शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

सदस्यांना लागले आता सरपंचपदाचे डाेहाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:29 IST

गोंदिया : जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींसाठी नुकतीच निवडणूक पार पडली. सोमवारी मतमोजणी झाल्यानतंर ग्रामपंचायतीवरील सत्तेचे चित्र जवळपास स्पष्ट झाले. मात्र, ...

गोंदिया : जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींसाठी नुकतीच निवडणूक पार पडली. सोमवारी मतमोजणी झाल्यानतंर ग्रामपंचायतीवरील सत्तेचे चित्र जवळपास स्पष्ट झाले. मात्र, सरपंचपदाचे आरक्षण अद्यापही जाहीर झालेले नाही. हे आरक्षण जाहीर झाल्यानंतर गावाचा प्रमुख गावकारभारी कोण, हे ठरणार आहे. त्यामुळे आता निवडून आलेल्या सर्वच सदस्यांना सरपंचपदाचे डोहाळे लागले आहेत.

राजकारणातील प्रवेशाची पहिली पायरी समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल सोमवारी जाहीर झाले आहे. यात १८९ ग्रामपंचायतींपैकी ८ ग्रामपंचायती बिनविरोध आल्या, तर ३११ सदस्य बिनविरोध निवडून आले. त्यामुळे प्रत्यक्षात १८१ ग्रामपंचायतींच्या १,३८२ जागांसाठी ही निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीच्या निकालानंतर सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी सर्वाधिक ग्रामपंचायतींवर आपल्या पक्षाचे समर्थीत उमेदवार निवडून आल्याचा दावा केला आहे. मात्र, या पक्षांनी दावा केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या आणि निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतींच्या संख्येपैकी कितीतरी जास्त आहे. त्यामुळे सर्वाधिक ग्रामपंचायतींवर निवडणुकीचे हे केवळ दावेच आहेत. ग्रामपंचायत निवडणूक ही पक्षविरहित लढविली जाते. गावपातळीवर निवडणूक लढविली जात असल्याने यात सर्वच पक्ष बाहेरून पाठिंबा देतात. त्यामुळे निवडणुकीनंतर सर्वच राजकीय पक्षांनी सर्वाधिक ग्रामपंचायतींवर झेंडा रोवल्याचे दावे केले असले तरी प्रत्यक्षात कोणाची किती ग्रामपंचायतींवर सत्ता आली, हे चित्र सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होऊन प्रत्यक्षात सरपंच आरूढ झाल्यानंतरच ते स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आता ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर आता सर्वच राजकीय पक्ष आणि निवडून आलेल्या उमेदवारांचे लक्ष सरपंचपदाच्या आरक्षणाकडे लागले आहे.

.......

काेण होणार आपल्या गावाच प्रमुख कारभारी

ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान करून आपल्या गावाचा कारभार चालविण्यासाठी सदस्यांची निवड केली; पण आता गावाचा सरपंच कोण होणार, याकडे नजरा लागल्या आहेत. २२ तारखेनंतर सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होणार असून, त्यानंतर निवडून आलेल्या सदस्यांपैकी एकाची सरपंचपदी वर्णी लागणार आहे. त्यामुळे याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

....

सत्तेचे समीकरण जुळविणे सुरू

ग्रामपंचायत निवडणुकीत विविध राजकीय पक्षांचे समर्थीत व अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. यापैकी कोणाची सरपंच, उपसरपंचपदी वर्णी लावायची याचे समीकरण तयार करण्याचे काम निवडणुका झालेल्या गावांमध्ये सध्या सुरू आहे. हे समीकरण जुळविताना कुणी नाराज तर होणार नाहीना, याचीसुद्धा काळजी घ्यावी लागत असल्याने प्रमुखांचीसुद्धा चांगलीच दमछाक होत आहे.

....