून आत्महत्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी केंद्र सरकारने मानसिक आरोग्य कार्यक्रम सुरू केले आहेत. त्यातून आत्महत्या थांबविल्या जाणार असल्याचे डॉ. चिरवतकर यांनी सांगितले.

--------------------------

कोट

कोरोना महामारीनंतर दुसरी लाट मानसिक आजार व आत्महत्येची येणार आहे. जगभर चर्चा व्हावी याकरिता आत्महत्या थांबविण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. जानेवारी २०२० च्या ‘द हिंदू’च्या सर्व्हेनुसार एका तासाला एक विद्यार्थी आत्महत्या करतो. वर्षाकाठी २५ हजार विद्यार्थ्यांची आत्महत्या भारतात होतात. भारतीय सांख्यिकी विभागानुसार १५ ते २९ या वयोगटातील मृत्यूचे सर्वात मोठे कारण म्हणजे आत्महत्या आहे. शारीरिक, मानसिक आणि सामाजिक तणाव व दुर्धर आजारांमुळे खचून जाऊन आत्महत्या केल्या जातात.

- डॉ. लोकेश चिरवतकर, जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम अधिकारी

.................

कोट

तणाव व कौटुंबिक कलह हे आत्महत्येचे सर्वात मोठे कारण आहे. डिप्रेशन, सिजोफ्रेमिया (संशयाचा आजार), मेनिया (कभी खुशी कभी गम) या मानसिक आजारांमुळेही आत्महत्या होतात. व्यसनांमुळे आत्महत्या वाढतात. दारू हे सर्वात मोठे आत्महत्येसाठी कारण आहे. दारूमुळे व्यक्तीची सारासार विचार करण्याची क्षमता कमी होत जाते. मेंदूत बदल होतात व त्यामुळे ते आत्महत्या करतात.

- डॉ. यामिनी येळणे, मानसोपचार तज्ज्ञ, गोंदिया.

......

मन हलके करणे हाच उपाय

-कोरोनामुळे आप्तांचा जीव गेला, नोकरी गेली, आर्थिक संकट ओढवल्याने तणाव वाढला असून तो कमी करणे आवश्यक आहे.

- कोरोनाच्या संकटाने एकाकी पडलेल्या लोकांना आधार देण्यासाठी त्यांच्या घरात संवाद घडावा, त्या संवादातून तणाव कमी करण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा.

- सरकार, प्रसार माध्यमे व जनता या तिघांनी मिळून आत्महत्या प्रतिबंध करण्याची गरज आहे. यासाठी सरकारने मानसिक आरोग्य कार्यक्रम सुरू केले पाहिजेत.

- समुपदेशनाच्या माध्यमातून त्यांच्या तणावाचे निवारण केले जाऊ शकते. एखादी व्यक्ती बोलत नाही तर त्याच्या हावभावावरून किंवा हालचालीवरून आपल्याला सहज समजते.