शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सदस्यांना लागले आता सरपंचपदाचे डाेहाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:29 IST

गोंदिया : जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींसाठी नुकतीच निवडणूक पार पडली. सोमवारी मतमोजणी झाल्यानतंर ग्रामपंचायतीवरील सत्तेचे चित्र जवळपास स्पष्ट झाले. मात्र, ...

गोंदिया : जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींसाठी नुकतीच निवडणूक पार पडली. सोमवारी मतमोजणी झाल्यानतंर ग्रामपंचायतीवरील सत्तेचे चित्र जवळपास स्पष्ट झाले. मात्र, सरपंचपदाचे आरक्षण अद्यापही जाहीर झालेले नाही. हे आरक्षण जाहीर झाल्यानंतर गावाचा प्रमुख गावकारभारी कोण, हे ठरणार आहे. त्यामुळे आता निवडून आलेल्या सर्वच सदस्यांना सरपंचपदाचे डोहाळे लागले आहेत.

राजकारणातील प्रवेशाची पहिली पायरी समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल सोमवारी जाहीर झाले आहे. यात १८९ ग्रामपंचायतींपैकी ८ ग्रामपंचायती बिनविरोध आल्या, तर ३११ सदस्य बिनविरोध निवडून आले. त्यामुळे प्रत्यक्षात १८१ ग्रामपंचायतींच्या १,३८२ जागांसाठी ही निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीच्या निकालानंतर सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी सर्वाधिक ग्रामपंचायतींवर आपल्या पक्षाचे समर्थीत उमेदवार निवडून आल्याचा दावा केला आहे. मात्र, या पक्षांनी दावा केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या आणि निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतींच्या संख्येपैकी कितीतरी जास्त आहे. त्यामुळे सर्वाधिक ग्रामपंचायतींवर निवडणुकीचे हे केवळ दावेच आहेत. ग्रामपंचायत निवडणूक ही पक्षविरहित लढविली जाते. गावपातळीवर निवडणूक लढविली जात असल्याने यात सर्वच पक्ष बाहेरून पाठिंबा देतात. त्यामुळे निवडणुकीनंतर सर्वच राजकीय पक्षांनी सर्वाधिक ग्रामपंचायतींवर झेंडा रोवल्याचे दावे केले असले तरी प्रत्यक्षात कोणाची किती ग्रामपंचायतींवर सत्ता आली, हे चित्र सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होऊन प्रत्यक्षात सरपंच आरूढ झाल्यानंतरच ते स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आता ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर आता सर्वच राजकीय पक्ष आणि निवडून आलेल्या उमेदवारांचे लक्ष सरपंचपदाच्या आरक्षणाकडे लागले आहे.

.......

काेण होणार आपल्या गावाच प्रमुख कारभारी

ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान करून आपल्या गावाचा कारभार चालविण्यासाठी सदस्यांची निवड केली; पण आता गावाचा सरपंच कोण होणार, याकडे नजरा लागल्या आहेत. २२ तारखेनंतर सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होणार असून, त्यानंतर निवडून आलेल्या सदस्यांपैकी एकाची सरपंचपदी वर्णी लागणार आहे. त्यामुळे याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

....

सत्तेचे समीकरण जुळविणे सुरू

ग्रामपंचायत निवडणुकीत विविध राजकीय पक्षांचे समर्थीत व अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. यापैकी कोणाची सरपंच, उपसरपंचपदी वर्णी लावायची याचे समीकरण तयार करण्याचे काम निवडणुका झालेल्या गावांमध्ये सध्या सुरू आहे. हे समीकरण जुळविताना कुणी नाराज तर होणार नाहीना, याचीसुद्धा काळजी घ्यावी लागत असल्याने प्रमुखांचीसुद्धा चांगलीच दमछाक होत आहे.

....